शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

अध्यक्ष कुठल्याही पक्षाचा बांधील नसतो :बागडे

By admin | Updated: November 19, 2014 01:01 IST

औरंगाबाद : विधानसभेचा अध्यक्ष हा कुठल्याही पक्षाचा बांधील नसतो. त्याला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवावे लागतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित

औरंगाबाद : विधानसभेचा अध्यक्ष हा कुठल्याही पक्षाचा बांधील नसतो. त्याला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवावे लागतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज येथे केले व राजकीय प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले. त्यांच्यावर ते भाजपाचे म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस सरकार वाचवल्याचा आरोप होत होता. त्या पार्श्वभूमीवर हरिभाऊ हळूहळू स्वत:ला सावरत असल्याचे दिसून आले.जिल्हा मराठी पत्रकार संघाने दुपारी आयोजित केलेल्या ‘मीट द प्रेस’मध्ये हरिभाऊंचा सत्कार करण्यात आला. यावेळी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरेही दिली; पण राजकीय प्रश्नांना मात्र उत्तरे देण्याचे टाळले. ‘हळूहळू का होईना मराठवाड्याची अस्मिता जागवणार, कायद्यानुसार जायकवाडीला मिळावयाचे पाणी मिळालेच पाहिजे, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शासनाची भरीव मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार, अशी आश्वासनेही त्यांनी यावेळी दिली.औरंगाबादला विधानसभेचे अधिवेशन होणार का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, औरंगाबादला खंडित झालेली मंत्रिमंडळाची बैठक व्हावी, असा एक विचार आहे. मात्र, अधिवेशनालाबद्दल काही सांगता येणार नाही. बैठका, अधिवेशन यापेक्षा निधी किती मिळाला याला महत्त्व आहे.विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी नेमके काय घडले, आवाजी मत म्हणजे काय, अब्दुल सत्तार वगैरेंना जाणूनबुजून निलंबित केले गेले, विधानसभेत सत्तारूढ पक्षाचे आमदारही गोंधळ घालतात, त्याकडे दुर्लक्ष केले जाते, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती हरिभाऊ बागडे यांच्यावर करण्यात आली; परंतु ‘मला आता या विषयावर काहीच बोलायचे नाही,’ असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.गिरीश बापटांना मंत्री व्हायचंय...खरं तर पुण्याचे आमदार गिरीश बापट व माझं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी होतं. त्यांनी तालिकेवर काम केलेलं असल्यानं त्यांना बरीच माहितीही आहे. त्यांनी अध्यक्ष व्हावं असं मलाही वाटत होतं. मात्र, त्यांना मंत्री व्हायचं असल्यानं त्यांनी अध्यक्ष होण्यास नकार दिला. नाना, तुम्ही एकदा मंत्री झाला आहात, मला एकदा तरी होऊ द्या, असं गिरीश बापट म्हणाले. अध्यक्षपदाच्या खुर्चीवर मी कधीच बसलो नव्हतो. आता मला हा बहुमान मिळाला आहे. त्याचं सोनं करणार! १मराठवाड्यातील खराब रस्त्यांबद्दल हरिभाऊ बागडे यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, मराठवाडा सोडता उर्वरित महाराष्ट्रातील रस्ते चांगले आहेत.२खराब रस्ते लवकर दुरुस्त झाले पाहिजेत. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीविषयी नानांनी चिंता व्यक्त केली. ५० पैशांपेक्षा कमी आणेवारीच्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होईल. जनावरांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावेल. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. पाणीटंचाईच्या संदर्भातील बारकावे आपण अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. ४१९६५ ते ६९ या काळात हरिभाऊ बागडे यांनी पत्रकार म्हणून काम केले होते. नंतर ते त्यांच्या अन्य कामांमध्ये गुंतून गेले आणि पुढे सक्रिय राजकारणात आले. साखर पुरवणीसाठी शंकरराव कोल्हे, शंकरराव काळे आणि पद्मश्री विखे यांच्या मुलाखती घेतल्या. यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्यासारख्यांच्या पत्रपरिषदा कव्हर केल्या. या विश्वात बागडे आज रमून गेले होते. ४जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी हरिभाऊंचा शाल व बुके देऊन सत्कार केला. सतीश वैराळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रमोद माने यांनी आभार मानले. यावेळी शिरीष बोराळकर, प्रदीप पाटील, संतोष लोखंडे पाटील, राजू शिंदे, राजू बागडे आदी कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.