शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पावसाळापूर्व नालेसफाईची कामे अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:02 IST

साहेबराव हिवराळे औरंगाबाद : नाल्यात केरकचरा टाकून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे गतवर्षी पावसाच्या पाण्याने कॉलनी ...

साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : नाल्यात केरकचरा टाकून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे गतवर्षी पावसाच्या पाण्याने कॉलनी व परिसरात थैमान घातले होते. त्यामुळे सातारा-देवळाई परिसरात पावसाळापूर्व नालेसफाईचे काम मनपाने हाती घेतले आहे. जवळपास ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.

औरंगाबादचे दक्षिण शहर म्हणून झपाट्याने वाढत असलेल्या सातारा-देवळाई परिसरात टोलेजंग इमारती व सोसायटी, कॉलनी उभ्या राहिल्या आहेत. शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचारी या परिसरात वास्तव्यास असून, विविध बँका, सोसायटींकडून कर्ज घेऊन हक्काचे घर उभारले आहे. या परिसरात मूलभूत सेवासुविधा पुरविण्याकडे मनपाने दुर्लक्ष केलेले आहे. आज ना उद्या सर्व सुरळीत होईल या आशेवर नागरिकांकडून गुंतवणूक केली जात आहे. पाण्यासाठी नागरिकांना आजही टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. साफसफाईकडेही दुर्लक्ष आहे. मोजके रस्ते सोडले, तर अनेक रस्ते आजही खेड्यातील रस्त्यांची आठवण करून देतात. खेळण्यासाठी मुलांना बागबगीचा नाही, उद्यान, खेळाचे मैदान अतिक्रमित झालेले आहे. गतवर्षी सातारा परिसरात विविध कॉलनी, वसाहतींमध्ये पावसाच्या पाण्याने थैमान घातले होते. अनेकांच्या घरांमधील संसारोपयोगी साहित्य पाण्यात तरंगत होते. याला फक्त कारणीभूत होते, ते अतिक्रमित नाले. महानगरपालिकेने यंदाही नाले सफाई हाती घेतली असून, बायपासवरील नाला, देवळीकडे जाणारा प्रथमेश नगरीचा नाला, चाटे शाळेमागील नाला, ५२ घरांजवळील नाला, सातारा गाव येथील नाला, सुधाकरनगरकडे जाणारा नाला, या ७० टक्के नाल्यांचे खोलीकरण व सफाई मनपाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. आठवडाभरात खेड्याकडे जाणाऱ्या नाल्यांपासून सर्व सफाई पूर्ण होणार आहे. संथ गतीने सुरू असलेले काम मनपाच्या पथकाने आता जोमाने हाती घेतले आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. तत्पूर्वी ही कामे पूर्ण व्हावीत, अशी मागणी सातारा-देवळाई परिसरातून हकीम पटेल, नामदेव बाजड, महेश चौधरी, शेखर म्हस्के आदींनी केली आहे.

धडक कारवाई करणार...

नैसर्गिक जलस्रोत बुजविण्याचे प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. गतवर्षी नागरिकांना झालेला त्रास यावर्षी होऊ नये म्हणून खबरदारी घेतलेली आहे. ७० टक्के कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे मान्सूनपूर्व पूर्ण होतील.

-लक्ष्मीकांत कोतकर, कनिष्ठ अभियंता मनपा