शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

दुष्काळातही पालेभाज्यांना स्वस्ताई...

By admin | Updated: May 11, 2015 00:31 IST

परंडा : सध्या तालुक्यातील अनेक गावे भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

परंडा : सध्या तालुक्यातील अनेक गावे भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. असे असतानाच उपलब्ध असलेल्या थोड्याबहुत पाण्यावर तळहातावरील फोडाप्रमाणे जगविलेल्या पालेभाज्यांना बाजारात स्वताई आहे. लग्नसराई असल्याने लाल मिरची मात्र, अधिक ‘तिखट’ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तालुक्याच्या ठिकाणचा बाजार असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात विक्रेते, व्यापारी येतात. भाजीपाल्यासह धान्य,फळे, कपडे आदी वस्तू रास्त दरामध्ये मिळत असल्याने ग्राहकांची संख्याही मोठी असते. असे असले तरी रविवारी आठवडी बाजारात ग्राहकांची वर्दळ फारशी दिसून आली नाही. तसेच मागील एक -दोन महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे गावरान आंबा बाजारपेठेतून हद्दपार झाल्याचे पहावयास मिळते. पाण्याचे प्रमाण जास्त असणारे फळ म्हणून कलिंगडला विशेषत: उन्हाळ्यामध्ये मोठी मागणी असते. परंतु, यालाही अपेक्षित दर मिळत नसल्याचे दिसते. ६० रूपये विक्रीचे कलिंगड ३० रूपयांना विक्री करण्याची शेतकऱ्यांवर येवून ठेपली आहे. दरम्यान, फळांसोबतच वांगे, कांदे, बटाटे यांचेही दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. मेथीची भाजी वगळता अन्य पालेभाज्यांना स्वस्ताई असल्याचे दिसून येते. कोबी, प्लॉवर, शिमला मिरची, गवार, टोमॅटो यांचे दरही पन्नास टक्क्यांनी कमी झाले आहेत. पालेभाज्यांच्या दरामध्ये झालेल्या घसरणीमुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात आले. एकूणच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे चित्र पहावयास मिळते. (वार्ताहर)