शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

उद्योगाला नव्हे शेतीच्या पाण्याला प्राधान्य द्या

By admin | Updated: December 28, 2015 00:20 IST

लातूर : पिण्याच्या पाण्यानंतर शेती व शेतीनंतर उद्योगाला पाणी द्यावे, असे नियोजन असतानाही महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यानंतर उद्योगाला पाणी देण्याची भाषा केली जात आहे़

लातूर : पिण्याच्या पाण्यानंतर शेती व शेतीनंतर उद्योगाला पाणी द्यावे, असे नियोजन असतानाही महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यानंतर उद्योगाला पाणी देण्याची भाषा केली जात आहे़ उद्योगापूर्वी शेतीलाच पाणी दिले पाहिजे, असे मत जलतज्ञ विजयअण्णा बोराडे यांनी येथे रविवारी व्यक्त केले़ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्रात लातूरच्या वतीने शेती व शेतीचे भविष्या या विषयावरील आयोजित परिसंवादात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी खा़डॉ़जनार्दन वाघमारे होते़ मंचावर माजी आ़ पाशा पटेल, शेतकरी नेते विजय नावंदिया, अमर हबीब, लक्ष्मण वांगे, माजी न्यायमूर्ती विजयकुमार बोडके पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, प्राचार्य दर्शना देशमुख आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोराडे म्हणाले, पाणीटंचाईमुळे पाण्याची पळवापळव सुरु झाली आहे़ तुम्ही उजनीच्या पाण्यासाठी पाठपुरावा करीत आहात़ तर आम्ही भंडारदऱ्याच्या पाण्यासाठी भांडतो आहोत़ यातून शेतकऱ्यांचीच माती होते़ यापुढील कालावधीत अशीच परिस्थिती राहिली तर प्रसादाप्रमाणे पाणी मिळेल़ त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी पाण्यासाठी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी़ शासनाला काजुची शेती चालते, ऊसाची दारु चालते, मग गांजाची शेती का नको, असा सवालही त्यांनी केला़ पुढील ११ वर्ष पर्जन्यमान असेच राहील, असे भाकितही त्यांनी वर्तविले़ शेती आणि जनावरांची सांगड आपण सोडली आहे़ हार्वेस्टींग मशीनद्वारे हल्ली आपण राशी करीत आहोत़ त्यामुळे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढावली आहे, असेही बोराडे म्हणाले़अध्यक्षीय समारोपात बोलताना माजी खा़जनार्दन वाघमारे म्हणाले, शरद पवारांचे सर्व आयुष्य शेतकऱ्यांसाठी गेले आहे़ चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना मराठवाड्याला करावा लागत आहे़ मराठवाड्याचा दुष्काळवाडा झाला आहे़ त्यामुळे शेतकरी टिकेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे़ म्हणून शासनाबरोबर आपणही शेतीसाठी काहीतरी करणे गरजेचे आहे़ यावेळी माजी आ़ पाशा पटेल, शेतकरी नेते विजय जावंदिया, लक्ष्मण वंगे आदींनीही विचार मांडले़ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले़ तर आभार अ‍ॅड़ मनोहरराव गोमारे यांनी मानले़