शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

पावसाअभावी भाव वाढले

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

जालना: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पेरणी खोळंबण्यासोबतच भाजीपाला उत्पादन अर्ध्यावर आले आहे. परिणामी, जालना बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक मंदावली असून, भावही चांगलेच वधारले आहेत.

जालना: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पेरणी खोळंबण्यासोबतच भाजीपाला उत्पादन अर्ध्यावर आले आहे. परिणामी, जालना बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक मंदावली असून, भावही चांगलेच वधारले आहेत.खरीप व रबी पिकासोबतच अनेक शेतकी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. वेळेत पाऊस न झाल्याने तसेच उपलब्ध पाण्याचा साठाही आटत आल्याने सर्वच फळे तसेच पालायुक्त भाज्यांची अवस्था नाजूक असल्याचे उत्पादक सांगतात. पाणीच नसल्याने नवीन उत्पादन घेण्यास मर्यादा येत आहेत. जालना शहरात कारला, गोंदेगाव, जामवाडी, बठाण, गोलापांगरी, नाव्हा, बुटेगाव, काजळा, सिरसवाडी आदी खेड्यातून भाजीपाला येतो. यात प्रामुख्याने कारले, दोडके, काकडी, मिरची, टोमॅटो, पालक, चुका, कोथंबीर, फुलगोबी, पानगोबी, गवार वांगे, भेंडी, शेवगा आदी भाजी पाल्याची मिळून ३० ते ४० क्विंटल आवक होते. काही शेतकरी थेट बाजारात विक्री करतात. रविवार बाजारात नागरिक व व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रियांतून आवक व भाववाढीचा विषय चांगलाच चिघळला होता. कारला येथील बारामही भाजीपाल्याचे उत्पादन घेणारे दत्तात्रय गोरे म्हणाले, पावसाअभावी खरीप हंगाम तर बिघडलाच आहे. आता भाजीपाला उत्पन्नावरही संक्रांत येण्याच्या मार्गावर आहे. मोठा पाऊस नसल्याने पाणीपातळी घटत आहे. लावलेल्या भाजीपाल्यास पाणी देणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावरील रोग वाढत आहे.पुंजाराम टाके यांनीही पाऊस नसल्याने भाजीपाल्यावर विपरित परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास लावलेला भाजीपालाही वाया जाण्याची भीती व्यक्त केली. जालना अथवा रामनगर येथील बाजारपेठेत भाजीपाला विक्री करतो. दोन महिन्यांपासून उत्पादन जेमतेम निघत आहे, असे सांगितले.रविवारच्या बाजारात भेंडी ६० ते ८० रुपये, वांगे ५०, कोबी ४०, दोडके ६० रुपये, गवार ४० ते ७०, काकडी ६० रुपये किलो तर पालक मेथी, कोथिंबिरीची एक जुडी चार रुपये याप्रमाणे विक्री झाली.(प्रतिनिधी)पावसाची पाठयेथील बाजारपेठेत जालना तालुक्यातील परिसरातील गावांमधून तसेच बाहेर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात भाजी पाल्याची आवक होते. यावर्षी जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविल्याने भाजीपाला उत्पादनावर त्याचा मोठा फटका बसला आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेतात विहिरीला पाणी आहे, असे बागायतदार शेतकरी भाजीपाला घेतात. मात्र पावसाअभावी विहिरीची पाणीपातळी खालवल्याने त्याची उत्पादकांनाही मोठी झळ बसत आहे.उत्पादकांनीवाढविले भाव जालना येथील रविवारच्या आठवडी बाजारात बहुतांश उत्पादक भाज्यांची थेट विक्री करतात. यामुळे भावही सर्व सामान्य जनतेला परवडेल असा असतो; पण दोन आठवड्यांपासून उत्पादकांनीही चांगलेच भाव वाढविल्याचे अनेकांनी सांगितले. यामुळे या बाजारात तसेच भाजी मंडईतील भावात काहीच फरक नाही.