शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

विद्यार्थिनी वसतिगृहातील समस्यांचा भांडाफोड, अधिकाऱ्यांची धावपळ अन् दुरुस्तीचे प्रयत्न

By राम शिनगारे | Updated: January 24, 2024 16:05 IST

मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी थातूरमातूरपणे काही समस्या सोडविण्याचा प्रयत्नही केला.

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थिनींकडून तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर पदवीधरच्या अधिसभा सदस्याने विद्यार्थी कल्याण संचालकांसह इतर अधिकाऱ्यांना वसतिगृहात पाहणीसाठी मंगळवारी बोलावून घेतले. तेव्हा धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या. मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी थातूरमातूरपणे काही समस्या सोडविण्याचा प्रयत्नही केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात वर्षभरापासून दुरुस्ती अभावी गार पाण्याने विद्यार्थ्यांना स्नान करावे लागत असल्याचे महिनाभरापूर्वी उघडकीस आले हाेते. तेव्हाच कुलगुरूंनी मालमत्ता विभागाची बैठक घेत विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे आदेश दिले होते. मुलांना गरम पाणी तत्काळ सुरू करण्यात आले. त्यावेळी अधिसभा सदस्य प्रा. हरिदास (बंडू) सोमवंशी यांनी पुढाकार घेतला होता. विद्यापीठात मुलींची पाच वसतिगृहे आहेत. त्यात अनेक समस्या असल्याच्या तक्रारी विद्यार्थिनींनी प्रा. सोमवंशी यांच्याकडे केल्या. त्यानुसार प्रा. सोमवंशी यांनी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. कैलास अंभुरे यांच्यासह मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना वसतिगृहात बोलावून घेतले.

तेव्हा रमाबाई आंबेडकर मुलींच्या वसतिगृहात स्नानासाठी गरम पाणी नाही, पिण्याचे पाणी नाही, लाइट, फॅन नादुरुस्त आढळले, सगळीकडे अस्वच्छता होती, स्वच्छतागृहाचा नळ बंद आढळला, वसतिगृहाच्या समोरचा हेडलाइट बंद होता. इंटरनेटची सुविधा उपलब्ध नव्हती. यशवंत मुलींच्या वसतिगृहात इंटरनेट स्विचला वीजपुरवठा नाही, सर्व संगणक धूळखात पडून, नादुरुस्त झालेले दिसले, दरवाजे तुटले, सोलारचे ट्यूब लाइट बंद, नळ बंद, पाणी वापरण्याची टाकी फुटलेली होती, पिण्याच्या पाण्याचे वॉटर कुलरला हात लावल्यास विजेचा धक्का बसत होता. प्रियदर्शनी मुलींच्या वसतिगृहात सगळीकडेच अस्वच्छता, सॅनिटरी पॅडची मशीन बंद, नळ खराब झालेले होते, मुख्य टाकीमध्ये पाणीच नाही, मागच्या बाजूची लाइट बंद, महानगरपालिकेची घंटागाडी येत नसल्यामुळे सगळीकडे कचऱ्याचे ढीग आढळून आले. या पाहणीनंतर विद्यार्थी कल्याण संचालकांनी दुरूस्ती करण्याविषयी सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना सुविधा पुरवाव्यातविद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविल्या पाहिजेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांसह लोकप्रतिनिधी वारंवार निवेदन देत आहेत. तरी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.- प्रा. हरिदास ऊर्फ बंडू सोमवंशी, अधिसभा सदस्य, पदवीधर

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र