शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

‘प्रीपेड’ रिक्षा योजना बारगळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:51 IST

प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये भाड्यावरून होणारे वाद टाळण्यासाठी वाहतूक शाखेने पुढाकार घेत रेल्वेस्थानकावर प्रीपेड रिक्षा व्यवस्था सुरू केली होती. प्रवाशांचा याला प्रतिसादही मिळत होता; परंतु एक वर्षानंतर ही व्यवस्था बंद पडली.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये भाड्यावरून होणारे वाद टाळण्यासाठी वाहतूक शाखेने पुढाकार घेत रेल्वेस्थानकावर प्रीपेड रिक्षा व्यवस्था सुरू केली होती. प्रवाशांचा याला प्रतिसादही मिळत होता; परंतु एक वर्षानंतर ही व्यवस्था बंद पडली. प्रीपेड व्यवस्थेमुळे प्रवाशांना चांगली सेवा मिळून त्यांची आर्थिक लुबाडणूकही थांबली होती. ही व्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी वाहतूक शाखेसह प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुढाकार घेण्याची गरज आहे.रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक व अन्य भागात भाड्यावरून प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये अनेकदा वाद होत असे. प्रसंगी हाणामारीच्या घटना घडलेल्या आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त संजय कुमार आणि वाहतूक शाखेचे तात्कालीन पोलीस निरीक्षक सुरेंद्र देशमुख यांनी रिक्षाचालक संघटनांची बैठक घेतली. यात प्रीपेड रिक्षा व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार औरंगाबाद शहरातील रेल्वेस्थानक ते चिकलठाणा आणि रेल्वेस्थानक ते टीव्ही सेंटर या दोन रस्त्यांचे वाहतूक शाखेकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर किती कि़मी.वर किती भाडे असले पाहिजे याचे गणित मांडले गेले. त्यानंतर या दोन्ही मार्गांचे भाडे निश्चित करण्यात आले होते.रेल्वेस्थानक परिसरात वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने एक छोटे कार्यालय आणि ग्राहक मंचने दोन संगणक व एक प्रिंटरद्वारे ही व्यवस्था सुरू करण्यात आली.या व्यवस्थेत जवळपास २०० रिक्षाचालक सहभागी झाले होते. या चालकांना वाहतूक शाखेने प्रत्येक चालकाला पोलीस निरिक्षकांची स्वाक्षरी असलेले ओळखपत्र दिले होते. सुसंवाद आणि वाहतूक पोलीस भाड्याचा तक्ता दाखवत असल्याने प्रवाशांचा यावर विश्वास बसतअसे. या व्यवस्थेला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळाला. वाहतूक शाखेने पर्यायी मनुष्यबळ देण्याची योजना आखली होती; परंतु अधिका-यांच्या बदल्या झाल्या आणि वर्षभरानंतर ही व्यवस्था बंद पडली. ही व्यवस्था नव्याने सुरू करण्याची मागणी रिक्षाचालक संघटनांकडून केली जात आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक शाखेच्या अधिका-यांनी पुढाकार घेण्याची मागणी संघटनांसह प्रवाशांतून होत आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसauto rickshawऑटो रिक्षा