शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या ४० भूखंडांवर खाजगी नागरिकांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरात महापालिकेच्या मालकीचे जवळपास तेराशे भूखंड आहेत. बाजार दरानुसार या भूखंडांची किंमत जवळपास पाच हजार कोटी रुपये ...

औरंगाबाद : शहरात महापालिकेच्या मालकीचे जवळपास तेराशे भूखंड आहेत. बाजार दरानुसार या भूखंडांची किंमत जवळपास पाच हजार कोटी रुपये आहे. कोट्यवधी रुपयांच्या तब्बल ४० भूखंडांवर खाजगी नागरिकांनी ताबा घेतला आहे. गलथान आणि भ्रष्ट कारभारामुळे भूमाफियांनी महापालिकेचे भूखंड हडपण्याचा सपाटाच लावला आहे. स्वतःच्या मालकीचे भूखंड सांभाळण्यात महापालिका अपयशी ठरलेली असतानाच सिडकोकडून प्राप्त झालेले भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा घाट प्रशासनाने घातला होता.

शहराच्या विविध भागांत मनपाच्या कोट्यवधी रुपयांच्या जागा आहेत. समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी बँकेकडून कर्ज काढताना महापालिकेची सुमारे ५ हजार कोटींची पत असल्याचे समोर आले होते. मात्र, यातील अनेक भूखंड आजही महापालिकेच्या नावावर नाहीत. काही भूखंड महापालिकेच्या नावावर असताना खासगी लोकांच्या घशात जात आहेत. रवींद्रनगर येथील भूखंड १५ वर्षांच्या वादानंतर महापालिकेने ताब्यात घेतला. त्यात महापालिका प्रशासनापेक्षा नागरिकांनी दिलेल्या लढ्याचे मोठे यश आहे. त्रिमूर्ती चौकात असलेल्या एका भूखंडावर महापालिकेच्या मालकीचे नाव होते; पण संबंधित व्यक्तीने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात महापालिकेने आपली बाजू न मांडल्याने संबंधिताच्या बाजूने निकाल गेला व महापालिकेचे नाव पीआर कार्डवरून वगळण्यात आले. अशाच प्रकारे कटकटगेट, सलीम अली सरोवराशेजारी असलेल्या जागा महापालिकेच्या हातून गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

शासकीय, मनपाचे भूखंड हडपणारे रॅकेट

शहरात शासकीय आणि महापालिकेचे भूखंड बोगस कागदपत्रांच्या आधारे हडपडणारे एक मोठे रॅकेट आहे. पोलिसांच्या रडारवर यातील काही मंडळी आलेली आहे. मात्र, त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. हिमायत बाग, हिमायतनगर, पडेगाव, मिटमिटा, सुभेदारी विश्रामगृह परिसर आदी ठिकाणी कारवाया सुरूच आहेत.

अनेक प्रकरणांचा वाद न्यायालयात

महापालिकेच्या मालकीच्या सर्व भूखंडांचे पीआरकार्ड तयार करून घेण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती. तत्कालीन आयुक्त असिमकुमार गुप्ता यांनी ही मोहीम सुरू केली. मात्र, पुढे त्यांची बदली होताच महापालिकेला पीआरकार्डचा विसर पडला. याचा फायदा घेत अनेकांनी बनावट कागदपत्रे तयार करून महापालिकेच्या विरोधात न्यायालयात दावे दाखल केले आहेत. अशी किमान ३० ते ४० प्रकरणे असावीत, असे सूत्रांनी नमूद केले.