शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

डाळींब बागा झाल्या आडव्या

By admin | Updated: June 5, 2014 00:50 IST

कारला : जालना तालुक्यातील ईस्लामवाडी, पुणेगाव, तांदुळवाडी, वडगाव आदी परिसरात २ व ३ जून रोजी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला.

कारला : जालना तालुक्यातील ईस्लामवाडी, पुणेगाव, तांदुळवाडी, वडगाव आदी परिसरात २ व ३ जून रोजी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. या वादळामुळे डाळींब बागांचे मोठे नुकसान झाले. कधी गारपीट तर कधी अवकाळी पावसाने, वर्षभर बळीराजावर अस्मानी संकट कोसळत आहे. त्यांचा सामना करताना शेतकर्‍यांची मोठी दमछाक होत आहे. २ व ३ जून रोजी जालना तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी चक्रीवादळ आल्याने बागायतदार शेतकर्‍यांचे त्यात मोठे नुकसान झाले. इस्लामवाडी, पुणेगाव तांदुळवाडी, बोरखेडी, अहंकार देऊळगाव, कडवंची, भाटेपूरी, हिस्वन, कारला, ममदाबाद आदी गावाना त्याचा फटका बसला. डाळींब झाडांची पाने गळून पडली. काही ठिकाणी फांद्या तुटून पडल्या, झाडे उन्मळून पडून मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावे, शेतकर्‍यांना नुुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान दुसर्‍या दिवशी मंगळवारीही जालना तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रांजणीला पावसाने झोडपले रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणीत मंगळवारी सायंकाळी ५ वाजता झालेल्या वादळी वार्‍यासह पावसाने काही ठिकाणी पडझड झाली. अचानक आलेल्या या पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली. ग्रामस्थांचीही तारांबळ उडाली. वादळामळे मालमत्तांची पडझड झाली. जि. प. शाळेचे पत्रे उडाले, ती शेख गफ्फार शेख जमाल यांच्या घरावर पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले. विवेकानंद इंग्रजी शाळेतील खिडक्यांच्या काचा फुटल्या, फर्निचरचे मोठे नुकसान झाले. जोरदार वार्‍याने विजेचे दोन खांब कोसळले आहे. त्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला. ठिकठिकाणी विजेच्या तारा तुटल्या, खांब व झाडेही उन्मळून पडली. तारा पडल्याने विजेचा धक्का लागण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. तसेच गाव व परिसरातील अनेक फळबागधारक शेतकर्‍यांच्या शेतातील बागांचे मोठे नुकसान झाले. फेब्रुवारी-मार्च महिन्यातही या भागाला गारपिटीने झोडपले होते. या गारपिटीतही शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला होता. दरम्यान या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)जालना तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे नंदापूर, बोरखेडी, थार, धारकल्याण अहंकार देऊळगाव कडवंची, रामनगर, सेवली आदी भागातील डाळींब, मोसंबी, द्राक्ष आदी बागांसह शेडनेट व घरांवरील पत्रे उडाल्याने पडझड होवून मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रूपये प्रमाणे आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर दीपक डोके, राजेंद्र खरात, संतोष मोरे, कृष्णा जाधव अंकुश खरात, रमेश काळे आदींच्या सह्या आहेत. मागील तीन महिन्यापासून फळबाग धारक शेतकर्‍यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. गारपीट, अवकाळी पाऊस व आता चक्री वादळाने मोठे नुकसान झाले.गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीतून कसेबसे सावरून डाळींबाची काही झाडे जगविली. दोन महिन्यानंतर झाडावरील डाळींब विक्रीसाठी येणार होते. जिवापाड प्रेम करून व पैसा खर्च करून झाडे जगविली मात्र ती चक्रीवादळाने उद्ध्वस्त झाल्याने तोडचा घास हिरावून गेला असल्याचे डाळींब उत्पादक अरुणराव भिसे यांनी सांगितले.