शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

विद्यार्थिनी वसतिगृहातील समस्यांचा भांडाफोड, अधिकाऱ्यांची धावपळ अन् दुरुस्तीचे प्रयत्न

By राम शिनगारे | Updated: January 24, 2024 16:05 IST

मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी थातूरमातूरपणे काही समस्या सोडविण्याचा प्रयत्नही केला.

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थिनींकडून तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर पदवीधरच्या अधिसभा सदस्याने विद्यार्थी कल्याण संचालकांसह इतर अधिकाऱ्यांना वसतिगृहात पाहणीसाठी मंगळवारी बोलावून घेतले. तेव्हा धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या. मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी थातूरमातूरपणे काही समस्या सोडविण्याचा प्रयत्नही केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात वर्षभरापासून दुरुस्ती अभावी गार पाण्याने विद्यार्थ्यांना स्नान करावे लागत असल्याचे महिनाभरापूर्वी उघडकीस आले हाेते. तेव्हाच कुलगुरूंनी मालमत्ता विभागाची बैठक घेत विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे आदेश दिले होते. मुलांना गरम पाणी तत्काळ सुरू करण्यात आले. त्यावेळी अधिसभा सदस्य प्रा. हरिदास (बंडू) सोमवंशी यांनी पुढाकार घेतला होता. विद्यापीठात मुलींची पाच वसतिगृहे आहेत. त्यात अनेक समस्या असल्याच्या तक्रारी विद्यार्थिनींनी प्रा. सोमवंशी यांच्याकडे केल्या. त्यानुसार प्रा. सोमवंशी यांनी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. कैलास अंभुरे यांच्यासह मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना वसतिगृहात बोलावून घेतले.

तेव्हा रमाबाई आंबेडकर मुलींच्या वसतिगृहात स्नानासाठी गरम पाणी नाही, पिण्याचे पाणी नाही, लाइट, फॅन नादुरुस्त आढळले, सगळीकडे अस्वच्छता होती, स्वच्छतागृहाचा नळ बंद आढळला, वसतिगृहाच्या समोरचा हेडलाइट बंद होता. इंटरनेटची सुविधा उपलब्ध नव्हती. यशवंत मुलींच्या वसतिगृहात इंटरनेट स्विचला वीजपुरवठा नाही, सर्व संगणक धूळखात पडून, नादुरुस्त झालेले दिसले, दरवाजे तुटले, सोलारचे ट्यूब लाइट बंद, नळ बंद, पाणी वापरण्याची टाकी फुटलेली होती, पिण्याच्या पाण्याचे वॉटर कुलरला हात लावल्यास विजेचा धक्का बसत होता. प्रियदर्शनी मुलींच्या वसतिगृहात सगळीकडेच अस्वच्छता, सॅनिटरी पॅडची मशीन बंद, नळ खराब झालेले होते, मुख्य टाकीमध्ये पाणीच नाही, मागच्या बाजूची लाइट बंद, महानगरपालिकेची घंटागाडी येत नसल्यामुळे सगळीकडे कचऱ्याचे ढीग आढळून आले. या पाहणीनंतर विद्यार्थी कल्याण संचालकांनी दुरूस्ती करण्याविषयी सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना सुविधा पुरवाव्यातविद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविल्या पाहिजेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांसह लोकप्रतिनिधी वारंवार निवेदन देत आहेत. तरी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.- प्रा. हरिदास ऊर्फ बंडू सोमवंशी, अधिसभा सदस्य, पदवीधर

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र