शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By admin | Updated: January 3, 2016 00:01 IST

औरंगाबाद : तो १९ वर्षांचा अन् ती १५ वर्षांची. दोघांनी घरच्यांच्या नकळत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या खऱ्या, पण नियतीला त्यांचे प्रेम मान्य नव्हते

औरंगाबाद : तो १९ वर्षांचा अन् ती १५ वर्षांची. दोघांनी घरच्यांच्या नकळत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या खऱ्या, पण नियतीला त्यांचे प्रेम मान्य नव्हते. तीन आठवड्यांपूर्वी कुटुंबियांनी तिचे लग्न ठरविले. तिनेही साखरपुडा होईपर्यंत ‘या कानाची खबर त्या कानाला’लागू दिली नाही; पण त्या दोघांच्या मनात वेगळेच काही तरी शिजत होते. ‘थर्टी फर्स्ट’च्या दिवशी ते दोघे एकत्र आले आणि त्यांनी ‘एक दुजे के लिए’ म्हणत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हर्सूलच्या जोगवाडा परिसरात शनिवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संजय कारभारी जाधव (१९) आणि सविता अप्पाराव बनसोडे (१५, दोघे रा. जोगवाडा परिसर) असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संजय जाधव हा बारावीमध्ये शिक्षण घेत होता. तर त्याच्या घरापासून काही अंतरावर राहणारी सविता ही वीटभट्टीवर कामाला जात होती. तिचे सातवीपर्यंत शिक्षण झाले होते. तीन आठवड्यांपूर्वीच सविताचा साखरपुडा झाला होता. कुटुंबियांनी आपल्या मनाविरुद्ध लग्न जमविल्याने तिला ते मान्य नसावे. त्यामुळे सविता आणि संजय यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला हे दोघेही घरातून बेपत्ता झाले. त्यांनी एकमेकाला घट्ट मिठी मारून जोगवाडा परिसरातील नरसिंग पवार यांच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, हर्सूल पोलीस ठाण्यात सविताचे अपहरण केल्याप्रकरणी संजयविरुद्ध तक्रार नोंदविली होती. तर संजय बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ विजय जाधव याने शुक्रवारी केली होती. दरम्यान, आज सकाळी साडेआठच्या सुमारास पोलीस पाटलांना पवार यांच्या विहिरीत दोघांचा मृतदेह आढळून आला. अग्निशामक दलाच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दोघांच्या मृतदेहाची घाटीत उत्तरीय तपासणी करण्यात आली. या घटनेची नोंद हर्सूल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संजय आणि सविता यांच्या प्रेम प्रकरणाबाबत कोणतीही कल्पना नव्हती, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकारांना दिली. कुटुंबियांचा लग्नाला विरोध असल्याने प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याच्या बऱ्याच घटना आजवर घडल्या आहेत; परंतु प्रेम प्रकरणाची कोणतीही माहिती कुटुंबियांना नव्हती. कुटुंबियांच्या विरोधाची कल्पना नसताना देखील हर्सूलच्या जोगवाडा परिसरातील पे्रमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांपुढे काही प्रश्न निर्माण झाले आहेत.