शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

कठड्यांअभावी पूल धोकादायक

By admin | Updated: May 25, 2014 01:14 IST

कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा परिसरातील अनेक गावांना जोडणार्‍या रस्त्यावरील पुलांचे लोखंडी कठडे गायब झाले आहेत.

कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा परिसरातील अनेक गावांना जोडणार्‍या रस्त्यावरील पुलांचे लोखंडी कठडे गायब झाले आहेत. याठिकाणी आता कठड्यांचे पाईप शिल्लक राहिले आहेत. पावसाळ्यात पाण्याच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी असलेले कठडे कोणत्याच पुलावर राहिले नसल्याने कठड्याविना पूल धोकादायक बनले आहेत. कुरूंदा येथील नदीवर असलेल्या पुलावरचे लोखंडी कठडे भुरट्या चोरट्यांनी लंपास केल्याने केवळ लोखंडी पाईप शिल्लक राहिले आहे. वसमत-कुरूंदा या मुख्य रस्त्यावर असलेल्या कौठा येथील आसना नदीवरील पुलाचे कठडेहीे गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहेत. या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात दोन फूट पाणी वाहत असते. हा रहदारीचा रस्ता असल्याने पावसाळ्यातही त्याठिकाणी मोठी वर्दळ असते. पाण्याच्या प्रवाहापासून धोका टाळण्यासाठी असलेले कठडेच शिल्लक राहिले नसल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. काही महिन्यांपूर्वी कठड्यांअभावी कौठा पुलावरून एक दुचाकीस्वार खाली कोसळून मरण पावल्याची दुर्घटना घडली. या भागात अनेक पुलांवर असलेले सिमेंटचे कठडे निकृष्ट कामामुळे कोसळले आहेत. लोखंडी कठड्यांऐवजी सिमेंटचे उत्कृष्ट कठडे सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारावेत. जेणेकरून ते कठडे गायब होणार नाहीत, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थ व प्रवासी व्यक्त करीत आहेत. परंतू कठड्यांच्या या प्रश्नाकडे बांधकाम विभागाचे अद्याप लक्ष गेलेले नाही. औंढा व वसमत महामार्गावरील अनेक पुलाचे कठडे कुचकामी ठरले आहेत तर लोखंडी कठडे गायब झाले आहेत. या भागातील कुरूंदा, कौठा, आंबा, वसमत रस्त्यावरील आसना नदीवरील पुलांना कठडेच नसल्याने पावसाळ्यात हे पूल अधिक धोकादायक ठरत आहेत. या चारही ठिकाणच्या नदी पावसाळ्यात दुथडी भरुन वाहत असतात. याकडे लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी पुलांवर संरक्षक कठडे बांधावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील नदीवर असलेल्या पुलावरचे लोखंडी संरक्षक कठडे भुरट्या चोरट्यांनी लंपास केले आहेत पुलावर केवळ लोखंडी पाईप शिल्लक राहिला आहे वसमत-कुरूंदा या मुख्य रस्त्यावर असलेल्या कौठा येथील आसना नदीवरील पुलाचे कठडेहीे गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहेत. या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात दोन फुट पाणी वाहत असते. पुलावरून ये-जा करताना पादचार्‍यांसह वाहनधारकांच्या बचावासाठी संरक्षक कठडे बसविण्यात येतात कुरूंदा भागात चार ठिकाणच्या नदीवर बसविलेले कठडे अनेक दिवसांपासून गायब आहेत पूल धोकादायक बनले आहेत