शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

भिवधानोरा-धनगरपट्टी रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:04 IST

कायगाव : भिवधानोरा ते धनगरपट्टी या डांबरी रस्त्याची गेल्या दहा वर्षांच्या काळात एकदाही दुरुस्ती झाली नाही. या डांबरी रस्त्यावरील ...

कायगाव : भिवधानोरा ते धनगरपट्टी या डांबरी रस्त्याची गेल्या दहा वर्षांच्या काळात एकदाही दुरुस्ती झाली नाही. या डांबरी रस्त्यावरील मोठमोठे खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. आता मात्र या रस्त्याचे दुरुस्ती शक्य नाही, तर रस्ताच नव्याने तयार करावा लागणार आहे.

२०१०-२०११ साली हा डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता. आता या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने रस्त्यावरून चालताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या २० वर्षांत या रस्त्याचे दोनदा डांबरीकरण करण्यात आले. १९९९-२००० साली सर्वप्रथम या ७ किमी रस्त्याचे डांबरीकरण झाले. त्यानंतर तब्बल १० वर्षांनी २०१०-११ ला या रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी मंजूर करण्यात आला. आता त्या कामालाही १० वर्षे लोटली आहेत. भिवधानोरा आणि अगरवाडगाव परिसरातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांची धनगरपट्टी शिवारात शेती असल्याने त्यांना दररोज या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. उसाच्या हंगामात याच रस्त्यावरून उसाच्या गाड्या भरून जातात. तसेच धनगरपट्टी येथील नागरिकांसाठी दुसरा रस्ताच नसल्याने त्यांनाही याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. मालवाहतूकही येथूनच होते. या सर्व कारणांमुळे आणि रस्त्यावरील रहदारीमुळे रस्ता सुस्थितीत असणे गरजेचे आहे. मात्र, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या कामाबद्दल अनेकदा संबंधित विभागाला विनंती करूनही उपयोग झाला नाही. हा रस्ता अनेक ठिकाणी दुतर्फा बाजूने खचला असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची खडी निघून गेली आहे. शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी जवळपासच्या शेतकऱ्यांनी वर्गणी करून रस्त्यावर मुरूम टाकला होता, ता मुरूमसुद्धा उखडला आहे.

चौकट

नागरिकांची आंदोलनाची तयारी

आता पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस पडला की खड्ड्यात पावसाचे पाणी साचून राहतो. रात्री-बेरात्री येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्याचा वापर करणारे तीन गावांतील नागरिक आता सरकारी दिरंगाईला वैतागले आहेत. लवकरच रस्त्याचे काम हाती घेण्यात आले नाही तर आंदोलनाची तयारी नागरिकांनी सुरू केली आहे.

200621\1633-img-20210620-wa0027.jpg

फोटो :

भिवधानोरा-धनगरपट्टी डांबरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहे.

(तारेख शेख)