शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

पाण्याअभावी थांबले पोस्टमार्टेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:37 AM

घाटी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मंगळवारी (दि. १७) पाण्याअभावी शवविच्छेदन प्रक्रिया थांबल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मंगळवारी (दि. १७) पाण्याअभावी शवविच्छेदन प्रक्रिया थांबल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सकाळपासून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. दुपारी १२ वाजेपर्यंत पाण्याचा प्रश्न न सुटल्याने संयम सुटल्याने नातेवाईकांनीच टँकर मागविला.घाटीत सकाळी ६ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत केवळ दोन मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. शवविच्छेदनगृहातील पाणी संपल्याने दुपारपर्यंत तीन मृतदेहांचे शवविच्छेदन थांबले. सिडको बसस्थानक चौकात झालेल्या अपघातातील मयत बालाजी ढंगारे यांच्या नातेवाईकांनाही मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी दुपारी १२ वाजेपर्यंत वाट बघावी लागली. पाण्यामुळे शवविच्छेदन होत नसल्याची कल्पना येताच नातेवाईकांनीच टँकर मागवून घेतले. केवळ टँकर मागवून नातेवाईक थांबले नाही तर त्यांनी स्वत: टाक्यांमध्ये पाणी चढविण्यासाठी मदत केली. मयतांचे नातेवाईक आणि मित्रांनी संताप व्यक्त करताच घाटी प्रशासनानेही टँकर मागविला. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरळीत झाली.घाटीत दररोज २ ते १४ मृतदेहांचे शवविच्छेदन होते. यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने येथे दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. सोमवारी दिवसभरात १४ मृतदेहांचे शवविच्छेदन झाले; परंतु दुस-या दिवशी पुरेसे पाणी आहे की नाही, याची खबरदारी घेण्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे मंगळवारच्या घटनेने समोर आले.