शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पूल बनलेत ‘मौत का कुआँ’; कठडे गायब, भिंती खचल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 00:14 IST

लातूर : सावित्रीनदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील जुना पूल ढासळून वाहून गेला़ त्यात ३५ जणांचा मृत्यू झाला़ ही घटना कालची आहे़

लातूर : सावित्रीनदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील जुना पूल ढासळून वाहून गेला़ त्यात ३५ जणांचा मृत्यू झाला़ ही घटना कालची आहे़ पण लातूर जिल्ह्यात पुलावरून वाहन कोसळून मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ दोन महिन्यांपूर्वी महापूरच्या पुलाचा कठडा नादुरूस्त असल्याने जीप नदीपात्रात कोसळून चौघा जणांचा मृत्यू झाला़ याच पुलाचा कठडा नादुरूस्त असल्यामुळे एक ट्रॅव्हल्स पडून १२ जणांचा बळी गेला होता़ तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने बोध घेतला नाही़ लातूर जिल्ह्यात असे अनेक पूल नादुरूस्त अवस्थेत आहेत़ त्याचा स्पॉट पंचनामा ‘लोकमत’च्या वार्ताहरांनी गुरूवारी केला़ हे पूल नव्हेत ‘मौत का कुआँ’ आहेत, अशी स्थिती आहे़ कुठे कठडे तर कुठे पुलाच्या भिंती कोसळल्या आहेत़ जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ लातूर जिल्ह्यातील प्रवाशांवर आहे़ तरीही बांधकाम विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे़ लातूर जिल्ह्याला जोडणारे एकूण १६ रस्ते आहेत़ लातूर-औसा, लातूर-बार्शी, लातूर-उदगीर, लातूर-अंबाजोगाई, लातूर-नांदेड, लातूर-कळंब तसेच अंतर्गत सारसा-वांजरखेडा, नायगाव-माटेफळ लातूर- कव्हा-जमालपूर, महापूर- बोरी, लातूर-पानगाव, रेणापूर-उदगीर - देगलूर आदी रस्त्यांवर छोटे- मोठे २६१ पूल आहेत़ मांजरा नदीवर लातूर-अंबाजोगाई आणि लातूर - नांदेड मार्गावर महापूर व भातखेडा गावानजिक मोठे पूल आहेत़ या रस्त्यांवर वर्दळ असते़ विशेष करून महापूरचा पूल अपघात प्रणव म्हणूनच ओळखला जातो़ वारंवार या पुलाची दुरूस्ती होणे गरजेचे आहे़ मात्र त्याकडे दुर्लक्ष होते़ अपघात झाल्यानंतरच डागडुजी केली जाते़ त्यानंतर दुर्लक्ष़ परिणामी, या पुलाच्या नादुरूस्तीमुळे अनेक अपघात घडून माणसे दगावली आहेत़ तरीही बांधकाम विभागाकडे पुलांच्या स्थितीबाबत अपडेट माहिती नाही़ कोणता पूल नादुरूस्त झाला आहे़ त्याचा कालावधी काय, याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेवली नाही़ ‘लोकमत’च्या वार्ताहरांनी १५ पुलांवर गुरूवारी ठाण मांडले़ उदगीर, देवणी, जळकोट, निलंगा, अहमदपूर, रेणापूर, लातूर, चाकूर, शिरूरअनंतपाळ, औसा तालुक्यातील रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या बहुतांश पुलांची अवस्था दयनीय आहे़ अहमदपूर-उदगीर या राज्यमार्गावरील हाळीजवळील निजामकालीन तिरू नदीवरील पूल जीर्ण झाला आहे़ पुलाच्या भिंतीतून मोठ-मोठी झाडे उगविली आहेत़ तर मांजरा नदीवरील गिरकनाळ पुलाला तडे गेले आहेत़ यंत्रणेचे दुर्लक्ष आहे़ (सविस्तर वृत्त हॅलो ४ वर)