शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘नियोजन’च्या ‘प्रोसिडींग’ला मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:46 IST

जिल्हा नियोजन समितीच्या साडे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीचे प्रोसिडींग अद्यापही तयार झाले नसून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या संदर्भात वेळ मिळत नसल्याने त्यांच्याच स्तरावर ही फाईल प्रलंबित आहे. त्याचा विकासकामांवर परिणाम होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा नियोजन समितीच्या साडे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीचे प्रोसिडींग अद्यापही तयार झाले नसून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या संदर्भात वेळ मिळत नसल्याने त्यांच्याच स्तरावर ही फाईल प्रलंबित आहे. त्याचा विकासकामांवर परिणाम होत आहे.जिल्हा नियोजन समितीची १५ मे रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. बैठकीत झालेल्या निर्णयाविषयीचा कार्यवृत्तांत अहवाल (प्रोसिडींग) तातडीने तयार करणे आवश्यक असते. त्यानुसार प्रशासकीय यंत्रणा कामाला लागते; परंतु, या बैठकीचे प्रोसिडींग तब्बल साडेतीन महिन्यानंतरही तयार झालेले नाही. या संदर्भातील फाईल पालकमंत्री गुुलाबराव पाटील यांच्या मुंबई येथील कार्यालयाकडे पाठविण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले़ पालकमंत्री पाटील यांना यावर निर्णय घेण्यास वेळ मिळत नाही. परिणामी प्रोसिडींगची फाईल प्रलंबित आहे. विशेष म्हणजे गुलाबराव पाटील यांची पालकमंत्री पदावर नियुक्ती झाल्यापासून त्यांना परभणीसाठी फारसा वेळच मिळत नाही. १ मे व १५ आॅगस्टच्या ध्वजारोहणाला ते आले. परभणी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या वेळीही त्यांचा धावता दौरा होता. त्यानंतर सिमूरगव्हाण येथील धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांचा दौरा झाला. या दौºयात त्यांनी एकही प्रशासकीय बैठक घेतली नाही. मुळात जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांमधील अंतर्गत वादामुळेच त्यांना परभणीच्या पालकमंत्रीपदात रस नसल्याचे समजते. त्यातूनच परभणीशी संबंधित निर्णय लवकर घेतले जात नसल्याची चर्चा आहे. त्यांनी १५ ते २० दिवसांपूर्वी परभणीच्या अधिकाºयांची मुंबईत बैठक घेतली होती. या बैठकीत काही सूचना देण्यात आल्या. परंतु, त्याची अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी करणारी स्थानिक पातळीवरील यंत्रणा त्यांनी स्थापन केलेली नाही. परिणामी विकासकामे ठप्प होत आहेत. दिवाकर रावते पालकमंत्रीपदी होते त्यावेळी ते सातत्याने विकास कामांचा आढावा घेत होते़ शिवाय त्यांचा नियमित जिल्हा दौरा असायचा़ त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सक्रिय रहायची; परंतु, आता गुलाबराव पाटील यांना परभणीला येण्यासाठी वेळ मिळत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा ही सुस्त झाली आहे़ परिणामी विकास कामे मार्गी लागेनाशी झाली आहेत़