शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लाडसावंगी परिसरात शेतपंपांचे वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:05 IST

लाडसावंगी : वीजबिलवाटप नाही, पूर्वसूचना नाही आणि अचानक शेतीचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ऐन पिकाला पाणी देण्याची वेळ ...

लाडसावंगी : वीजबिलवाटप नाही, पूर्वसूचना नाही आणि अचानक शेतीचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ऐन पिकाला पाणी देण्याची वेळ असताना वीज नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतकरी दररोजच्या वेळा पत्रकानुसार वीजपंप सुरू करण्यासाठी शेतावर गेले असता, वीज न आल्याने त्यांनी लाडसावंगी वीज केंद्राशी संपर्क साधला असता, वीजबिले भरण्यासाठी शेतीचा वीजपुरवठा खंडित केल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना याबाबत कुठलीही सूचना दिली नाही, तसेच बिले किती आहेत, केव्हा भरायची, याबाबतही महावितरणने कल्पना न दिल्याने शेतकरी भांबावले आहेत. त्यातच उन्हाळ्याची चाहूल लागल्याने रब्बीच्या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. नाहीतर पिके वाया जाण्याची शक्यता आहे. त्यात आता रोहित्रावरूनच वीज बंद करण्यात आली आहे. विजेची गरज असेल, तर लाडसावंगी वीज उपकेंद्रात येऊन बिले घ्या व भरणा करा, तरच वीजपुरवठा सुरळीत होईल, असा पवित्रा महावितरणने घेतला आहे.

चौकट

अडचणीत अडचणी वाढल्या

शेतकऱ्यांना आता पिकांना पाणी देणे अत्यंत गरजेचे असताना, महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. शेतकऱ्यांनी वीजबिल भरावे, असा यामागील तर्क आहे. मात्र, एका रोहित्रावर २० ते ३० शेतकरी वीज ग्राहक असतात, त्यात एकाने बिल भरले, तरी वीजपुरवठा सुरू केला जात नाही. शिवाय ज्यांच्या विहिरीत पाणीच शिल्लक नाही, असे शेतकरी वीजबिल भरत नाहीत. यामुळे अडचणीत अडचणी निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चौकट

आधी बिले वाटण्याची मागणी

लाडसावंगी वीज उपकेंद्रात जवळपास बावीस गावे असून, शेतकरी ग्राहक संख्या मोठी आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने उपकेंद्रात येऊन बिले घेणे, मग भरणे यात वेळ जास्त जाणार असल्याने, रब्बी पिके हातची जाण्याचा धोका आहे. यामुळे आधी बिलांचे वाटप करून, मग बिले भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, अन्यथा वीज केंद्रावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोट

शेतपंपांची वीजबिले भरण्यासाठी कंपनीने कठोर पावले उचलली आहेत. बिले वसुलीसाठी वरिष्ठांचे आदेश असल्यामुळे आम्ही काही भागांतील शेतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

- एस. एस. सोनुने,

कनिष्ठ अभियंता, लाडसावंगी वीज उपकेंद्र.