शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पालिकेच्या मालमत्ता खाजगी व्यक्तींच्या ताब्यात

By admin | Updated: May 24, 2017 00:40 IST

अंबड : अंबड नगरपालिकेची बहुतांश मालमत्ता गावगुंडाच्या ताब्यात आहे.

रवी गात । लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : अंबड नगरपालिकेची बहुतांश मालमत्ता गावगुंडाच्या ताब्यात आहे. मात्र या गावगुंडावर कारवाई करण्याऐवजी भ्रष्ट पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची साखळी गावगुंडानाच साथ देत आहे. शहर परिसरातील नगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या मालकीच्या दुकानांवर, गाळयांवर, सामाजिक सभागृहांवर तसेच मोकळया सहान जागेवर शहरातील काही पांढरपेशा गावगुंडानी कब्जा मिळविला आहे. हतबल नगरपालिका प्रशासन या गावगुंडावर कारवाई करणे, भाडे वसुल करणे, करार संपलेल्या गाळयांचा पुर्नलिलाव करणे, मोकळ्या सहान जागेंवरील अतिक्रमण काढुन टाकणे, अतिक्रमित बांधकामांना जमीनदोस्त करणे, सदरील गावगुंडावर कडक कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आदी कठोर पावले उचलण्याऐवजी त्यांच्याच ताटाखालचे मांजर बनल्याचे चित्र अंबडमध्ये दिसत आहे. शहरात अंबड नगरपालिकेच्या मालकीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळील जुना मोंढा परिसरातील हॉकर्स मार्केट येथे १६ दुकान गाळे, आठवडी बाजाराजवळ १८ दुकान गाळे, नगरपालिकेच्या जुन्या इमारतीजवळील शॉपिंग सेंटरमध्ये २५ दुकान गाळे, शादीखाना शेजारील जुनी भाजीमंडई येथे १५ दुकान गाळे, शंकरराव चव्हाण शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये २० दुकान गाळे, जुनी पालिका इमारतीजवळ ५ दुकान गाळे असे एकुण तब्बल १०४ दुकानांचे गाळे शहरात आहेत. नगरपालिकेच्या गाळयांचा पहिला लिलाव १९७७ मध्ये करण्यात आला होता. यासंदर्भात अधिक चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. शहरात पालिकेच्या नेमक्या किती स्थावर मालमत्ता आहे व त्या मालमत्ता सध्या कोणाच्या ताब्यात आहे याविषयी माहिती उपलब्ध नसल्याचे आढळून आले. याविषयी मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.