शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

पाऊणशे ग्रामीण पाणी योजनांना खिळ !

By admin | Updated: January 31, 2017 00:07 IST

उस्मानाबाद : भाजपाची सत्ता आल्यानंतर मंजूर पाणीपुरवठा योजनांना निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत स्थगिती आदेश काढला.

उस्मानाबाद : वाडी, वस्त्या, तांड्यावरील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी पायपीट लक्षात घेवून केंद्रातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने राष्ट्रीय पेयजल योजना सुरू केली होती. परंतु, केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर उपरोक्त योजनेअंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनांना निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत आखडता हात घेत २९ जून २०१५ रोजी स्थगिती आदेश काढला. जवळपास दीड वर्षाचा कालावधी लोटूनी स्थगिती उठविण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाच्या या भूमिकेबाबत ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील असंख्य गावांना आजही कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना नाहीत. त्यामुळे अशा खेड्यांतील ग्रामस्थांना विशेषत: उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते. हाच प्रश्न लक्षात घेवून केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता असताना राष्ट्रीय पेयजल योजना हाती घेण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून अनेक गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मिळाल्या. आणि ग्रामस्थांची पायपीटही दूर झाली. दरम्यान, केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर टेंडर प्रक्रिया न झालेल्या पाणीपुरवठा योजनांना २९ जून २०१५ रोजी स्थगिती देण्यात आली. पुढील आदेश येईर्पंत संबंधित योजनांची कामे सुरू केली जावू नयेत, असे आदेशामध्ये नमूद केले होते. या आदेशाचा जिल्हाभरातील एक -दोन नव्हे, तर तब्बल ७५ योजनांना फटका बसला आहे. यातील पखरूडसारख्या अनेक गावांना मागील उन्हाळ्यामध्ये तीन ते चार टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागाला. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात तर टँकर भरण्यासाठीही पाणी उपलब्ध नव्हते. अशा गावच्या योजनाही केंद्र सरकारच्या स्थगिती आदेशाच्या कात्रित सापडल्या आहेत. दरम्यान, संबंधित गावांतील ग्रामस्थांकडून योजनेच्या अनुषंगाने सातत्याने पाणीपुरवठा विभागाचे उंबरठे झिजविले जात आहे. परंतु, केंद्र शासनाच्या स्थगिती आदेशाकडे बोट दाखविण्यापलिकडे प्रशासनाच्या हातातही काहीच उरलेले नाही. शासनाच्या उपरोक्त आदेशामुळे भूम तालुक्यातील ०५, कळंब तालुक्यातील ११, लोहारा तालुक्यातील ०३, उस्मानाबाद तालुक्यातील २६, परंडा तालुक्यातील ०३, तुळजापूर तालुक्यातील १२, उमरगा तालुक्यातील ११ आणि वाशी तालुक्यातील ०४ योजनांची कामे सुरू होवू शकली नाहीत. या सर्व ७५ योजनांसाठी सुमारे ३७ कोटी ३६ लाख रूपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान, योजनेवरील स्थगिती उठवून यासाठी तातडीने निधी देण्याची मागणी जोर धरत आहे.