शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जुन्या मोंढ्यात पुढाऱ्यांची वर्दळ

By admin | Updated: July 15, 2015 00:42 IST

औरंगाबाद : खऱ्या अर्थाने व्यापारी मतदारसंघातील चुरशीच्या लढाईमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक गाजली. आता आपल्याच पॅनलचा सभापती व्हावा

औरंगाबाद : खऱ्या अर्थाने व्यापारी मतदारसंघातील चुरशीच्या लढाईमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक गाजली. आता आपल्याच पॅनलचा सभापती व्हावा, यासाठी भाजप व काँग्रेसच्या नेत्यांकडून २ व्यापारी संचालकांना ‘गळ’ घालणे सुरू झाले आहे. सोमवारी निवडून आल्यापासून विविध नेते या नवनिर्वाचित व्यापाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. आज मंगळवारीही अनेक राजकीय नेत्यांच्या गाड्या जुन्या मोंढ्यात पाहावयास मिळाल्या. प्रत्यक्ष व्यापारी प्रतिनिधींची भेट घेऊन नेत्यांनी हळूच पाठिंब्याच्या विषयाला हात घातला. दोन्ही पक्षांचे नेते ‘हात’ जोडून उभे असल्याने कोणाला ‘साथ’ द्यावी, यासाठी जोरदार खलबते सुरू झाले आहेत. जुन्या मोंढ्यातील व्यापारी प्रशांत सोकिया व हरिशंकर दायमा हे दोघे जण बाजार समिती निवडणुकीत जिंकले आणि व्यापाऱ्यांकडे पाहण्याचा राजकारण्यांचा दृष्टिकोनच बदलून गेला. एरव्ही हे दोघे व्यापारी आपल्या व्यवसायात मग्न असल्याने त्यांची ‘राजकीय’ क्षेत्राशी फारशी नाळ जुळलेली नव्हती. मात्र, बहुमताने विजयी झाल्याने हे दोघे व्यापारी राजकीय वर्तुळात हीरो बनले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या ‘सहकारी संस्था विकास पॅनल’ला पाठिंबा द्यावा, यासाठी भाजपच्या नेत्यांनी सोमवारी दुपारपासून व्यापाऱ्यांशी सतत संपर्क ठेवला आहे. माजी आ. कल्याण काळे यांचा ‘शेतकरी सहकारी विकास पॅनल’ला सभापतीपदापर्यंत पोहोचविण्यासाठी या दोन व्यापारी संचालकांनी सहकार्य करावे, यासाठी काळेंसह काँग्रेसच्या नेत्यांनीही संपर्क साधला आहे. काल भाजपचे आमदार, माजी आमदार व पक्षातील अन्य नेत्यांनी व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिले. एवढेच नव्हे तर आनंदोत्सवातही सहभागी झाले. एवढेच नव्हे तर सभापती बनण्यास इच्छुक असलेले नवनिर्वाचित संचालकही सोमवारी सायंकाळी मोंढ्यातच ठाण मांडून बसले होते. आजही दिवसभर अनेक नेते येऊन सोकिया व दायमा यांना भेटून गेले. याशिवाय अन्य ओळखीच्या व्यापाऱ्यांना भेटून पाठिंब्यासाठी दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘जे पॅनल आमच्या मागण्या मान्य करील त्यास आम्ही पाठिंबा देऊ; पण त्या आधी मोंढ्यातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल,’ अशी माहिती व्यापारी संजय कांकरिया यांनी दिली.