शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By admin | Updated: January 3, 2016 00:01 IST

औरंगाबाद : तो १९ वर्षांचा अन् ती १५ वर्षांची. दोघांनी घरच्यांच्या नकळत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या खऱ्या, पण नियतीला त्यांचे प्रेम मान्य नव्हते

औरंगाबाद : तो १९ वर्षांचा अन् ती १५ वर्षांची. दोघांनी घरच्यांच्या नकळत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या खऱ्या, पण नियतीला त्यांचे प्रेम मान्य नव्हते. तीन आठवड्यांपूर्वी कुटुंबियांनी तिचे लग्न ठरविले. तिनेही साखरपुडा होईपर्यंत ‘या कानाची खबर त्या कानाला’लागू दिली नाही; पण त्या दोघांच्या मनात वेगळेच काही तरी शिजत होते. ‘थर्टी फर्स्ट’च्या दिवशी ते दोघे एकत्र आले आणि त्यांनी ‘एक दुजे के लिए’ म्हणत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हर्सूलच्या जोगवाडा परिसरात शनिवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संजय कारभारी जाधव (१९) आणि सविता अप्पाराव बनसोडे (१५, दोघे रा. जोगवाडा परिसर) असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संजय जाधव हा बारावीमध्ये शिक्षण घेत होता. तर त्याच्या घरापासून काही अंतरावर राहणारी सविता ही वीटभट्टीवर कामाला जात होती. तिचे सातवीपर्यंत शिक्षण झाले होते. तीन आठवड्यांपूर्वीच सविताचा साखरपुडा झाला होता. कुटुंबियांनी आपल्या मनाविरुद्ध लग्न जमविल्याने तिला ते मान्य नसावे. त्यामुळे सविता आणि संजय यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला हे दोघेही घरातून बेपत्ता झाले. त्यांनी एकमेकाला घट्ट मिठी मारून जोगवाडा परिसरातील नरसिंग पवार यांच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, हर्सूल पोलीस ठाण्यात सविताचे अपहरण केल्याप्रकरणी संजयविरुद्ध तक्रार नोंदविली होती. तर संजय बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ विजय जाधव याने शुक्रवारी केली होती. दरम्यान, आज सकाळी साडेआठच्या सुमारास पोलीस पाटलांना पवार यांच्या विहिरीत दोघांचा मृतदेह आढळून आला. अग्निशामक दलाच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दोघांच्या मृतदेहाची घाटीत उत्तरीय तपासणी करण्यात आली. या घटनेची नोंद हर्सूल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संजय आणि सविता यांच्या प्रेम प्रकरणाबाबत कोणतीही कल्पना नव्हती, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकारांना दिली. कुटुंबियांचा लग्नाला विरोध असल्याने प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याच्या बऱ्याच घटना आजवर घडल्या आहेत; परंतु प्रेम प्रकरणाची कोणतीही माहिती कुटुंबियांना नव्हती. कुटुंबियांच्या विरोधाची कल्पना नसताना देखील हर्सूलच्या जोगवाडा परिसरातील पे्रमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांपुढे काही प्रश्न निर्माण झाले आहेत.