शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पाणीपुरवठ्याला आधी प्राधान्य द्या

By admin | Updated: October 3, 2016 00:34 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार मनपाने शनिवारी सायंकाळी रद्द केला.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार मनपाने शनिवारी सायंकाळी रद्द केला. त्यानंतर लगेचच संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याचा ताबा प्रशासनाने घेतला. रविवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. बैठकीत शहराच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य द्या, ठिकठिकाणी पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात असून, त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे. गळती युद्धपातळीवर बंद करा, असे आदेश आयुक्तांनी दिले.महापालिकेने १ सप्टेंबर २०१४ रोजी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला तब्बल २९५ लाईनमन दिले होते. मागील दोन वर्षांमध्ये काही लाईनमन मरण पावले. काही निवृत्त झाले. २९ कर्मचारी दोन वर्षांमध्ये कमी झाले. रविवारी सकाळी मनपाने कंपनीकडून २६७ लाईनमन ताब्यात घेतले. नियोजित वेळापत्रकानुसारच शहरातील सर्व लाईनमन, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे काम करावे अशा सूचना आयुक्तांनी बैठकीत दिल्या. जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत पाणीपुरवठा कुठेच विस्कळीत होणार नाही, याची काळजी घ्यावी. बैठकीस उपायुक्त अय्युब खान, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, एस.ए. चहल, उपअभियंता के.एम. फालक, यू.जी. शिरसाट, मिस्कीन, पद्मे आदींची उपस्थिती होती.शहराच्या विविध वसाहतींमध्ये लिकेज मोठ्या प्रमाणात आहेत. कालपर्यंत कंपनीकडे दुरुस्तीचे काम करणाऱ्या वेंडर बांधवांकडून लिकेज दूर करण्याचे काम करून घ्यावे. मनपाच्या प्रत्येक वॉर्ड कार्यालयाला दुरुस्तीसाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नाही. दुसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, सोमवारी ही निविदा उघडण्यात येईल.