शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

तुरीचा भाव पाच हजारांवर

By admin | Updated: September 19, 2014 00:27 IST

हिंगोली : आजघडीला शेतकऱ्यांपाशी मालच नसल्याने गुरूवारी ५ हजारांवर गेलेला तुरीचा दर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या पदरात पडला.

हिंगोली : आजघडीला शेतकऱ्यांपाशी मालच नसल्याने गुरूवारी ५ हजारांवर गेलेला तुरीचा दर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या पदरात पडला. हंगाम येताच भाव घसरण्याची परंपरा कायम राहिल्याने शेतकऱ्यांच्या मालास समाधानकारक दर मिळत नाहीत. बाजारात केवळ १०० क्विंटल तुरीची आवक होती. हिंगोली जिल्हा पांढऱ्या सोन्याच्या पिकाचा म्हणून ओळखला जातो. कापसात तुरीचे अंतरपीक सर्रास शेतकरी घेतात. शिवाय नगदी पीक म्हणूनही तुरीकडे पाहणारे शेतकरी आहेत. गतवर्षी ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड झाली होती. यंदा त्यात घट होऊन २७ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र होते. शेतकऱ्यांनीही तुरीला दूर लोटल्याने २३ हजार हेक्टरवर तुरीचे क्षेत्र आले. यंदा केंद्र सरकारने तुरीला ४ हजार ३५० रूपयांचा दर जाहीर केला. त्यातच गुरूवारी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला चांगला भाव मिळाला. सकाळी ४ हजार ४३३ रुपयांपासून लिलावास सुरूवात झाली. मालाच्या दर्जानुसार त्यात वाढ होऊन ५ हजार ४७ रुपयांपर्यंत कमाल दर गेला. दरात तेजी आली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. बाजारात शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचाच अधिक माल असल्याने वाढीव दराचा फायदा शेतकरीवर्गास झाला नाही. (प्रतिनिधी)