शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

तुरीचा भाव पाच हजारांवर

By admin | Updated: September 19, 2014 00:27 IST

हिंगोली : आजघडीला शेतकऱ्यांपाशी मालच नसल्याने गुरूवारी ५ हजारांवर गेलेला तुरीचा दर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या पदरात पडला.

हिंगोली : आजघडीला शेतकऱ्यांपाशी मालच नसल्याने गुरूवारी ५ हजारांवर गेलेला तुरीचा दर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या पदरात पडला. हंगाम येताच भाव घसरण्याची परंपरा कायम राहिल्याने शेतकऱ्यांच्या मालास समाधानकारक दर मिळत नाहीत. बाजारात केवळ १०० क्विंटल तुरीची आवक होती. हिंगोली जिल्हा पांढऱ्या सोन्याच्या पिकाचा म्हणून ओळखला जातो. कापसात तुरीचे अंतरपीक सर्रास शेतकरी घेतात. शिवाय नगदी पीक म्हणूनही तुरीकडे पाहणारे शेतकरी आहेत. गतवर्षी ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड झाली होती. यंदा त्यात घट होऊन २७ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र होते. शेतकऱ्यांनीही तुरीला दूर लोटल्याने २३ हजार हेक्टरवर तुरीचे क्षेत्र आले. यंदा केंद्र सरकारने तुरीला ४ हजार ३५० रूपयांचा दर जाहीर केला. त्यातच गुरूवारी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला चांगला भाव मिळाला. सकाळी ४ हजार ४३३ रुपयांपासून लिलावास सुरूवात झाली. मालाच्या दर्जानुसार त्यात वाढ होऊन ५ हजार ४७ रुपयांपर्यंत कमाल दर गेला. दरात तेजी आली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. बाजारात शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचाच अधिक माल असल्याने वाढीव दराचा फायदा शेतकरीवर्गास झाला नाही. (प्रतिनिधी)