शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

रोषामुळे निवड स्थगित

By admin | Updated: January 15, 2016 00:18 IST

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षाची निवड गुरुवारी ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली.

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षाची निवड गुरुवारी ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. एका नावावर शिक्कामोर्तब झाल्याची कुणकुण लागताच शहरातील काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी दुपारीच त्याविरोधात जालन्याला प्रदेशाध्यक्षांकडे धाव घेतली. तिथे तीन तास खलबते झाल्यावरही शहराध्यक्षांच्या नावावर एकमत होऊ शकले नाही. दुसरीकडे शहरात निवडीच्या ठिकाणी दुपारनंतर सर्वच गटांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली. या पार्श्वभूमीवर सायंकाळी उशिरा निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलल्याचे जाहीर करण्यात आले. नियोजित कार्यक्रमानुसार आज भाजपच्या शहर आणि जिल्हाध्यक्षांची निवड होणार होती. शहराध्यक्षपदासाठी माजी आमदार किशनचंद तनवाणी, संजय केणेकर, दिलीप थोरात, संजय जोशी, अनिल मकरिये यांच्यासह इतरही काही जणांनी इच्छा दर्शविलेली आहे. हे पद मिळविण्यासाठी सर्वांकडूनच जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्यातच प्रदेशाध्यक्षांकडून एक नाव निश्चित झाल्याची कुणकुण सकाळीच शहरातील पदाधिकाऱ्यांना लागली. जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून पक्षात नव्याने आलेल्या व्यक्तीची निवड झाल्याची चर्चा सुरू झाली. त्याविरोधात शहरातील काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी तातडीने जालन्याकडे धाव घेतली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांनी संबंधित नावाला विरोध दर्शविला. शहराध्यक्षपद पक्षातल्याच माणसाला द्या, बाहेरून आलेल्यांना नको, असा आग्रह या सर्वांनी धरल्याचे समजते. या गोंधळामुळे पक्षाने शहराध्यक्ष निवडीसाठी नियुक्त केलेले निरीक्षक आ. सुभाष देशमुख हेही जालन्यातच थांबले. इकडे ठरल्यानुसार दुपारी ३.३० वाजता पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी कलश मंगल कार्यालयात जमले; परंतु सहा वाजले तरी निवडणूक निरीक्षक सुभाष देशमुख तेथे पोहोचले नाहीत. अस्वस्थतेनंतर शेवटी वरिष्ठांच्या आदेशानुसार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कलश मंगल कार्यालयात येऊन निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलल्याची घोषणा केली. जिल्हाध्यक्ष निवडही बारगळलीशहराध्यक्षांप्रमाणेच भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांचीही निवड गुरुवारी होणार होती. त्यासाठी पदाधिकाऱ्यांना दुपारी ३.३० वाजता विभागीय कार्यालयात बोलावण्यात आले होते. येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली; परंतु निवडणूक निरीक्षक खा. अमर साबळे शहरात येऊ शकले नाहीत. म्हणून जिल्हाध्यक्षांची निवड उद्या करण्यात येईल, असा निरोप ४ वाजताच संबंधितांना देण्यात आला. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी आ. प्रशांब बंब, प्रदीप पाटील, संजय खंबायते, एकनाथ जाधव, सुरेश बनकर आदींची नावे चर्चेत आहेत. निवड दोन दिवसांनी पक्षात जुनेविरुद्ध बाहेरून आलेले असा वाद निर्माण झाला आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्याचा विचार करून आजची निवड स्थगित करण्यात आली. आता ही निवड दोन दिवसांनी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.