शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

वरंडी धरणातून बेसुमार पाणी उपसा

By admin | Updated: July 21, 2014 00:35 IST

कचनेर : पैठण तालुक्यातील वरवंडी लघुसिंचन तलावातील पाणीसाठा राखीव ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असताना त्यातून काही शेतकरी बेसुमार पाणी उपसा करीत आहेत.

कचनेर : पैठण तालुक्यातील वरवंडी लघुसिंचन तलावातील पाणीसाठा राखीव ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असताना त्यातून काही शेतकरी बेसुमार पाणी उपसा करीत आहेत.त्यामुळे या तलावातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी कमी होत असून, यंदाचा कमी पावसाळा पाहता भविष्यात या परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.या तलावाच्या संपादित केलेल्या भागात काही शेतकऱ्यांनी विहिरी करून मोटारी बसविल्या असून, काहींनी पाईपलाईन टाकून पाणी उपसा सुरू केला आहे. विशेष म्हणजे रात्री -बेरात्री पाणी उपसा करून बागायती भागास पाणी दिले जाते. त्यामुळे तलावातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी कमी होत असून, सिंचन विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. त्यातच महावितरणने तलावाभोवतालचा वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश दिलेला असताना आणि तहसीलदार, तलाठी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असतानाही ही परिस्थिती कायम आहे. या तलावातून तीन गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. पाणीसाठा संपुष्टात आल्यास या गावांवर भविष्यात भटकण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी हा तलाव १०० टक्के भरला होता; पण काही शेतकऱ्यांनी सांडवा फोडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते.त्यानंतर सांडव्याची जुजबी दुरुस्तीही करण्यात आली होती. सिमेंट काँक्रीटने दुरुस्ती न करता मुरूम व दगडाने सांडव्याची दुरुस्ती करण्यात आली होती. (वार्ताहर)