शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

पाणीपुरवठ्याला आधी प्राधान्य द्या

By admin | Updated: October 3, 2016 00:34 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार मनपाने शनिवारी सायंकाळी रद्द केला.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार मनपाने शनिवारी सायंकाळी रद्द केला. त्यानंतर लगेचच संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याचा ताबा प्रशासनाने घेतला. रविवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. बैठकीत शहराच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य द्या, ठिकठिकाणी पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात असून, त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे. गळती युद्धपातळीवर बंद करा, असे आदेश आयुक्तांनी दिले.महापालिकेने १ सप्टेंबर २०१४ रोजी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला तब्बल २९५ लाईनमन दिले होते. मागील दोन वर्षांमध्ये काही लाईनमन मरण पावले. काही निवृत्त झाले. २९ कर्मचारी दोन वर्षांमध्ये कमी झाले. रविवारी सकाळी मनपाने कंपनीकडून २६७ लाईनमन ताब्यात घेतले. नियोजित वेळापत्रकानुसारच शहरातील सर्व लाईनमन, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे काम करावे अशा सूचना आयुक्तांनी बैठकीत दिल्या. जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत पाणीपुरवठा कुठेच विस्कळीत होणार नाही, याची काळजी घ्यावी. बैठकीस उपायुक्त अय्युब खान, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, एस.ए. चहल, उपअभियंता के.एम. फालक, यू.जी. शिरसाट, मिस्कीन, पद्मे आदींची उपस्थिती होती.शहराच्या विविध वसाहतींमध्ये लिकेज मोठ्या प्रमाणात आहेत. कालपर्यंत कंपनीकडे दुरुस्तीचे काम करणाऱ्या वेंडर बांधवांकडून लिकेज दूर करण्याचे काम करून घ्यावे. मनपाच्या प्रत्येक वॉर्ड कार्यालयाला दुरुस्तीसाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नाही. दुसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, सोमवारी ही निविदा उघडण्यात येईल.