शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

विद्युत ठेकेदारांना मनपाचे अभय!

By admin | Updated: July 16, 2017 00:35 IST

औरंगाबाद : शहरातील ४० टक्के पथदिवे बंद ठेवून मेन्टेनन्सपोटी तब्बल १५ कोटी रुपयांची बिले उचलण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ४० टक्के पथदिवे बंद ठेवून मेन्टेनन्सपोटी तब्बल १५ कोटी रुपयांची बिले उचलण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या घोटाळ्याप्रकरणी मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करून बिलांची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाने आजपर्यंत यासंदर्भात कोणतीच कारवाई सुरू केली नाही. राजकीय दबावापोटी मनपा प्रशासनानेही नांगी टाकल्याचे दिसून येत आहे.शहरात ५० हजारपेक्षा अधिक पथदिवे आहेत. या पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने २२ कंत्राटदार नेमले आहेत. दर महिन्याला एका कंत्राटदाराला किमान २५ लाख रुपयांची खिरापत वाटण्यात येते. कोणतेही काम न करता मागील सहा महिन्यांमध्ये कंत्राटदारांनी १५ कोटी रुपये मनपाकडून घेतल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने विद्युत ठेकेदारांना काम न करता दिली १५ कोटींची बिले या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी जाहीर केले होते की, ज्या भागातील पथदिवे बंद राहतील त्या भागातील संबंधित कंत्राटदाराला दंड लावण्यात येईल. त्याचप्रमाणे १५ कोटी रुपये या कंत्राटदारांनी कशा पद्धतीने लाटले याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही नमूद केले होते. १० जुलैपासून आयुक्त चीन दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावर जाण्यापूर्वी आयुक्तांनी एकाही कंत्राटदाराला दंड लावला नाही. काम न करता बिले उचलणाऱ्या कंत्राटदारांची चौकशीही सुरू केली नाही. भ्रष्टाचाराचे ‘दिवे’लावणाऱ्या कंत्राटदारांना प्रशासनच अभय देत असल्याचे समोर येत आहे.