शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
4
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
5
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
6
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
मुकेश अंबानींच्या रिलायन्सविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
9
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
10
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
11
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
12
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
13
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
14
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
15
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!
16
गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा
17
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
18
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
19
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
20
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी

पाणीटंचाई आराखडा तयार ठेवा

By admin | Updated: July 12, 2014 00:39 IST

नांदेड : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तालुकानिहाय पाणीटंचाई निवारणाचा आराखडा तयार ठेवण्याचे आदेश आज नांदेड येथे विभागीय महसूल आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले़

नांदेड : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तालुकानिहाय पाणीटंचाई निवारणाचा आराखडा तयार ठेवण्याचे आदेश आज नांदेड येथे विभागीय महसूल आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले़ येथील नियोजन भवनात शुक्रवारी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांची बैठक घेतली़ यंदा लांबलेल्या पावसाने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त जयस्वाल यांनी पाणीटंचाई, पीक पेरणी व रोजगार हमी योजनेची कामे याविषयी उपाययोजना सूचविल्या़ या बैठकीस विभागीय उपायुक्त (पुरवठा) अनिल रामोड, विभागीय उपायुक्त (महसूल), जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती़ तालुकानिहाय पाण्याचे सोर्स पाहून ठेवावेत व त्याचा आराखड्यात समावेश कारावा़ पाण्याचे टँकर्स कुठे भरता येतील, याचे नियोजन करावे़ पाणीटंचाईसंबंधी गावांची विभागणी करावी़ त्यामध्ये अतितीव्र पाणी टंचाई़ तीव्र पाणीटंचाई व काहीअंशी पाणीटंचाई अशी गावांची यादी तयार करावी़ तीन - तीन महिन्यांसाठी आराखडा तयार करावा़ त्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करणे, विंधन विहिरी घेणे व खाजगी विहिरींचे अधिग्रहण करणे याचा प्रामुख्याने समावेश असावा़ टँकर भरण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी करून ठेवावी़ टँकरच्या किती खेपा होतात तसेच भारनियमन असेल तर जनरेटर व आईल इंजिन यांचेही नियोजन करावे़ पाणीटंचाई काळात ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे, अशा महत्त्वपूर्ण सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केल्या़ गावच्या २ कि़ मी़ च्या परिसरात ज्या विहिरांना पाणी असेल तर शासनाची परवानगी घ्यावी लागेल़ आवश्यक हातपंप बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी़ ज्या ठिकाणी विहीर व बोअर अधिग्रहण केले आहे, त्याचा दर पंधरा दिवसांनी ग्रामसभेत आढावा घ्यावा कारण पाण्याची आवश्यकता नसताना सुद्धा अधिग्रहण चालू असते, त्यासाठी पैसा गरज नसताना खर्च होतो, असेही विभागीय आयुक्तांनी सूचविले़ (प्रतिनिधी)गावच्या २ कि़ मी़ च्या परिसरात ज्या विहिरांना पाणी असेल त्यांना शासनाची परवानगी घ्यावी़तालुकानिहाय पाण्याचे सोर्स पाहून ठेवावेत व त्याचा आराखड्यात समावेश कारावा़ पाण्याचे टँकर्स कुठे भरता येतील, याचे नियोजन करावे़