शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

३५००० रिक्षाचालकांच्या रोटीचा प्रश्न सुटला; इतरांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे रोजगार बुडणार असल्याने आर्थिक मदत व्हावी आणि कोरोनाची साखळी तुटावी यासाठी परवानाधारक रिक्षाचालकांना ...

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे रोजगार बुडणार असल्याने आर्थिक मदत व्हावी आणि कोरोनाची साखळी तुटावी यासाठी परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्याची घोषणा शासनाने केली आहे. यामुळे जिल्ह्यातील ३५००० रिक्षाचालकांच्या रोटीचा प्रश्न सुटला आहे.

शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून लाॅकडाऊनची घोषणा करून कडक निर्बंध घातले आहेत. त्यात हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांसाठी शासनाने दीड हजाराची मदत जाहीर केली. या मिळणाऱ्या राशीतून रिक्षाचालकांच्या रोटीचा प्रश्न सुटला आहे, असे जरी आपण म्हणत असलो तरी रिक्षाचालक मात्र यावर खुश नाहीत. परवान्यासाठी १० हजार रुपये शासनाने घेतले आहेत. तीन जणांची परवानगी असताना शासनाने कोरोनामुळे दोघांनाच परवानगी दिली आहे. प्रवाशांची ने-आण करताना रिक्षाचालकांना इंधनामुळे ते परवडणारे नाही. नुकतेच औरंगाबाद शहरात रिक्षा चालकाला पावती देण्यात आली होती. यावर न्यायालयात दाद मागितली असता ती पावती रद्द झाली. परवाना तीन जणांचा असताना दोनच प्रवासी का, असा सवाल आहे.

इतरही कष्टकरी व हातावर पोट असणारे आहेत. त्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न उठतो आहे. त्याचा विचारदेखील शासनाने करायला हवा होता.

लॉकडाऊनमध्ये रिक्षा चालविताना दिवसभराची कमाई इंधनात घालावी लागते. रस्ते सुनसान झाल्यास प्रवासी मिळत नाहीत. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिल्यास व्यवसायही तेजीत चालू शकतो; परंतु कोरोनाच्या भीतीमुळे ते शक्य नाही. शासनाने घालून दिलेले नियम पाळावे लागणार आहेत.

जिल्ह्यात रिक्षांची संख्या..

३५०००

मागितले १० हजार, घोषणा दीड हजाराची...

शासनाकडे रिक्षा चालक संघटनांनी १० हजारांची मागणी केली होती. रिक्षाचालकांच्या इंधनाचा खर्च लक्षात घेता शासनाने देऊ केलेल्या रकमेतून कसा प्रश्न सुटणार. -निसार अहमद (प्रतिक्रिया)

पण हे पैसे मिळणार कसे..

परवानाधारक रिक्षाचालकांना ही राशी शासन टाकणार कशी, आरटीओमार्फत की त्यांच्या खात्यात, याचा मात्र उलगडा झालेला नाही. चालक मात्र अद्याप संभ्रमात आहेत. -राजू देहाडे (प्रतिक्रिया)

लाॅकडाऊनमध्ये मदत होईल...

लॉकडाऊनमध्ये धंदे नाहीत, बँकांकडून व्याज माफी किंवा कर्जमाफी असा कोणताही आदेश आलेला नाही. त्यामुळे त्यांचा वसुलीचा दणका सुरूच आहे. त्याकडे लक्ष द्यावे, शासन देत आहे, तर मदत होईल.- भारत भिंगारदेव (प्रतिक्रिया)