शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता वैयक्तिक भेटींवर ‘विशेष’ भर

By admin | Updated: April 17, 2017 23:35 IST

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता थंडावल्या.

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता थंडावल्या. गेल्या १५ दिवसांपासून तळपत्या उन्हात प्रचार सभा, रॅली, पदयात्रा, रोड शो काढून उमेदवारांनी धुराळा उडवून दिला होता. काँग्रेस, भाजपा, परिवर्तन आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचाराची राळ उडविली होती. अखेर सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास प्रचाराच्या तोफा थंडावल्या. दरम्यान, १९ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत मतदान होणार आहे.महानगरपालिकेच्या एकूण १८ प्रभागांतील ७० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सभा, कॉर्नर बैठका, गृहभेटी, पदयात्रा काढून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सभांचा आणि प्रचारफेऱ्यांचा माहोल होता. गेल्या १५ दिवसांत काँग्रेस पक्षाच्या वतीने अनेक सभा घेण्यात आल्या. आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री पतंगराव कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, अली अझिझी, बसवराज पाटील आदींनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेऊन प्रचारात रंगत आणली. तसेच सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनीही काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो घेऊन काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रचार यंत्रणा राबविली. भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, शहानवाज हुसेन, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपा-रिपाइं उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात ठिकठिकाणी सभा घेतल्या. एकूण १८ प्रभाग असलेल्या लातूर शहरात या नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा झाल्या. अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सभा झाली. यावेळी भाजपाच्या सर्वच उमेदवारांची उपस्थिती होती. महाराष्ट्र विकास आघाडी, एमआयएम, शेतकरी संघटनेच्या परिवर्तन आघाडीनेही लातूर शहरात प्रचाराची राळ उठविली. परिवर्तन आघाडीचे एकूण ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एमआयएमचे संस्थापक खा. असदुद्दीन ओवेसी यांच्या दोन सभा निवडणूक प्रचारकाळात झाल्या. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीही एक जाहीर सभा झाली होती. ओवेसी यांनी लातूर शहरात दोन सभा व दोनवेळा रोड शो घेऊन मतदारांना परिवर्तन आघाडीकडे वळविण्याचा प्रयत्न केला. आ. इम्तियाज जलील, अ‍ॅड. आण्णाराव पाटील आदींनी या उमेदवारांच्या प्रचारासाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)