शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यावरून रंगले राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:24 IST

औरंगाबाद: मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या औरंगाबादच्या जनतेला पाणी केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा असताना १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा ...

औरंगाबाद: मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या औरंगाबादच्या जनतेला पाणी केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा असताना १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण रंगले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्या दुपारी १ वाजता नव्या जलयोजनेचे उद्‌घाटन होणार आहे. याचवेळी भाजपने ही पाणीयोजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मंजूर केल्याचे सांगत याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाणीयोजना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजूर केली असून शहरासह सातारा- देवळाईच्या नागरिकांना पाणी देण्यात येणार असल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, भाजपकडून पाणीयोजनेला आमचा विरोध नाही, कारण ही योजनाच भाजपाने आणलेली आहे, असे सांगण्यात येत आहे. शहरासाठी २००८ साली मंजूर झालेल्या समांतर जलवाहिनी योजनेची अंमलबजावणी न होताच ती योजना बंद करण्यात आली. आता ही नवी जलयोजना समांतरच्या दिशेने जाईल, असा सूर भाजपने आळवला आहे. शिवसेनेने मात्र या योजनेची अंमलबजावणी धुमधडाक्यात करण्याचे ठरविले आहे. दोन्ही पक्षांकडून शहरात श्रेयवादाची लढाई असून पोस्टरबाजीही रंगली आहे.

हे राजकारण रंगण्यामागे आगामी महापालिका निवडणुकीचे गणित असून आम्हीच जनतेला पाणी दिल्याचे श्रेय घेण्याचा हा वाद दिसून येत आहे.