शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

डाळीचे दर सामान्यांच्या आवाक्यात

By admin | Updated: January 23, 2017 23:42 IST

जालना : तुरीचे पीक समाधानकारक आल्याने सर्वसामांन्याच्या ताटातून गायब झालेली डाळ पुन्हा दिसत आहे.

जालना : गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळामुळे सर्वच डाळींचे कमालीचे भाव वाढले होते. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तुरीचे पीक समाधानकारक आल्याने सर्वसामांन्याच्या ताटातून गायब झालेली डाळ पुन्हा दिसत आहे. दर कमी झाल्याने सामान्यांतून दिलासा आहे.जालना मार्केट तूर, मूग आणि चनाडाळीसाठी प्रसिध्द आहे. फेब्रवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारात तूरडाळीची आवक वाढत असते. परंतु यंदा मात्र जिल्हात मुबलक पाऊस पडल्याने तुरीची आवक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू झाली आहे. गेल्या वर्षी १५ ते १६ हजार रूपये प्रतिक्विंटल मिळणारी तूरडाळ ६५०० रूपये प्रतिक्विंटलवर आली आहे. परिणामी १६० रूपये प्रति किलोने मिळणारी तूरडाळ ठोक भावात ६१ रूपये किलो तर किरकोळ भावात ८० रूपये किलो मिळू लागल्याने सर्वसामान्यांनी डाळ खरेदीकडे कल दिसून येत असल्याचे दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पंच म्हणाले. मूगडाळ पचण्यास हलकी असल्याने तूर डाळीसह मुगाच्या डाळीला चांगली मागणी वाढली आहे. लग्न समारंभासाठी अनेकजण आत्तापासून तूरडाळ खरेदी करून ठेवत आहेत.तूरडाळ, उडीद, मूग चनाडाळ, मसूर आदी प्रमुख डाळीचे भाव कमी झाले आहेत. मागच्या वर्षी या सर्वच डाळीच्या भाव गगणाला भिडल्याने सर्वसामांन्याच्या आहारातून डाळी गायब झाल्या होत्या. यंदा मात्र मुबलक पावसाने सर्वच कडधान्याचे पीक मुबलक आल्याने बाजारात विविध डाळींचे दर घसरले आहेत. जिल्ह्यात ३० दालमिल आहेत. त्यापैकी २० दालमिल सुरू आहेत. दालमिल मध्ये दररोज ८ हजार क्व्ािंटल तुरीची आवक होत असून साडेतीन हजार क्विंटल डाळ तयार होत आहे. जिल्ह्यातील डाळीला मुंबई, ठाणे पुणे,आंध्रप्रदेश आदी ठिकाणाहून मोठी मागणी असल्याचे पंच म्हणाले. सध्या तुरीची आवक वाढत असल्याने तुरीच्या डाळीचे भाव आणखी कमी होतील अशी शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत.