शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

डाळींब, उसाला भीषण आग

By admin | Updated: May 28, 2014 00:21 IST

केज/कडा : जिल्ह्यात मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी डाळींब बाग तसेच उसाच्या फडाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

केज/कडा : जिल्ह्यात मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी डाळींब बाग तसेच उसाच्या फडाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगी मागचे कारण गुलदस्त्यात असून या हानीने शेतकर्‍यांचे संसार उघड्यावर आले आहेत. केज तालुक्यातील साळेगाव येथे खोराडीचे शेत या शिवारातील सर्व्हे नं. ५०८,५०९ मध्ये खय्यूम पठाण, नय्यूम पठाण, शब्बीर मियाँ सय्यद, अजीम पठाण या चार शेतकर्‍यांचा ऊस आहे. एकूण पाच एकर क्षेत्रावर असलेल्या या उसाच्या फडात ठिबक सिंचनही अंथरलेला होता. मंगळवारी दुपारी २ वाजता फडाने पेट घेतला. त्यानंतर आगीच्या ज्वाला बाहेर पडण्यास सुरूवात झाली. संपूर्ण फड आगीने कवेत घेतला. त्यामुळे उभा ऊस खाक झाला. मंडळ अधिकारी भागवत पवार, तलाठी सुभाष डोरले यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेमुळे या चारही शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक आगीने हिरावून घेतल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पंचनामा केला असून आगीचे कारण स्पष्ट होत नाही. याबाबत वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर नुकसान भरपाईच्या बाबतीत तेच ठरवतील असे, मंडळ अधिकारी भागवत पवार यांनी सांगितले. (वार्ताहर) दोन एकर डाळींब बाग खाक आष्टी तालुक्यातील तागडखेल येथील शेतकरी बलभीम रंभाजी गव्हाणे यांनी आपल्या शेतात दोन एकरवर डाळींब लागवड केली होती. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास डाळींबाच्या बागेतून धूर निघण्यास सुरूवात झाली. त्यानंतर परिसरातील शेतकर्‍यांनी त्यांना याची माहिती दिली. गव्हाणे यांनी तातडीने शेतात धाव घेतली तेव्हा संपूर्ण बाग जळत होती. त्यामुळे आग विझविण्याची संधीही त्यांना मिळाली नाही. त्यांच्या बागेजवळून विद्युत वाहिनी गेलेली आहे. त्यामुळे स्पार्र्कींग होऊन आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. डाळिंबाच्या झाडाला फळे लगडली होती. अवघ्या वीस दिवसावर तोडणी आली होती. अशा स्थितीत आगीने होत्याचे नव्हते केले. कर्ज काढून त्यांनी बाग जोपासली होती.