शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

हमीभाव वाढताच बाजारात महागल्या डाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:29 IST

केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली; मात्र त्याचा त्वरित परिणाम खुल्या बाजारपेठेत दिसून आला. सर्व प्रकारच्या डाळी क्विंटलमागे १०० ते १ हजार रुपयांदरम्यान महागल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔैरंगाबाद : केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली; मात्र त्याचा त्वरित परिणाम खुल्या बाजारपेठेत दिसून आला. सर्व प्रकारच्या डाळी क्विंटलमागे १०० ते १ हजार रुपयांदरम्यान महागल्या आहेत.केंद्र सरकारने बुधवारी कापसापासून ते तुरीपर्यंतच्या पिकाचे हमीभाव वाढविले आहेत. यात उडीद २०० रुपयांनी वाढून ५६०० रुपये, ज्वारी ७३० रुपयांनी वाढवून २४३० रुपये, तर मुगाच्या हमीभावात १४०० रुपये वाढ करीत ६९७५ रुपये दिला आहे. हा हमीभाव शेतकऱ्यांना मिळाला तर त्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे; मात्र हमीभाव वाढीच्या नावाखाली व्यापाºयांनी आताच डाळींचे भाव वाढविले आहेत. व्यापारी आणि डाळ मिल चालकांकडे गतवर्षीच्या हमीभावानुसार खरेदी केलेली डाळ आहे. मागील हंगामातील डाळी व्यापाºयांकडे मोठ्या प्रमाणावर आहेत; मात्र आता सरकारने शेतकºयांना वाढीव हमीभाव जाहीर केल्यानंतर हमीभाव वाढीच्या नावाखाली मागील हंगामातील डाळींचे भाव आता वाढविण्यात आले आहेत. या प्रकारामुळे साठेबाजांनी आपले उखळ पांढरे करणे सुरू केले आहे.अशी झाली दरवाढमागील हंगामातील मूग डाळ ८०० ते १००० रुपयांनी कडाडून ६८०० ते ७२०० रुपये प्रतिक्विंटल दराने शुक्रवारी आणि शनिवारी विकली जात होती. हरभरा डाळ ३०० रुपयांनी वधारून ४२०० ते ४५०० रुपये, मसूर डाळ, २०० रुपयांनी महागून अनुक्रमे ४५०० ते ५२०० रुपये व ४६०० ते ४८०० रुपये, तर तूर डाळीत १५० रुपयांनी वाढ होत ५३०० ते ५५०० रुपये, तर मठ डाळ १०० रुपयांनी वधारून ५२०० ते ५४०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे.व्यापाºयांनी सांगितले की, डाळींच्या भावात आणखी २०० ते ३०० रुपयांची वाढ होऊ शकते. परिणामी याचा फटका सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. नवीन मूग व उडीद डाळ बाजारात येण्यास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तूर डाळ डिसेंबर-जानेवारीत, तर हरभरा डाळ मार्च महिन्यात बाजारात येईल. कर्नाटकात उन्हाळी मूग मोठ्या प्रमाणात आल्याने मध्यंतरी मुगाचे भाव घटले होते.मागील हंगामातील मूग, तूर, उडीद, मठ, हरभरा, मसूर शेतकºयांनी विकून टाकली आहे. आता सर्व डाळींचा बंपर साठा डाळ मिल व साठेबाजांच्या हातात आहे. हमीभावाचा फायदा आगामी खरीप हंगामात पीक आल्यानंतरच होणार आहे; पण त्याआधीच मागील वर्षीच्या कमी भावात खरेदी केलेल्या डाळी चढ्या भावात विकून साठेबाज ग्राहकांना चुना लावत आहेत.

टॅग्स :MarketबाजारAgriculture Sectorशेती क्षेत्र