शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
4
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
5
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
6
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
7
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
8
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
9
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
10
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
11
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
12
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
13
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
14
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
15
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
16
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
17
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
18
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
19
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
20
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार

कार्यक्रम बंद, ‘आम आदमी’ चर्चेतूनही बाद

By admin | Updated: July 29, 2014 01:14 IST

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीची शहरात सुरू असलेली चर्चा आता विधानसभेच्या तोंडावर जवळपास बंद झाली असून, पार्टीचे कार्यक्रमही चांगलेच थंडावले आहेत.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीची शहरात सुरू असलेली चर्चा आता विधानसभेच्या तोंडावर जवळपास बंद झाली असून, पार्टीचे कार्यक्रमही चांगलेच थंडावले आहेत. दिल्लीत सरकारात आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची शहरात मोठी चर्चा सुरू झाली होती. लोकसभा निवडणुकीत तर आम आदमी पार्टीचा मोठा गाजावाजा झाला होता. पार्टीने शहरात केलेल्या सदस्य नोंदणीत २३ हजारांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली होती. परंतु लोकसभा निवडणुकीत आपच्या उमेदवाराला सदस्य नोंदणी एवढेही मतदान झाले नाही. देशपातळीवरही पक्षाची कामगिरी नोंद घ्यावी एवढी लक्षणीय ठरली नाही. त्यामुळे आपचे आलेले वादळ अल्पावधीतच शमल्याचे दिसते आहे. विस्तार व बांधणीचे काम सुरूहरमितसिंग यांनी सांगितले की, सध्या पक्ष विस्तार व बांधणीवर लक्ष देतो आहे. त्यामुळे इतर कार्यक्रम दिले जात नाहीत. प्रत्येक सरकारी कार्यालयाबाहेर सकृतदर्शनी ‘नागरिकांच्या हक्काची सनद’ लावणे बंधनकारक आहे; परंतु सर्वच कार्यालयांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ही सनद कार्यालयासमोर लावण्याचा उपक्रम पक्षातर्फे राबविला जात आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षाने यापूर्वी केलेल्या सदस्य नोंदणीतील सक्रिय सदस्यांचा शोध घेतला जात आहे. त्यातून जिल्हा कार्यकारिणीची निवड होईल. जिल्हा कार्यकारिणीनंतर विभागीय कार्यकारिणी व नंतर राज्य कार्यकारिणी गठीत केली जाणार आहे. यासंदर्भात पक्षाच्या राष्ट्रीय कौन्सिलकडे दोन्ही बाजूची मते नोंदविण्यात आली आहेत. त्यावर आठवडाभरात निर्णय होईल, असे आपचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुभाष लोमटे यांनी सांगितले. लोमटे म्हणाले, आम्ही पक्षपातळीवर कार्यक्रम घेत आहोत. वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा सुरू आहे. येत्या रविवारी (दि.३) पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात सुरेश खोपडे मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक लढविण्यावर लवकरच निर्णयमहाराष्ट्रासह देशात होणाऱ्या चार राज्यांतील निवडणुक ीपैकी फक्त हरियाणात विधानसभा लढण्याचे मत अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. त्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, महाराष्ट्रातील चांगल्या २०-३० जागा किमान लढवाव्यात, यासाठी पक्षनेतृत्वाकडे मागणी केली जाणार आहे.