शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

जिल्ह्यातील ३५७ गावांत पाण्यासाठी भटकंतीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:06 IST

-- औरंगाबाद ः उन्हाळ्याच्या झळा लागायला सुरुवात झाली असून, जानेवारी ते मार्चमध्ये संभाव्य टंचाईच्या गावांत टंचाई भासली नाही, तर ...

--

औरंगाबाद ः उन्हाळ्याच्या झळा लागायला सुरुवात झाली असून, जानेवारी ते मार्चमध्ये संभाव्य टंचाईच्या गावांत टंचाई भासली नाही, तर एप्रिल ते जूनच्या काळात ३५७ गाव, वाड्या-वस्त्यांत पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य टंचाई आराखड्याला मान्यता दिली आहे. जिल्ह्यात अद्याप टंचाईची स्थिती उद्भवली नसल्याने उपाययोजना कराव्या लागल्या नसल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेने जानेवारी ते जून २०२१ साठी पाणीटंचाईच्या शक्यता लक्षात घेऊन ८७२ गावांत १४३८ योजनांच्या उपाययोजनांचा प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकारी यांनी या संभाव्य टंचाई आराखड्यास मंजुरी दिली असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील खंडारे यांनी दिली. २३३ गावांत २४९ विहिरींचे अधिग्रहण, २३ गावांतील २१ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, ९८३ बोअरवेल, ५४ गावांसाठी तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, २७ विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्ती आराखड्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील सुमारे ३०० गावांत कायम टंचाईची स्थिती असते. दरवर्षी उन्हाळ्यात टंचाईची कामे होतात. त्यासाठीचा मंजूर निधी पुढच्या वर्षी मिळतो. त्यामुळे आपत्कालीन उपाययोजनांचा निधी कामावेळीच उपलब्ध व्हावा, अशी मागणी या विभागाकडून होत आहे.

-----

जिल्ह्यातील एकूण गावे - १३७५

बोअरवेलचे खोदकाम होणार - ९८३

बोअरवेलची दुरुस्ती होणार - ५४

विहिरींमधील गाळ काढला जाणार - २१

पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणार - ६२

--

१० विहिरींचे अधिग्रहण

--

जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईची स्थिती नाही. त्यामुळे जानेवारी ते मार्च दरम्यान २१६ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित होते. मात्र, आतापर्यंत एकाही विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

---

४२ टॅंकर लागणार

---

४१ गावांत ४२ टॅंकर लागणार असल्याचे संभाव्य टंचाई कृती आराखड्यात म्हटले आहे. मात्र, अद्याप टॅंकरने किंवा बैलगाडीने टॅंकर पुरवठ्याची ग्रामीण भागात गरज भासली नाही. ६३ वाडी-वस्त्यांवर तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना करण्यात येणार आहेत.

---

पाणीटंचाई आराखडा तयार झाला

---

जिल्ह्यात सद्य:स्थितीत कुठेही टॅंकरद्वारे पुरवठा केला जात नसल्याचे सांगताना यांत्रिकी विभागाचे उपअभियंता डी. बी. पाटील म्हणाले, संभाव्य आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी १४ कोटी ८४ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. यात जानेवारी ते जून दरम्यानच्या उपाययोजनांचा समावेश असून, अद्याप कुठेही टंचाई भासून आलेली नाही.