शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

डाळीचे दर सामान्यांच्या आवाक्यात

By admin | Updated: January 23, 2017 23:42 IST

जालना : तुरीचे पीक समाधानकारक आल्याने सर्वसामांन्याच्या ताटातून गायब झालेली डाळ पुन्हा दिसत आहे.

जालना : गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळामुळे सर्वच डाळींचे कमालीचे भाव वाढले होते. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तुरीचे पीक समाधानकारक आल्याने सर्वसामांन्याच्या ताटातून गायब झालेली डाळ पुन्हा दिसत आहे. दर कमी झाल्याने सामान्यांतून दिलासा आहे.जालना मार्केट तूर, मूग आणि चनाडाळीसाठी प्रसिध्द आहे. फेब्रवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारात तूरडाळीची आवक वाढत असते. परंतु यंदा मात्र जिल्हात मुबलक पाऊस पडल्याने तुरीची आवक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू झाली आहे. गेल्या वर्षी १५ ते १६ हजार रूपये प्रतिक्विंटल मिळणारी तूरडाळ ६५०० रूपये प्रतिक्विंटलवर आली आहे. परिणामी १६० रूपये प्रति किलोने मिळणारी तूरडाळ ठोक भावात ६१ रूपये किलो तर किरकोळ भावात ८० रूपये किलो मिळू लागल्याने सर्वसामान्यांनी डाळ खरेदीकडे कल दिसून येत असल्याचे दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पंच म्हणाले. मूगडाळ पचण्यास हलकी असल्याने तूर डाळीसह मुगाच्या डाळीला चांगली मागणी वाढली आहे. लग्न समारंभासाठी अनेकजण आत्तापासून तूरडाळ खरेदी करून ठेवत आहेत.तूरडाळ, उडीद, मूग चनाडाळ, मसूर आदी प्रमुख डाळीचे भाव कमी झाले आहेत. मागच्या वर्षी या सर्वच डाळीच्या भाव गगणाला भिडल्याने सर्वसामांन्याच्या आहारातून डाळी गायब झाल्या होत्या. यंदा मात्र मुबलक पावसाने सर्वच कडधान्याचे पीक मुबलक आल्याने बाजारात विविध डाळींचे दर घसरले आहेत. जिल्ह्यात ३० दालमिल आहेत. त्यापैकी २० दालमिल सुरू आहेत. दालमिल मध्ये दररोज ८ हजार क्व्ािंटल तुरीची आवक होत असून साडेतीन हजार क्विंटल डाळ तयार होत आहे. जिल्ह्यातील डाळीला मुंबई, ठाणे पुणे,आंध्रप्रदेश आदी ठिकाणाहून मोठी मागणी असल्याचे पंच म्हणाले. सध्या तुरीची आवक वाढत असल्याने तुरीच्या डाळीचे भाव आणखी कमी होतील अशी शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत.