शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

विद्यार्थिनी वसतिगृहातील समस्यांचा भांडाफोड, अधिकाऱ्यांची धावपळ अन् दुरुस्तीचे प्रयत्न

By राम शिनगारे | Updated: January 24, 2024 16:05 IST

मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी थातूरमातूरपणे काही समस्या सोडविण्याचा प्रयत्नही केला.

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थिनींकडून तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर पदवीधरच्या अधिसभा सदस्याने विद्यार्थी कल्याण संचालकांसह इतर अधिकाऱ्यांना वसतिगृहात पाहणीसाठी मंगळवारी बोलावून घेतले. तेव्हा धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या. मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी थातूरमातूरपणे काही समस्या सोडविण्याचा प्रयत्नही केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात वर्षभरापासून दुरुस्ती अभावी गार पाण्याने विद्यार्थ्यांना स्नान करावे लागत असल्याचे महिनाभरापूर्वी उघडकीस आले हाेते. तेव्हाच कुलगुरूंनी मालमत्ता विभागाची बैठक घेत विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे आदेश दिले होते. मुलांना गरम पाणी तत्काळ सुरू करण्यात आले. त्यावेळी अधिसभा सदस्य प्रा. हरिदास (बंडू) सोमवंशी यांनी पुढाकार घेतला होता. विद्यापीठात मुलींची पाच वसतिगृहे आहेत. त्यात अनेक समस्या असल्याच्या तक्रारी विद्यार्थिनींनी प्रा. सोमवंशी यांच्याकडे केल्या. त्यानुसार प्रा. सोमवंशी यांनी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. कैलास अंभुरे यांच्यासह मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना वसतिगृहात बोलावून घेतले.

तेव्हा रमाबाई आंबेडकर मुलींच्या वसतिगृहात स्नानासाठी गरम पाणी नाही, पिण्याचे पाणी नाही, लाइट, फॅन नादुरुस्त आढळले, सगळीकडे अस्वच्छता होती, स्वच्छतागृहाचा नळ बंद आढळला, वसतिगृहाच्या समोरचा हेडलाइट बंद होता. इंटरनेटची सुविधा उपलब्ध नव्हती. यशवंत मुलींच्या वसतिगृहात इंटरनेट स्विचला वीजपुरवठा नाही, सर्व संगणक धूळखात पडून, नादुरुस्त झालेले दिसले, दरवाजे तुटले, सोलारचे ट्यूब लाइट बंद, नळ बंद, पाणी वापरण्याची टाकी फुटलेली होती, पिण्याच्या पाण्याचे वॉटर कुलरला हात लावल्यास विजेचा धक्का बसत होता. प्रियदर्शनी मुलींच्या वसतिगृहात सगळीकडेच अस्वच्छता, सॅनिटरी पॅडची मशीन बंद, नळ खराब झालेले होते, मुख्य टाकीमध्ये पाणीच नाही, मागच्या बाजूची लाइट बंद, महानगरपालिकेची घंटागाडी येत नसल्यामुळे सगळीकडे कचऱ्याचे ढीग आढळून आले. या पाहणीनंतर विद्यार्थी कल्याण संचालकांनी दुरूस्ती करण्याविषयी सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना सुविधा पुरवाव्यातविद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविल्या पाहिजेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांसह लोकप्रतिनिधी वारंवार निवेदन देत आहेत. तरी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.- प्रा. हरिदास ऊर्फ बंडू सोमवंशी, अधिसभा सदस्य, पदवीधर

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र