शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

३५००० रिक्षाचालकांच्या रोटीचा प्रश्न सुटला; इतरांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे रोजगार बुडणार असल्याने आर्थिक मदत व्हावी आणि कोरोनाची साखळी तुटावी यासाठी परवानाधारक रिक्षाचालकांना ...

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे रोजगार बुडणार असल्याने आर्थिक मदत व्हावी आणि कोरोनाची साखळी तुटावी यासाठी परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्याची घोषणा शासनाने केली आहे. यामुळे जिल्ह्यातील ३५००० रिक्षाचालकांच्या रोटीचा प्रश्न सुटला आहे.

शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून लाॅकडाऊनची घोषणा करून कडक निर्बंध घातले आहेत. त्यात हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांसाठी शासनाने दीड हजाराची मदत जाहीर केली. या मिळणाऱ्या राशीतून रिक्षाचालकांच्या रोटीचा प्रश्न सुटला आहे, असे जरी आपण म्हणत असलो तरी रिक्षाचालक मात्र यावर खुश नाहीत. परवान्यासाठी १० हजार रुपये शासनाने घेतले आहेत. तीन जणांची परवानगी असताना शासनाने कोरोनामुळे दोघांनाच परवानगी दिली आहे. प्रवाशांची ने-आण करताना रिक्षाचालकांना इंधनामुळे ते परवडणारे नाही. नुकतेच औरंगाबाद शहरात रिक्षा चालकाला पावती देण्यात आली होती. यावर न्यायालयात दाद मागितली असता ती पावती रद्द झाली. परवाना तीन जणांचा असताना दोनच प्रवासी का, असा सवाल आहे.

इतरही कष्टकरी व हातावर पोट असणारे आहेत. त्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न उठतो आहे. त्याचा विचारदेखील शासनाने करायला हवा होता.

लॉकडाऊनमध्ये रिक्षा चालविताना दिवसभराची कमाई इंधनात घालावी लागते. रस्ते सुनसान झाल्यास प्रवासी मिळत नाहीत. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिल्यास व्यवसायही तेजीत चालू शकतो; परंतु कोरोनाच्या भीतीमुळे ते शक्य नाही. शासनाने घालून दिलेले नियम पाळावे लागणार आहेत.

जिल्ह्यात रिक्षांची संख्या..

३५०००

मागितले १० हजार, घोषणा दीड हजाराची...

शासनाकडे रिक्षा चालक संघटनांनी १० हजारांची मागणी केली होती. रिक्षाचालकांच्या इंधनाचा खर्च लक्षात घेता शासनाने देऊ केलेल्या रकमेतून कसा प्रश्न सुटणार. -निसार अहमद (प्रतिक्रिया)

पण हे पैसे मिळणार कसे..

परवानाधारक रिक्षाचालकांना ही राशी शासन टाकणार कशी, आरटीओमार्फत की त्यांच्या खात्यात, याचा मात्र उलगडा झालेला नाही. चालक मात्र अद्याप संभ्रमात आहेत. -राजू देहाडे (प्रतिक्रिया)

लाॅकडाऊनमध्ये मदत होईल...

लॉकडाऊनमध्ये धंदे नाहीत, बँकांकडून व्याज माफी किंवा कर्जमाफी असा कोणताही आदेश आलेला नाही. त्यामुळे त्यांचा वसुलीचा दणका सुरूच आहे. त्याकडे लक्ष द्यावे, शासन देत आहे, तर मदत होईल.- भारत भिंगारदेव (प्रतिक्रिया)