शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

पदव्युत्तर ‘सीईटी’चा उडाला बोजवारा

By admin | Updated: July 11, 2017 00:29 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदव्युत्तर प्रवेशासाठी पहिल्यांदाच घेतलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेचा (सीईटी) नियोजनशून्यतेमुळे सोमवारी बोजवारा उडाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदव्युत्तर प्रवेशासाठी पहिल्यांदाच घेतलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेचा (सीईटी) नियोजनशून्यतेमुळे सोमवारी बोजवारा उडाला. ‘सीईटी’च्या मूळ धोरणालाच हरताळ फासत विषयांनुसार नव्हे तर कला, वाणिज्य आणि विज्ञान या विद्याशाखेनिहाय परीक्षा घेतली असल्याचे स्पष्ट झाले. या गोंधळामुळे विधि, पत्रकारिता, मानसशास्त्रांसह इतर अभ्यासक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग, उस्मानाबाद उपकेंद्र आणि संलग्न १२७ महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सुरुवातीपासूनच ही सीईटी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आॅनलाइन सीईटी घेण्यासाठी ‘वुई शाईन’ या कंपनीला १ कोटी रुपयांचे टेंडरही देण्यात आले होते. या निर्णयाला सर्व स्तरातून प्रखर विरोध झाल्यामुळे हा निर्णय बदलावा लागला. शेवटी आॅफलाइन सीईटी घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. यातही अनेक चुका असल्याचे समोर आले. या चुका दुरुस्त न करण्यात आल्यामुळे ऐन परीक्षेच्या दिवशीच काही विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागली. देशभरात विविध अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात येते. त्यात ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यावयाचा आहे, त्या विषयाची सीईटी होते. मात्र विद्यापीठाने अजबच कारभार केल्याचे दिसत आहे.विद्यार्थ्याला ज्या विषयासाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्याचा पर्यायच आॅनलाइन परीक्षा नोंदणी करताना ठेवला नाही. यामुळे बी. ए. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या प्रवेशसाठीही सामाजिकशास्त्र विषयाची परीक्षा द्यावी लागली आहे. बी.कॉम. झालेल्या विद्यार्थ्यांना विधि अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यांनाही एम.कॉम.ची सीईटी द्यावी लागली. यामुळे मुळातच सीईटीचे धोरण चुकले असल्याचे या प्रकारांवरून स्पष्ट झाले. विद्यापीठाच्या या धोरणाविषयी विद्यार्थ्यांनीही तक्रारी केल्या. दोन सत्रांत झाली परीक्षाविद्यापीठातीलच संगणकशास्त्र विभागात असलेल्या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. त्याठिकाणी प्रश्नपत्रिका कमी पडल्यामुळे ११ ते १ आणि १ ते ३ अशा दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. मात्र विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे हा गोंधळ झाल्याचा दावा केला. शहरातील मौलाना आझाद, छत्रपती महाविद्यालय आदी ठिकाणीही विद्यार्थी गोंधळातच होते. पुरातत्वशास्त्र विषयाची तर प्रश्नपत्रिकाच विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली नसल्याचे समजते.