शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

दुष्काळातही पालेभाज्यांना स्वस्ताई...

By admin | Updated: May 11, 2015 00:31 IST

परंडा : सध्या तालुक्यातील अनेक गावे भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

परंडा : सध्या तालुक्यातील अनेक गावे भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. असे असतानाच उपलब्ध असलेल्या थोड्याबहुत पाण्यावर तळहातावरील फोडाप्रमाणे जगविलेल्या पालेभाज्यांना बाजारात स्वताई आहे. लग्नसराई असल्याने लाल मिरची मात्र, अधिक ‘तिखट’ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तालुक्याच्या ठिकाणचा बाजार असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात विक्रेते, व्यापारी येतात. भाजीपाल्यासह धान्य,फळे, कपडे आदी वस्तू रास्त दरामध्ये मिळत असल्याने ग्राहकांची संख्याही मोठी असते. असे असले तरी रविवारी आठवडी बाजारात ग्राहकांची वर्दळ फारशी दिसून आली नाही. तसेच मागील एक -दोन महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे गावरान आंबा बाजारपेठेतून हद्दपार झाल्याचे पहावयास मिळते. पाण्याचे प्रमाण जास्त असणारे फळ म्हणून कलिंगडला विशेषत: उन्हाळ्यामध्ये मोठी मागणी असते. परंतु, यालाही अपेक्षित दर मिळत नसल्याचे दिसते. ६० रूपये विक्रीचे कलिंगड ३० रूपयांना विक्री करण्याची शेतकऱ्यांवर येवून ठेपली आहे. दरम्यान, फळांसोबतच वांगे, कांदे, बटाटे यांचेही दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. मेथीची भाजी वगळता अन्य पालेभाज्यांना स्वस्ताई असल्याचे दिसून येते. कोबी, प्लॉवर, शिमला मिरची, गवार, टोमॅटो यांचे दरही पन्नास टक्क्यांनी कमी झाले आहेत. पालेभाज्यांच्या दरामध्ये झालेल्या घसरणीमुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात आले. एकूणच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे चित्र पहावयास मिळते. (वार्ताहर)