लातूर : निलंगा तालुक्यातील बामणी शिवारात आंबे उतरविण्याच्या कारणावरून डोळ्यात मिरची पावडर टाकून तुफान मारहाण झाल्याची घटना गुरूवारी घडली. याबाबत निलंगा पोलिसात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलंगा तालुक्यात बामणी येथे शिवदास संतराम माकणे यांनी गोविंद गोपाळ बेरड यास ‘तुम्ही आमच्या आंब्याच्या झाडावरील आंबे का उतरविता’ असे विचारले असता, त्यांना गोविंद बेरड व अन्य पाचजणांनी ‘ही जमीन अम्हाला इनामी मिळाली आहे. त्यात तुमचा काय संबंध. जमीन आमचीच आहे. तू कोण विचारणारा’ म्हणून डोळ्यात मिरची पावडर टाकून जबर मारहाण केली. रूमण्याने डोक्यात मारून जखमी केले. डोक्यात, पायावर, हातावर तसेच पोटावर मारून जिवे मारण्याची धमकी दिली, असे शिवदास माकणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गोविंद बेरड याच्यासह पाच जणांविरूध्द निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)
डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण
By admin | Updated: May 24, 2014 01:37 IST