शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

जिल्ह्यातील ३५७ गावांत पाण्यासाठी भटकंतीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:06 IST

-- औरंगाबाद ः उन्हाळ्याच्या झळा लागायला सुरुवात झाली असून, जानेवारी ते मार्चमध्ये संभाव्य टंचाईच्या गावांत टंचाई भासली नाही, तर ...

--

औरंगाबाद ः उन्हाळ्याच्या झळा लागायला सुरुवात झाली असून, जानेवारी ते मार्चमध्ये संभाव्य टंचाईच्या गावांत टंचाई भासली नाही, तर एप्रिल ते जूनच्या काळात ३५७ गाव, वाड्या-वस्त्यांत पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य टंचाई आराखड्याला मान्यता दिली आहे. जिल्ह्यात अद्याप टंचाईची स्थिती उद्भवली नसल्याने उपाययोजना कराव्या लागल्या नसल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेने जानेवारी ते जून २०२१ साठी पाणीटंचाईच्या शक्यता लक्षात घेऊन ८७२ गावांत १४३८ योजनांच्या उपाययोजनांचा प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकारी यांनी या संभाव्य टंचाई आराखड्यास मंजुरी दिली असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील खंडारे यांनी दिली. २३३ गावांत २४९ विहिरींचे अधिग्रहण, २३ गावांतील २१ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, ९८३ बोअरवेल, ५४ गावांसाठी तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, २७ विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्ती आराखड्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील सुमारे ३०० गावांत कायम टंचाईची स्थिती असते. दरवर्षी उन्हाळ्यात टंचाईची कामे होतात. त्यासाठीचा मंजूर निधी पुढच्या वर्षी मिळतो. त्यामुळे आपत्कालीन उपाययोजनांचा निधी कामावेळीच उपलब्ध व्हावा, अशी मागणी या विभागाकडून होत आहे.

-----

जिल्ह्यातील एकूण गावे - १३७५

बोअरवेलचे खोदकाम होणार - ९८३

बोअरवेलची दुरुस्ती होणार - ५४

विहिरींमधील गाळ काढला जाणार - २१

पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणार - ६२

--

१० विहिरींचे अधिग्रहण

--

जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईची स्थिती नाही. त्यामुळे जानेवारी ते मार्च दरम्यान २१६ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित होते. मात्र, आतापर्यंत एकाही विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

---

४२ टॅंकर लागणार

---

४१ गावांत ४२ टॅंकर लागणार असल्याचे संभाव्य टंचाई कृती आराखड्यात म्हटले आहे. मात्र, अद्याप टॅंकरने किंवा बैलगाडीने टॅंकर पुरवठ्याची ग्रामीण भागात गरज भासली नाही. ६३ वाडी-वस्त्यांवर तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना करण्यात येणार आहेत.

---

पाणीटंचाई आराखडा तयार झाला

---

जिल्ह्यात सद्य:स्थितीत कुठेही टॅंकरद्वारे पुरवठा केला जात नसल्याचे सांगताना यांत्रिकी विभागाचे उपअभियंता डी. बी. पाटील म्हणाले, संभाव्य आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी १४ कोटी ८४ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. यात जानेवारी ते जून दरम्यानच्या उपाययोजनांचा समावेश असून, अद्याप कुठेही टंचाई भासून आलेली नाही.