शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

पावसाअभावी भाव वाढले

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

जालना: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पेरणी खोळंबण्यासोबतच भाजीपाला उत्पादन अर्ध्यावर आले आहे. परिणामी, जालना बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक मंदावली असून, भावही चांगलेच वधारले आहेत.

जालना: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पेरणी खोळंबण्यासोबतच भाजीपाला उत्पादन अर्ध्यावर आले आहे. परिणामी, जालना बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक मंदावली असून, भावही चांगलेच वधारले आहेत.खरीप व रबी पिकासोबतच अनेक शेतकी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. वेळेत पाऊस न झाल्याने तसेच उपलब्ध पाण्याचा साठाही आटत आल्याने सर्वच फळे तसेच पालायुक्त भाज्यांची अवस्था नाजूक असल्याचे उत्पादक सांगतात. पाणीच नसल्याने नवीन उत्पादन घेण्यास मर्यादा येत आहेत. जालना शहरात कारला, गोंदेगाव, जामवाडी, बठाण, गोलापांगरी, नाव्हा, बुटेगाव, काजळा, सिरसवाडी आदी खेड्यातून भाजीपाला येतो. यात प्रामुख्याने कारले, दोडके, काकडी, मिरची, टोमॅटो, पालक, चुका, कोथंबीर, फुलगोबी, पानगोबी, गवार वांगे, भेंडी, शेवगा आदी भाजी पाल्याची मिळून ३० ते ४० क्विंटल आवक होते. काही शेतकरी थेट बाजारात विक्री करतात. रविवार बाजारात नागरिक व व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रियांतून आवक व भाववाढीचा विषय चांगलाच चिघळला होता. कारला येथील बारामही भाजीपाल्याचे उत्पादन घेणारे दत्तात्रय गोरे म्हणाले, पावसाअभावी खरीप हंगाम तर बिघडलाच आहे. आता भाजीपाला उत्पन्नावरही संक्रांत येण्याच्या मार्गावर आहे. मोठा पाऊस नसल्याने पाणीपातळी घटत आहे. लावलेल्या भाजीपाल्यास पाणी देणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावरील रोग वाढत आहे.पुंजाराम टाके यांनीही पाऊस नसल्याने भाजीपाल्यावर विपरित परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास लावलेला भाजीपालाही वाया जाण्याची भीती व्यक्त केली. जालना अथवा रामनगर येथील बाजारपेठेत भाजीपाला विक्री करतो. दोन महिन्यांपासून उत्पादन जेमतेम निघत आहे, असे सांगितले.रविवारच्या बाजारात भेंडी ६० ते ८० रुपये, वांगे ५०, कोबी ४०, दोडके ६० रुपये, गवार ४० ते ७०, काकडी ६० रुपये किलो तर पालक मेथी, कोथिंबिरीची एक जुडी चार रुपये याप्रमाणे विक्री झाली.(प्रतिनिधी)पावसाची पाठयेथील बाजारपेठेत जालना तालुक्यातील परिसरातील गावांमधून तसेच बाहेर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात भाजी पाल्याची आवक होते. यावर्षी जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविल्याने भाजीपाला उत्पादनावर त्याचा मोठा फटका बसला आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेतात विहिरीला पाणी आहे, असे बागायतदार शेतकरी भाजीपाला घेतात. मात्र पावसाअभावी विहिरीची पाणीपातळी खालवल्याने त्याची उत्पादकांनाही मोठी झळ बसत आहे.उत्पादकांनीवाढविले भाव जालना येथील रविवारच्या आठवडी बाजारात बहुतांश उत्पादक भाज्यांची थेट विक्री करतात. यामुळे भावही सर्व सामान्य जनतेला परवडेल असा असतो; पण दोन आठवड्यांपासून उत्पादकांनीही चांगलेच भाव वाढविल्याचे अनेकांनी सांगितले. यामुळे या बाजारात तसेच भाजी मंडईतील भावात काहीच फरक नाही.