शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३५७ गावांत पाण्यासाठी भटकंतीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:06 IST

-- औरंगाबाद ः उन्हाळ्याच्या झळा लागायला सुरुवात झाली असून, जानेवारी ते मार्चमध्ये संभाव्य टंचाईच्या गावांत टंचाई भासली नाही, तर ...

--

औरंगाबाद ः उन्हाळ्याच्या झळा लागायला सुरुवात झाली असून, जानेवारी ते मार्चमध्ये संभाव्य टंचाईच्या गावांत टंचाई भासली नाही, तर एप्रिल ते जूनच्या काळात ३५७ गाव, वाड्या-वस्त्यांत पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य टंचाई आराखड्याला मान्यता दिली आहे. जिल्ह्यात अद्याप टंचाईची स्थिती उद्भवली नसल्याने उपाययोजना कराव्या लागल्या नसल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेने जानेवारी ते जून २०२१ साठी पाणीटंचाईच्या शक्यता लक्षात घेऊन ८७२ गावांत १४३८ योजनांच्या उपाययोजनांचा प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकारी यांनी या संभाव्य टंचाई आराखड्यास मंजुरी दिली असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील खंडारे यांनी दिली. २३३ गावांत २४९ विहिरींचे अधिग्रहण, २३ गावांतील २१ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, ९८३ बोअरवेल, ५४ गावांसाठी तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, २७ विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्ती आराखड्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील सुमारे ३०० गावांत कायम टंचाईची स्थिती असते. दरवर्षी उन्हाळ्यात टंचाईची कामे होतात. त्यासाठीचा मंजूर निधी पुढच्या वर्षी मिळतो. त्यामुळे आपत्कालीन उपाययोजनांचा निधी कामावेळीच उपलब्ध व्हावा, अशी मागणी या विभागाकडून होत आहे.

-----

जिल्ह्यातील एकूण गावे - १३७५

बोअरवेलचे खोदकाम होणार - ९८३

बोअरवेलची दुरुस्ती होणार - ५४

विहिरींमधील गाळ काढला जाणार - २१

पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणार - ६२

--

१० विहिरींचे अधिग्रहण

--

जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईची स्थिती नाही. त्यामुळे जानेवारी ते मार्च दरम्यान २१६ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित होते. मात्र, आतापर्यंत एकाही विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

---

४२ टॅंकर लागणार

---

४१ गावांत ४२ टॅंकर लागणार असल्याचे संभाव्य टंचाई कृती आराखड्यात म्हटले आहे. मात्र, अद्याप टॅंकरने किंवा बैलगाडीने टॅंकर पुरवठ्याची ग्रामीण भागात गरज भासली नाही. ६३ वाडी-वस्त्यांवर तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना करण्यात येणार आहेत.

---

पाणीटंचाई आराखडा तयार झाला

---

जिल्ह्यात सद्य:स्थितीत कुठेही टॅंकरद्वारे पुरवठा केला जात नसल्याचे सांगताना यांत्रिकी विभागाचे उपअभियंता डी. बी. पाटील म्हणाले, संभाव्य आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी १४ कोटी ८४ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. यात जानेवारी ते जून दरम्यानच्या उपाययोजनांचा समावेश असून, अद्याप कुठेही टंचाई भासून आलेली नाही.