शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दिवाळीवर पावसाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:32 IST

दिवाळी काही दिवसांवर आलेली असतानाही शहरावर पावसाचे सावट कायम आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिवाळी काही दिवसांवर आलेली असतानाही शहरावर पावसाचे सावट कायम आहे. गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणात वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह अधूनमधून पाऊस पडतोय. शनिवारीदेखील (दि.१४) त्याला अपवाद ठरला नाही.दुपारी ४ वाजता ढग दाटून आले आणि सुमारे अर्धा तास धो-धो पावसाने शहर अक्षरश: धुऊन काढले. या अर्ध्या तासात चिकलठाणा वेधशाळेमध्ये ९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. सकाळी काही काळ उन्हाचा पारा वाढलाहोता. त्यानंतर दुपारी ढगाळ वातावरण झाले. हर्सूल, पिसादेवी, मयूरपार्क आदी भागात दुपारी दोन वाजेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. हळूहळू मग संपूर्ण शहरात सरीबरसल्या.मध्य शहर, सिडको, निराला बाजार, गुलमंडी, मुकुंदवाडी, जयभवानीनगर, सातारा परिसर, विद्यापीठ या भागांत पावसाचा जोर अधिक होता.सायंकाळी पाचनंतर पावसाने काहीशी उघडीप दिली. काळे ढग एवढे दाट होते की, चार वाजताच सायंकाळ झाल्याचा भास होत होता.शुक्रवारीदेखील शहरातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. औरंगाबादमध्ये परतीच्या पावसाचा मुक्काम सुरूच आहे. गेले सात दिवस विजांच्या कडकडाटासह शहरातील बहुतेक ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.ग्राहक-विके्रत्यांची दैनादुसरा शनिवारी असल्याने अनेक कार्यालयांना सुटी होती. त्यामुळे दुपारपासूनच बाजारपेठांमध्ये शहरवासीयांची गर्दी झाली होती; परंतु दुपारनंतर ढग जमा होण्यास सुुरुवात झाली आणि थंड वारे वाहू लागले.चार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस पडू लागल्यावर रस्त्यावरील हातगाड्यांवरील विक्रे त्यांची दैना उडाली.माल भिजण्यापासून वाचविताना त्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. पावसामुळे नागरिकांच्याही दिवाळी खरेदीच्या उत्साहावरपाणीफिरले.