शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

कार्यक्रम बंद, ‘आम आदमी’ चर्चेतूनही बाद

By admin | Updated: July 29, 2014 01:14 IST

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीची शहरात सुरू असलेली चर्चा आता विधानसभेच्या तोंडावर जवळपास बंद झाली असून, पार्टीचे कार्यक्रमही चांगलेच थंडावले आहेत.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीची शहरात सुरू असलेली चर्चा आता विधानसभेच्या तोंडावर जवळपास बंद झाली असून, पार्टीचे कार्यक्रमही चांगलेच थंडावले आहेत. दिल्लीत सरकारात आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची शहरात मोठी चर्चा सुरू झाली होती. लोकसभा निवडणुकीत तर आम आदमी पार्टीचा मोठा गाजावाजा झाला होता. पार्टीने शहरात केलेल्या सदस्य नोंदणीत २३ हजारांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली होती. परंतु लोकसभा निवडणुकीत आपच्या उमेदवाराला सदस्य नोंदणी एवढेही मतदान झाले नाही. देशपातळीवरही पक्षाची कामगिरी नोंद घ्यावी एवढी लक्षणीय ठरली नाही. त्यामुळे आपचे आलेले वादळ अल्पावधीतच शमल्याचे दिसते आहे. विस्तार व बांधणीचे काम सुरूहरमितसिंग यांनी सांगितले की, सध्या पक्ष विस्तार व बांधणीवर लक्ष देतो आहे. त्यामुळे इतर कार्यक्रम दिले जात नाहीत. प्रत्येक सरकारी कार्यालयाबाहेर सकृतदर्शनी ‘नागरिकांच्या हक्काची सनद’ लावणे बंधनकारक आहे; परंतु सर्वच कार्यालयांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ही सनद कार्यालयासमोर लावण्याचा उपक्रम पक्षातर्फे राबविला जात आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षाने यापूर्वी केलेल्या सदस्य नोंदणीतील सक्रिय सदस्यांचा शोध घेतला जात आहे. त्यातून जिल्हा कार्यकारिणीची निवड होईल. जिल्हा कार्यकारिणीनंतर विभागीय कार्यकारिणी व नंतर राज्य कार्यकारिणी गठीत केली जाणार आहे. यासंदर्भात पक्षाच्या राष्ट्रीय कौन्सिलकडे दोन्ही बाजूची मते नोंदविण्यात आली आहेत. त्यावर आठवडाभरात निर्णय होईल, असे आपचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुभाष लोमटे यांनी सांगितले. लोमटे म्हणाले, आम्ही पक्षपातळीवर कार्यक्रम घेत आहोत. वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा सुरू आहे. येत्या रविवारी (दि.३) पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात सुरेश खोपडे मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक लढविण्यावर लवकरच निर्णयमहाराष्ट्रासह देशात होणाऱ्या चार राज्यांतील निवडणुक ीपैकी फक्त हरियाणात विधानसभा लढण्याचे मत अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. त्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, महाराष्ट्रातील चांगल्या २०-३० जागा किमान लढवाव्यात, यासाठी पक्षनेतृत्वाकडे मागणी केली जाणार आहे.