शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

उद्योगाला नव्हे शेतीच्या पाण्याला प्राधान्य द्या

By admin | Updated: December 28, 2015 00:20 IST

लातूर : पिण्याच्या पाण्यानंतर शेती व शेतीनंतर उद्योगाला पाणी द्यावे, असे नियोजन असतानाही महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यानंतर उद्योगाला पाणी देण्याची भाषा केली जात आहे़

लातूर : पिण्याच्या पाण्यानंतर शेती व शेतीनंतर उद्योगाला पाणी द्यावे, असे नियोजन असतानाही महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यानंतर उद्योगाला पाणी देण्याची भाषा केली जात आहे़ उद्योगापूर्वी शेतीलाच पाणी दिले पाहिजे, असे मत जलतज्ञ विजयअण्णा बोराडे यांनी येथे रविवारी व्यक्त केले़ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्रात लातूरच्या वतीने शेती व शेतीचे भविष्या या विषयावरील आयोजित परिसंवादात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी खा़डॉ़जनार्दन वाघमारे होते़ मंचावर माजी आ़ पाशा पटेल, शेतकरी नेते विजय नावंदिया, अमर हबीब, लक्ष्मण वांगे, माजी न्यायमूर्ती विजयकुमार बोडके पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, प्राचार्य दर्शना देशमुख आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोराडे म्हणाले, पाणीटंचाईमुळे पाण्याची पळवापळव सुरु झाली आहे़ तुम्ही उजनीच्या पाण्यासाठी पाठपुरावा करीत आहात़ तर आम्ही भंडारदऱ्याच्या पाण्यासाठी भांडतो आहोत़ यातून शेतकऱ्यांचीच माती होते़ यापुढील कालावधीत अशीच परिस्थिती राहिली तर प्रसादाप्रमाणे पाणी मिळेल़ त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी पाण्यासाठी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी़ शासनाला काजुची शेती चालते, ऊसाची दारु चालते, मग गांजाची शेती का नको, असा सवालही त्यांनी केला़ पुढील ११ वर्ष पर्जन्यमान असेच राहील, असे भाकितही त्यांनी वर्तविले़ शेती आणि जनावरांची सांगड आपण सोडली आहे़ हार्वेस्टींग मशीनद्वारे हल्ली आपण राशी करीत आहोत़ त्यामुळे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढावली आहे, असेही बोराडे म्हणाले़अध्यक्षीय समारोपात बोलताना माजी खा़जनार्दन वाघमारे म्हणाले, शरद पवारांचे सर्व आयुष्य शेतकऱ्यांसाठी गेले आहे़ चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना मराठवाड्याला करावा लागत आहे़ मराठवाड्याचा दुष्काळवाडा झाला आहे़ त्यामुळे शेतकरी टिकेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे़ म्हणून शासनाबरोबर आपणही शेतीसाठी काहीतरी करणे गरजेचे आहे़ यावेळी माजी आ़ पाशा पटेल, शेतकरी नेते विजय जावंदिया, लक्ष्मण वंगे आदींनीही विचार मांडले़ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले़ तर आभार अ‍ॅड़ मनोहरराव गोमारे यांनी मानले़