शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

कठड्यांअभावी पूल धोकादायक

By admin | Updated: May 25, 2014 01:14 IST

कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा परिसरातील अनेक गावांना जोडणार्‍या रस्त्यावरील पुलांचे लोखंडी कठडे गायब झाले आहेत.

कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा परिसरातील अनेक गावांना जोडणार्‍या रस्त्यावरील पुलांचे लोखंडी कठडे गायब झाले आहेत. याठिकाणी आता कठड्यांचे पाईप शिल्लक राहिले आहेत. पावसाळ्यात पाण्याच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी असलेले कठडे कोणत्याच पुलावर राहिले नसल्याने कठड्याविना पूल धोकादायक बनले आहेत. कुरूंदा येथील नदीवर असलेल्या पुलावरचे लोखंडी कठडे भुरट्या चोरट्यांनी लंपास केल्याने केवळ लोखंडी पाईप शिल्लक राहिले आहे. वसमत-कुरूंदा या मुख्य रस्त्यावर असलेल्या कौठा येथील आसना नदीवरील पुलाचे कठडेहीे गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहेत. या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात दोन फूट पाणी वाहत असते. हा रहदारीचा रस्ता असल्याने पावसाळ्यातही त्याठिकाणी मोठी वर्दळ असते. पाण्याच्या प्रवाहापासून धोका टाळण्यासाठी असलेले कठडेच शिल्लक राहिले नसल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. काही महिन्यांपूर्वी कठड्यांअभावी कौठा पुलावरून एक दुचाकीस्वार खाली कोसळून मरण पावल्याची दुर्घटना घडली. या भागात अनेक पुलांवर असलेले सिमेंटचे कठडे निकृष्ट कामामुळे कोसळले आहेत. लोखंडी कठड्यांऐवजी सिमेंटचे उत्कृष्ट कठडे सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारावेत. जेणेकरून ते कठडे गायब होणार नाहीत, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थ व प्रवासी व्यक्त करीत आहेत. परंतू कठड्यांच्या या प्रश्नाकडे बांधकाम विभागाचे अद्याप लक्ष गेलेले नाही. औंढा व वसमत महामार्गावरील अनेक पुलाचे कठडे कुचकामी ठरले आहेत तर लोखंडी कठडे गायब झाले आहेत. या भागातील कुरूंदा, कौठा, आंबा, वसमत रस्त्यावरील आसना नदीवरील पुलांना कठडेच नसल्याने पावसाळ्यात हे पूल अधिक धोकादायक ठरत आहेत. या चारही ठिकाणच्या नदी पावसाळ्यात दुथडी भरुन वाहत असतात. याकडे लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी पुलांवर संरक्षक कठडे बांधावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील नदीवर असलेल्या पुलावरचे लोखंडी संरक्षक कठडे भुरट्या चोरट्यांनी लंपास केले आहेत पुलावर केवळ लोखंडी पाईप शिल्लक राहिला आहे वसमत-कुरूंदा या मुख्य रस्त्यावर असलेल्या कौठा येथील आसना नदीवरील पुलाचे कठडेहीे गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहेत. या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात दोन फुट पाणी वाहत असते. पुलावरून ये-जा करताना पादचार्‍यांसह वाहनधारकांच्या बचावासाठी संरक्षक कठडे बसविण्यात येतात कुरूंदा भागात चार ठिकाणच्या नदीवर बसविलेले कठडे अनेक दिवसांपासून गायब आहेत पूल धोकादायक बनले आहेत