शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

इंजेक्शनसाठी खाजगी, अन्य जिल्ह्यांतील ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण घाटीत रेफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णसंख्येपुढे उपचारासाठी लागणारे इंजेक्शन अपुरे पडत आहेत. ही स्थिती संपूर्ण राज्यभरात आहे. अशा परिस्थितीत खासगी रुग्णालय ...

औरंगाबाद : ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णसंख्येपुढे उपचारासाठी लागणारे इंजेक्शन अपुरे पडत आहेत. ही स्थिती संपूर्ण राज्यभरात आहे. अशा परिस्थितीत खासगी रुग्णालय आणि अन्य जिल्ह्यांतून ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांना घाटीत रेफर केले जात आहे.

औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’ची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५९६वर गेली असून, यातील तब्बल ३४३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. एकाच वेळी तीनशेवर रुग्ण भरती असल्याने उपचाराचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे उभे राहिले आहे. ‘म्युकरमायकोसिस’च्या एका रुग्णाला रोज तीन यानुसार १४ दिवसांत ४२ इंजेक्शन द्यावे लागतात. रुग्णांसाठी आवश्यक इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न केला जात आहे. पण रुग्णांच्या नातेवाइकांची आणि खासगी रुग्णालयांकडून इंजेक्शनची शोधाशोध सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून इंजेक्शन मिळतात. परंतु त्याची संख्या अगदी कमी आहे. दुसरीकडे घाटीतील रुग्णांसाठी पुरेसे इंजेक्शन्स प्राप्त होत आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण आता घाटीत दाखल होण्यावर भर देत आहेत. अहमदनगरसह अन्य जिल्ह्यांतील रुग्णही घाटीत भरती होत आहेत.

शस्त्रक्रियेनंतर घाटीत

लवकर निदान झाले तर बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. दररोज इंजेक्शन्स उपलब्ध होत आहेत. घाटीतील रुग्णांसाठी पुरेसे इंजेक्शन मिळत आहे. खासगी रुग्णालयातील रुग्ण शस्त्रक्रियेनंतर इंजेक्शनसाठी घाटीत दाखल होत आहेत, असे कान, नाक, घसा विभागांचे डाॅ. वसंत पवार म्हणाले.