शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

परवाना शुल्क वसूल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शहरातील व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावण्याचे आदेश २०१३ मध्ये राज्य शासनाने महापालिकेला दिले होते. मात्र, प्रशासनाने मागील ८ ...

औरंगाबाद : शहरातील व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावण्याचे आदेश २०१३ मध्ये राज्य शासनाने महापालिकेला दिले होते. मात्र, प्रशासनाने मागील ८ वर्षांमध्ये अंमलबजावणी केली नाही. राज्याच्या लोकलेखा समितीने फेब्रुवारी २०२१ मध्ये अत्यंत कडक शब्दात मनपा प्रशासनाचे कान टाेचले होते. त्यानंतर मनपाने शुल्क लावण्याचे आश्वासन समितीला दिले. १ एप्रिलपासून शुल्क लावण्यात आला नाही. आता समितीने महापालिकेला अनुपालन अहवालच सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने शुल्क लावण्याची अंतिम प्रक्रिया सुरू केली.

महापालिकेच्या महसुलात भर घालण्यासाठी राज्य शासनाने ८ वर्षांपूर्वी शहारातील व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावण्याचे आदेश दिले. राज्यातील क वर्ग महापालिकांनी मागील काही वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू केली आहे. औरंगाबाद महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. नागपूर येथील महालेखाकार यांनी महापालिकेवर ताशेरे ओढले. त्यामुळे २०१८ मध्ये मनपा सर्वसाधारण सभेत व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावण्याचा ठराव मंजूर केला. शहरातील व्यापाऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला. फेब्रुवारी २०२१ मध्ये राज्याच्या लोकलेखा समितीने मनपा प्रशासनाला पाचारण करून आजपर्यंत अंमलबजावणी का केली नाही, अशी विचारणा केली. मनपाने १ एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे नमूद केले. आता तो कालावधीही उलटला. तरी मनपाने अनुपालन अहवाल सादर केला नाही. दोन दिवसांपूर्वीच कक्ष अधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडून मनपाला विचारणा करण्यात आली. आता थेट अनुपालन अहवालच सादर करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे मनपाच्या करमूल्य निर्धारण विभागाने परवाना शुल्क वसूल करण्यासाठी अंतिम प्रक्रिया सुरू केली आहे.

आता शासनाला अहवाल सादर करावा लागणार

व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावण्याच्या संदर्भात अनुपालन अहवाल सादर करावाच लागणार आहे. यासंदर्भात अंतिम तयारी सुरू आहे. लवकरच निर्णय होईल. मालमत्ता कर वसूल करणाऱ्या वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडूनच ही रक्कम वसूल करण्यात येईल.

अपर्णा थेटे, उपायुक्त

आठ कोटींचे उत्पन्न अपेक्षित

परवाना शुल्कातून मनपाला दरवर्षी ८ कोटींचे उत्पन्न मिळेल. क वर्ग महापालिकेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच लहान मोठ्या व्यावसायिकांकडून शुल्क वसूल करण्यात येणार आहे.