शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

उद्योगाला नव्हे शेतीच्या पाण्याला प्राधान्य द्या

By admin | Updated: December 28, 2015 00:20 IST

लातूर : पिण्याच्या पाण्यानंतर शेती व शेतीनंतर उद्योगाला पाणी द्यावे, असे नियोजन असतानाही महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यानंतर उद्योगाला पाणी देण्याची भाषा केली जात आहे़

लातूर : पिण्याच्या पाण्यानंतर शेती व शेतीनंतर उद्योगाला पाणी द्यावे, असे नियोजन असतानाही महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यानंतर उद्योगाला पाणी देण्याची भाषा केली जात आहे़ उद्योगापूर्वी शेतीलाच पाणी दिले पाहिजे, असे मत जलतज्ञ विजयअण्णा बोराडे यांनी येथे रविवारी व्यक्त केले़ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्रात लातूरच्या वतीने शेती व शेतीचे भविष्या या विषयावरील आयोजित परिसंवादात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी खा़डॉ़जनार्दन वाघमारे होते़ मंचावर माजी आ़ पाशा पटेल, शेतकरी नेते विजय नावंदिया, अमर हबीब, लक्ष्मण वांगे, माजी न्यायमूर्ती विजयकुमार बोडके पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, प्राचार्य दर्शना देशमुख आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोराडे म्हणाले, पाणीटंचाईमुळे पाण्याची पळवापळव सुरु झाली आहे़ तुम्ही उजनीच्या पाण्यासाठी पाठपुरावा करीत आहात़ तर आम्ही भंडारदऱ्याच्या पाण्यासाठी भांडतो आहोत़ यातून शेतकऱ्यांचीच माती होते़ यापुढील कालावधीत अशीच परिस्थिती राहिली तर प्रसादाप्रमाणे पाणी मिळेल़ त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी पाण्यासाठी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी़ शासनाला काजुची शेती चालते, ऊसाची दारु चालते, मग गांजाची शेती का नको, असा सवालही त्यांनी केला़ पुढील ११ वर्ष पर्जन्यमान असेच राहील, असे भाकितही त्यांनी वर्तविले़ शेती आणि जनावरांची सांगड आपण सोडली आहे़ हार्वेस्टींग मशीनद्वारे हल्ली आपण राशी करीत आहोत़ त्यामुळे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढावली आहे, असेही बोराडे म्हणाले़अध्यक्षीय समारोपात बोलताना माजी खा़जनार्दन वाघमारे म्हणाले, शरद पवारांचे सर्व आयुष्य शेतकऱ्यांसाठी गेले आहे़ चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना मराठवाड्याला करावा लागत आहे़ मराठवाड्याचा दुष्काळवाडा झाला आहे़ त्यामुळे शेतकरी टिकेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे़ म्हणून शासनाबरोबर आपणही शेतीसाठी काहीतरी करणे गरजेचे आहे़ यावेळी माजी आ़ पाशा पटेल, शेतकरी नेते विजय जावंदिया, लक्ष्मण वंगे आदींनीही विचार मांडले़ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले़ तर आभार अ‍ॅड़ मनोहरराव गोमारे यांनी मानले़