शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

कठड्यांअभावी पूल धोकादायक

By admin | Updated: May 25, 2014 01:14 IST

कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा परिसरातील अनेक गावांना जोडणार्‍या रस्त्यावरील पुलांचे लोखंडी कठडे गायब झाले आहेत.

कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा परिसरातील अनेक गावांना जोडणार्‍या रस्त्यावरील पुलांचे लोखंडी कठडे गायब झाले आहेत. याठिकाणी आता कठड्यांचे पाईप शिल्लक राहिले आहेत. पावसाळ्यात पाण्याच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी असलेले कठडे कोणत्याच पुलावर राहिले नसल्याने कठड्याविना पूल धोकादायक बनले आहेत. कुरूंदा येथील नदीवर असलेल्या पुलावरचे लोखंडी कठडे भुरट्या चोरट्यांनी लंपास केल्याने केवळ लोखंडी पाईप शिल्लक राहिले आहे. वसमत-कुरूंदा या मुख्य रस्त्यावर असलेल्या कौठा येथील आसना नदीवरील पुलाचे कठडेहीे गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहेत. या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात दोन फूट पाणी वाहत असते. हा रहदारीचा रस्ता असल्याने पावसाळ्यातही त्याठिकाणी मोठी वर्दळ असते. पाण्याच्या प्रवाहापासून धोका टाळण्यासाठी असलेले कठडेच शिल्लक राहिले नसल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. काही महिन्यांपूर्वी कठड्यांअभावी कौठा पुलावरून एक दुचाकीस्वार खाली कोसळून मरण पावल्याची दुर्घटना घडली. या भागात अनेक पुलांवर असलेले सिमेंटचे कठडे निकृष्ट कामामुळे कोसळले आहेत. लोखंडी कठड्यांऐवजी सिमेंटचे उत्कृष्ट कठडे सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारावेत. जेणेकरून ते कठडे गायब होणार नाहीत, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थ व प्रवासी व्यक्त करीत आहेत. परंतू कठड्यांच्या या प्रश्नाकडे बांधकाम विभागाचे अद्याप लक्ष गेलेले नाही. औंढा व वसमत महामार्गावरील अनेक पुलाचे कठडे कुचकामी ठरले आहेत तर लोखंडी कठडे गायब झाले आहेत. या भागातील कुरूंदा, कौठा, आंबा, वसमत रस्त्यावरील आसना नदीवरील पुलांना कठडेच नसल्याने पावसाळ्यात हे पूल अधिक धोकादायक ठरत आहेत. या चारही ठिकाणच्या नदी पावसाळ्यात दुथडी भरुन वाहत असतात. याकडे लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी पुलांवर संरक्षक कठडे बांधावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील नदीवर असलेल्या पुलावरचे लोखंडी संरक्षक कठडे भुरट्या चोरट्यांनी लंपास केले आहेत पुलावर केवळ लोखंडी पाईप शिल्लक राहिला आहे वसमत-कुरूंदा या मुख्य रस्त्यावर असलेल्या कौठा येथील आसना नदीवरील पुलाचे कठडेहीे गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहेत. या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात दोन फुट पाणी वाहत असते. पुलावरून ये-जा करताना पादचार्‍यांसह वाहनधारकांच्या बचावासाठी संरक्षक कठडे बसविण्यात येतात कुरूंदा भागात चार ठिकाणच्या नदीवर बसविलेले कठडे अनेक दिवसांपासून गायब आहेत पूल धोकादायक बनले आहेत