शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

डाळीचे दर सामान्यांच्या आवाक्यात

By admin | Updated: January 23, 2017 23:42 IST

जालना : तुरीचे पीक समाधानकारक आल्याने सर्वसामांन्याच्या ताटातून गायब झालेली डाळ पुन्हा दिसत आहे.

जालना : गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळामुळे सर्वच डाळींचे कमालीचे भाव वाढले होते. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तुरीचे पीक समाधानकारक आल्याने सर्वसामांन्याच्या ताटातून गायब झालेली डाळ पुन्हा दिसत आहे. दर कमी झाल्याने सामान्यांतून दिलासा आहे.जालना मार्केट तूर, मूग आणि चनाडाळीसाठी प्रसिध्द आहे. फेब्रवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारात तूरडाळीची आवक वाढत असते. परंतु यंदा मात्र जिल्हात मुबलक पाऊस पडल्याने तुरीची आवक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू झाली आहे. गेल्या वर्षी १५ ते १६ हजार रूपये प्रतिक्विंटल मिळणारी तूरडाळ ६५०० रूपये प्रतिक्विंटलवर आली आहे. परिणामी १६० रूपये प्रति किलोने मिळणारी तूरडाळ ठोक भावात ६१ रूपये किलो तर किरकोळ भावात ८० रूपये किलो मिळू लागल्याने सर्वसामान्यांनी डाळ खरेदीकडे कल दिसून येत असल्याचे दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पंच म्हणाले. मूगडाळ पचण्यास हलकी असल्याने तूर डाळीसह मुगाच्या डाळीला चांगली मागणी वाढली आहे. लग्न समारंभासाठी अनेकजण आत्तापासून तूरडाळ खरेदी करून ठेवत आहेत.तूरडाळ, उडीद, मूग चनाडाळ, मसूर आदी प्रमुख डाळीचे भाव कमी झाले आहेत. मागच्या वर्षी या सर्वच डाळीच्या भाव गगणाला भिडल्याने सर्वसामांन्याच्या आहारातून डाळी गायब झाल्या होत्या. यंदा मात्र मुबलक पावसाने सर्वच कडधान्याचे पीक मुबलक आल्याने बाजारात विविध डाळींचे दर घसरले आहेत. जिल्ह्यात ३० दालमिल आहेत. त्यापैकी २० दालमिल सुरू आहेत. दालमिल मध्ये दररोज ८ हजार क्व्ािंटल तुरीची आवक होत असून साडेतीन हजार क्विंटल डाळ तयार होत आहे. जिल्ह्यातील डाळीला मुंबई, ठाणे पुणे,आंध्रप्रदेश आदी ठिकाणाहून मोठी मागणी असल्याचे पंच म्हणाले. सध्या तुरीची आवक वाढत असल्याने तुरीच्या डाळीचे भाव आणखी कमी होतील अशी शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत.