शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पावसाअभावी भाव वाढले

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

जालना: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पेरणी खोळंबण्यासोबतच भाजीपाला उत्पादन अर्ध्यावर आले आहे. परिणामी, जालना बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक मंदावली असून, भावही चांगलेच वधारले आहेत.

जालना: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पेरणी खोळंबण्यासोबतच भाजीपाला उत्पादन अर्ध्यावर आले आहे. परिणामी, जालना बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक मंदावली असून, भावही चांगलेच वधारले आहेत.खरीप व रबी पिकासोबतच अनेक शेतकी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. वेळेत पाऊस न झाल्याने तसेच उपलब्ध पाण्याचा साठाही आटत आल्याने सर्वच फळे तसेच पालायुक्त भाज्यांची अवस्था नाजूक असल्याचे उत्पादक सांगतात. पाणीच नसल्याने नवीन उत्पादन घेण्यास मर्यादा येत आहेत. जालना शहरात कारला, गोंदेगाव, जामवाडी, बठाण, गोलापांगरी, नाव्हा, बुटेगाव, काजळा, सिरसवाडी आदी खेड्यातून भाजीपाला येतो. यात प्रामुख्याने कारले, दोडके, काकडी, मिरची, टोमॅटो, पालक, चुका, कोथंबीर, फुलगोबी, पानगोबी, गवार वांगे, भेंडी, शेवगा आदी भाजी पाल्याची मिळून ३० ते ४० क्विंटल आवक होते. काही शेतकरी थेट बाजारात विक्री करतात. रविवार बाजारात नागरिक व व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रियांतून आवक व भाववाढीचा विषय चांगलाच चिघळला होता. कारला येथील बारामही भाजीपाल्याचे उत्पादन घेणारे दत्तात्रय गोरे म्हणाले, पावसाअभावी खरीप हंगाम तर बिघडलाच आहे. आता भाजीपाला उत्पन्नावरही संक्रांत येण्याच्या मार्गावर आहे. मोठा पाऊस नसल्याने पाणीपातळी घटत आहे. लावलेल्या भाजीपाल्यास पाणी देणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावरील रोग वाढत आहे.पुंजाराम टाके यांनीही पाऊस नसल्याने भाजीपाल्यावर विपरित परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास लावलेला भाजीपालाही वाया जाण्याची भीती व्यक्त केली. जालना अथवा रामनगर येथील बाजारपेठेत भाजीपाला विक्री करतो. दोन महिन्यांपासून उत्पादन जेमतेम निघत आहे, असे सांगितले.रविवारच्या बाजारात भेंडी ६० ते ८० रुपये, वांगे ५०, कोबी ४०, दोडके ६० रुपये, गवार ४० ते ७०, काकडी ६० रुपये किलो तर पालक मेथी, कोथिंबिरीची एक जुडी चार रुपये याप्रमाणे विक्री झाली.(प्रतिनिधी)पावसाची पाठयेथील बाजारपेठेत जालना तालुक्यातील परिसरातील गावांमधून तसेच बाहेर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात भाजी पाल्याची आवक होते. यावर्षी जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविल्याने भाजीपाला उत्पादनावर त्याचा मोठा फटका बसला आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेतात विहिरीला पाणी आहे, असे बागायतदार शेतकरी भाजीपाला घेतात. मात्र पावसाअभावी विहिरीची पाणीपातळी खालवल्याने त्याची उत्पादकांनाही मोठी झळ बसत आहे.उत्पादकांनीवाढविले भाव जालना येथील रविवारच्या आठवडी बाजारात बहुतांश उत्पादक भाज्यांची थेट विक्री करतात. यामुळे भावही सर्व सामान्य जनतेला परवडेल असा असतो; पण दोन आठवड्यांपासून उत्पादकांनीही चांगलेच भाव वाढविल्याचे अनेकांनी सांगितले. यामुळे या बाजारात तसेच भाजी मंडईतील भावात काहीच फरक नाही.