शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

पोटापाण्याचीचिंता मिटली

By admin | Updated: March 30, 2015 00:44 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड हजार-बारशे लोकवस्तीचे गाव, ना जगण्याचे कुठले साधन.. ना पिण्यासाठी पाणी.. हत्तीच्या मस्तकासारखी काळीभोर जमीन असूनही पाण्याअभावी नशीबी कपाळकरंटेपणाच.

व्यंकटेश वैष्णव , बीडहजार-बारशे लोकवस्तीचे गाव, ना जगण्याचे कुठले साधन.. ना पिण्यासाठी पाणी.. हत्तीच्या मस्तकासारखी काळीभोर जमीन असूनही पाण्याअभावी नशीबी कपाळकरंटेपणाच. अशा असाह्य गावाच्या मदतीला तीन सामाजिक संस्था ऐन दुष्काळात धावून आल्या. रोज दोन वेळेचे जेवण व पाण्याचे टँकर गावाला दिल्याने पाटोदा तालुक्यातील येवलवाडी (सडकेची) येथील दुष्काळग्रस्तांची पोटापाण्याची चिंता मिटली आहे.पाटोदा तालुका हा कायम दुष्काळी असल्याने येथील गावेच्या गावे ओस पडली आहेत. मजुरांच्या हाताला काम नसल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. पाटोद्यापासून पश्चिमेला पंधरा किलो मीटर अंतरावर असलेल्या येवलेवाडी येथील लोकसंख्या हजार ते बाराशेच्या घरात आहे. ६०० ते ७०० ग्रामस्थांनी हाताला काम नाही म्हणून पोट भरण्यासाठी स्थलांतर केलेले आहे. उर्वरीत ग्रामस्थांच्या जेवनाची देखील पंचाईत आहे. अशा स्थितीत सामाजिक उत्तरदायित्वाचे भान असलेल्या सस्थांनी पुढाकार घेत येवलेवाडी हे गाव तीन महिन्यासाठी दत्तक घेतले. दोन वेळेचे जेवण, पाणी दिले मोफतकेज येथील जनविकास सामाजिक संस्थेचे प्रमुख रमेश भिसे यांनी पुढाकार घेत २४ मार्च पासून येवलेवाडी येथील दोनशे ग्रामस्थांना दोनवेळेचे जेवण व पाणी मोफत दिले जात आहे. जनविकास सामाजिक संस्थेच्या मतदतीला मुंबई येथील ‘केअरींग इन फेन्डंस’ संस्थेचे निमेश भाई सुमित व यवतमाळ येथील दिलासाचे मधुकर धस हे धावून आले आहेत.शासन मदतीची केली नाही अपेक्षाशासन आम्हाला काय मदत करेल यापेक्षा आम्ही दुष्काळग्रस्तांसाठी काय मदत करू शकतो ? हे अधिक महत्त्वाचे आहे. येवलवाडी येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी नाही. ६० टक्के ग्रामस्थांचे कामाच्या शोधात स्थलांतर झाले आहे.ग्रामस्थांची स्थिती लक्षात घेता आम्ही पुढील तीन महिने मोफत जेवण व पाणी देणार आहोत. पाण्यासाठी एका टँकरची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जनविकास सामाजिक संस्थेचे प्रमुख रमेश भिसे यांनी सांगितले.दुष्काळी परिस्थितीची पहाणी करण्यासाठी सर्वच पक्षाचे केंद्रातील व राज्यातील नेत्यांनी बीड जिल्ह्याचे दौरे केल्याचे आढळून आले आहे.४महामार्गालगतच्या एखाद्या शेताला व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेट द्यायची व बीड शहरात येऊन पत्रकार परिषद घ्यायची यापलीकडे नेत्यांचे दुष्काळ दौरे गेलेले नाहीत.४नेत्यांचे दुष्काळ दौरे केवळ आश्वासनांनीच गाजले असल्याचे चित्र आजवर तरी जिल्ह्यात पहावयास मिळाले आहेत.सामाजिक उत्तरदायित्व म्हणून येवलवाडी येथील दुष्काळग्रस्तांच्या मदतीला आम्ही शासन मदतीची अपेक्षा न करीता धावून गेलो आहोत. सध्या वरणभात, शिरा हे प्रकार ग्रामस्थांना देतोत. पुढील आठवड्यापासून पोळीभाजीचे जेवण देणार आहोत.- रमेश भिसेजनविकास सामाजिक संस्था