शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

महापालिकेच्या ४० भूखंडांवर खाजगी नागरिकांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरात महापालिकेच्या मालकीचे जवळपास तेराशे भूखंड आहेत. बाजार दरानुसार या भूखंडांची किंमत जवळपास पाच हजार कोटी रुपये ...

औरंगाबाद : शहरात महापालिकेच्या मालकीचे जवळपास तेराशे भूखंड आहेत. बाजार दरानुसार या भूखंडांची किंमत जवळपास पाच हजार कोटी रुपये आहे. कोट्यवधी रुपयांच्या तब्बल ४० भूखंडांवर खाजगी नागरिकांनी ताबा घेतला आहे. गलथान आणि भ्रष्ट कारभारामुळे भूमाफियांनी महापालिकेचे भूखंड हडपण्याचा सपाटाच लावला आहे. स्वतःच्या मालकीचे भूखंड सांभाळण्यात महापालिका अपयशी ठरलेली असतानाच सिडकोकडून प्राप्त झालेले भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा घाट प्रशासनाने घातला होता.

शहराच्या विविध भागांत मनपाच्या कोट्यवधी रुपयांच्या जागा आहेत. समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी बँकेकडून कर्ज काढताना महापालिकेची सुमारे ५ हजार कोटींची पत असल्याचे समोर आले होते. मात्र, यातील अनेक भूखंड आजही महापालिकेच्या नावावर नाहीत. काही भूखंड महापालिकेच्या नावावर असताना खासगी लोकांच्या घशात जात आहेत. रवींद्रनगर येथील भूखंड १५ वर्षांच्या वादानंतर महापालिकेने ताब्यात घेतला. त्यात महापालिका प्रशासनापेक्षा नागरिकांनी दिलेल्या लढ्याचे मोठे यश आहे. त्रिमूर्ती चौकात असलेल्या एका भूखंडावर महापालिकेच्या मालकीचे नाव होते; पण संबंधित व्यक्तीने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात महापालिकेने आपली बाजू न मांडल्याने संबंधिताच्या बाजूने निकाल गेला व महापालिकेचे नाव पीआर कार्डवरून वगळण्यात आले. अशाच प्रकारे कटकटगेट, सलीम अली सरोवराशेजारी असलेल्या जागा महापालिकेच्या हातून गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

शासकीय, मनपाचे भूखंड हडपणारे रॅकेट

शहरात शासकीय आणि महापालिकेचे भूखंड बोगस कागदपत्रांच्या आधारे हडपडणारे एक मोठे रॅकेट आहे. पोलिसांच्या रडारवर यातील काही मंडळी आलेली आहे. मात्र, त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. हिमायत बाग, हिमायतनगर, पडेगाव, मिटमिटा, सुभेदारी विश्रामगृह परिसर आदी ठिकाणी कारवाया सुरूच आहेत.

अनेक प्रकरणांचा वाद न्यायालयात

महापालिकेच्या मालकीच्या सर्व भूखंडांचे पीआरकार्ड तयार करून घेण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती. तत्कालीन आयुक्त असिमकुमार गुप्ता यांनी ही मोहीम सुरू केली. मात्र, पुढे त्यांची बदली होताच महापालिकेला पीआरकार्डचा विसर पडला. याचा फायदा घेत अनेकांनी बनावट कागदपत्रे तयार करून महापालिकेच्या विरोधात न्यायालयात दावे दाखल केले आहेत. अशी किमान ३० ते ४० प्रकरणे असावीत, असे सूत्रांनी नमूद केले.