शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सोयगाव परिसरात वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:02 IST

सोयगाव : तालुक्यात थकबाकीच्या नावाखाली महावितरणकडून शेतीपंपाच्या वीजजोडण्या खंडित केल्या जात आहेत. रब्बी पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न ...

सोयगाव : तालुक्यात थकबाकीच्या नावाखाली महावितरणकडून शेतीपंपाच्या वीजजोडण्या खंडित केल्या जात आहेत. रब्बी पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे असून, महावितरणविरोधात संताप व्यक्त करीत आहेत.

सुरुवातीपासूनच वीजपुरवठा सुरळीत होत नव्हता. सातत्याने विजेचा लंपडाव सुरू असल्याने शेतकरी बांधव त्रस्त झालेले होते. त्यात उन्हाळ्याचा कहर वाढू लागला, तर दुसरीकडे रब्बी पिकांना पाण्याची गरज असताना वीज खंडित करण्याची कारवाई महावितरणने सुरू केली. थकबाकी वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्याने रात्री शेतशिवारात जाणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. त्यामुळे शेतातील गोठ्यात बांधलेल्या जनावरांना अंधारात राहावे लागत असून शेतकरी रात्री जनावरांना चारापाणी देण्यासाठी जातात. वीज नसल्याने विहिरीतील पाणी काढायचे कसे, जनावरांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पिकांबरोबरच जनावरांना देखील पाणी मिळत नसल्याचे शेतकरी तोसीफ शेख, जमील तडवी यांनी सांगितले.

सोयगाव मंडलाची अंतिम आणेवारी ४७ पैसे

सोयगाव तालुक्याची खरिपाची अंतिम आणेवारी ४७ पैसे जाहीर झालेली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार पन्नास टक्क्यांच्या आत आणेवारी असलेल्या तालुक्याची वीज जोडणीशिवाय कोणतीही सक्तीची वसुली करू नये, असे आदेश शासनाने काढलेले आहेत. परंतु शासनाच्या या आदेशालाच महावितरणने केराची टोपली दाखविली आहे. शेतकऱ्यांना धारेवर धरून सक्तीची वीजबिल वसुली केली जात आहे. याबाबत लोकप्रतिनिधीही गप्प का? असा प्रश्न जनतेतून केला जात आहे.