शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वस्तूंचे दर निश्चित नसल्याने वैयक्तिक योजनेचा लाभ मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:37 IST

राज्य शासनाने विविध कल्याणकारी योजनांमध्ये लाभार्थ्यांना वस्तूस्वरूपात लाभ न देता त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे़ मात्र मागील आठ महिन्यांपासून वस्तू खरेदीसाठी दर निश्चित होत नसल्याने लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत़

भारत दाढेल।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्य शासनाने विविध कल्याणकारी योजनांमध्ये लाभार्थ्यांना वस्तूस्वरूपात लाभ न देता त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे़ मात्र मागील आठ महिन्यांपासून वस्तू खरेदीसाठी दर निश्चित होत नसल्याने लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत़शासनाने कल्याणकारी योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असला तरी संबंधित यंत्रणेची अंमलबजावणी होताना अडचणी येत असल्याचे समोर आले आहे़लाभार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तू स्वरूपात मिळणाºया लाभांचे हस्तांतर रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे़ वस्तू विकत घेण्यासाठी विभागप्रमुखांना अनुदान ठरविण्याचे निर्देश आहेत़, परंतु वस्तूचे दर नेमके काय ठरवायचे? असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनाला पडला आहे़ त्यामुळे विविध वस्तूंचे दर निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जि़ प़ समाजकल्याण अधिकारी ए़ बी़ कुंभारगावे यांनी दिली़शासनाद्वारे विविध योजनेतंर्गत लाभार्थ्यांना वस्तूस्वरूपात लाभ मिळवून देण्यात येतो, परंतु आता ही पद्धत बंद करून संबंधित वस्तूची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे़ या निर्णयाचा परिणाम सर्व प्रशासकीय विभागांच्या कल्याणकारी योजनांच्या कार्यपद्धतीवर होणार असल्याने शासनाने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे़यासाठी कार्यपद्धती निश्चित केली असून यामध्ये संबंधित वस्तूबाबत वितरण योजना तयार करणे, वस्तू विकत घेण्यासाठी अनुदान ठरविणे, वस्तूंचे परिमाण ठरविणे, योजनेतंर्गत पात्रतेचे निकष ठरविणे, पात्र लाभार्थ्यांची निवड करणे, लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडणी करणे, लाभार्थ्याने खरेदी केलेल्या वस्तूची व सादर केलेल्या पावतीची शहानिशा करून पूर्णपणे खातरजमा झाल्यावर बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करणे, ही कामे करावी लागणार आहेत़दरम्यान, विविध विभागांद्वारे वस्तू खरेदी करण्यासाठी मागील काही दिवसांत काढलेल्या निविदा रद्द झाल्या आहेत़ जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या वतीने लाभार्थ्यांना साधनसामग्रीचे मोठ्या प्रमाणावर वाटप होते़ समाजकल्याण विभागाच्या वतीने सायकल वाटप, शिलाई मशीन वाटप, मिरची कांडप यंत्र, पिठाची गिरणी, ताडपत्री आदी वस्तू वाटप केले जाते़ तर इतर विभागाच्या वतीने कृषीपंप, वीजपंप, पाईपलाईन, कृषी औजारे, मायक्रो ट्रॅक्टर, वैरण कापणी यंत्र, कडबा कट्टी यंत्र, पावर टिलर, विद्यार्थ्यांना लॅपटॉप आदी वस्तूंचे वाटप केले जाते़