शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

वरंडी धरणातून बेसुमार पाणी उपसा

By admin | Updated: July 21, 2014 00:35 IST

कचनेर : पैठण तालुक्यातील वरवंडी लघुसिंचन तलावातील पाणीसाठा राखीव ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असताना त्यातून काही शेतकरी बेसुमार पाणी उपसा करीत आहेत.

कचनेर : पैठण तालुक्यातील वरवंडी लघुसिंचन तलावातील पाणीसाठा राखीव ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असताना त्यातून काही शेतकरी बेसुमार पाणी उपसा करीत आहेत.त्यामुळे या तलावातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी कमी होत असून, यंदाचा कमी पावसाळा पाहता भविष्यात या परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.या तलावाच्या संपादित केलेल्या भागात काही शेतकऱ्यांनी विहिरी करून मोटारी बसविल्या असून, काहींनी पाईपलाईन टाकून पाणी उपसा सुरू केला आहे. विशेष म्हणजे रात्री -बेरात्री पाणी उपसा करून बागायती भागास पाणी दिले जाते. त्यामुळे तलावातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी कमी होत असून, सिंचन विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. त्यातच महावितरणने तलावाभोवतालचा वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश दिलेला असताना आणि तहसीलदार, तलाठी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असतानाही ही परिस्थिती कायम आहे. या तलावातून तीन गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. पाणीसाठा संपुष्टात आल्यास या गावांवर भविष्यात भटकण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी हा तलाव १०० टक्के भरला होता; पण काही शेतकऱ्यांनी सांडवा फोडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते.त्यानंतर सांडव्याची जुजबी दुरुस्तीही करण्यात आली होती. सिमेंट काँक्रीटने दुरुस्ती न करता मुरूम व दगडाने सांडव्याची दुरुस्ती करण्यात आली होती. (वार्ताहर)