शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याला आधी प्राधान्य द्या

By admin | Updated: October 3, 2016 00:34 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार मनपाने शनिवारी सायंकाळी रद्द केला.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार मनपाने शनिवारी सायंकाळी रद्द केला. त्यानंतर लगेचच संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याचा ताबा प्रशासनाने घेतला. रविवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. बैठकीत शहराच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य द्या, ठिकठिकाणी पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात असून, त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे. गळती युद्धपातळीवर बंद करा, असे आदेश आयुक्तांनी दिले.महापालिकेने १ सप्टेंबर २०१४ रोजी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला तब्बल २९५ लाईनमन दिले होते. मागील दोन वर्षांमध्ये काही लाईनमन मरण पावले. काही निवृत्त झाले. २९ कर्मचारी दोन वर्षांमध्ये कमी झाले. रविवारी सकाळी मनपाने कंपनीकडून २६७ लाईनमन ताब्यात घेतले. नियोजित वेळापत्रकानुसारच शहरातील सर्व लाईनमन, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे काम करावे अशा सूचना आयुक्तांनी बैठकीत दिल्या. जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत पाणीपुरवठा कुठेच विस्कळीत होणार नाही, याची काळजी घ्यावी. बैठकीस उपायुक्त अय्युब खान, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, एस.ए. चहल, उपअभियंता के.एम. फालक, यू.जी. शिरसाट, मिस्कीन, पद्मे आदींची उपस्थिती होती.शहराच्या विविध वसाहतींमध्ये लिकेज मोठ्या प्रमाणात आहेत. कालपर्यंत कंपनीकडे दुरुस्तीचे काम करणाऱ्या वेंडर बांधवांकडून लिकेज दूर करण्याचे काम करून घ्यावे. मनपाच्या प्रत्येक वॉर्ड कार्यालयाला दुरुस्तीसाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नाही. दुसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, सोमवारी ही निविदा उघडण्यात येईल.