शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

मिरवणुकीतही राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:22 IST

श्री विसर्जन मिरवणुकीत राजकारण शिरल्यामुळे अनेक गणेश मंडळांनी महासंघाला लक्ष्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : श्री विसर्जन मिरवणुकीत राजकारण शिरल्यामुळे अनेक गणेश मंडळांनी महासंघाला लक्ष्य केले. तासन्तास मिरवणुकीतील वाहने खोळंबल्यामुळे महिनाभर वेगवेगळ्या कवायतींसाठी केलेल्या मेहनतीचे चीज झाले नाही. हा भेदभाव झाल्यामुळे अनेक मंडळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. राजकीय नेत्यांनी आपापल्या मर्जीतील गणेश मंडळांना कवायती सादरीकरणासाठी जास्तीचा वेळ दिल्याचा आरोप बहुतांश मंडळांनी केला.सोयीनुसार मिरवणुकीचे मार्ग करण्यात आल्यामुळे बेशिस्त परिस्थिती निर्माण झाली. मिरवणुकीचे दोन मार्ग कुणामुळे झाले, यामागे कोण होते. यावरून खोळंबलेल्या गणेश मंडळांनी महासंघाकडे गाºहाणे केले. पुढे जाण्यावर काही मंडळांमध्ये किरकोळ वादही झाले. बालाजीनगर, गवळीपुरा, नवाबपुरा, लोधी मोहल्ला, शिवशंकर कॉलनी, भवानीनगर या भागातील मंडळांची वाहने सहा ते सात तास एकाच ठिकाणी उभी होती.कुणाचाही कुठे ताळमेळ नव्हता. महासंघातील सर्व पदाधिकारी राजकीय पक्षांशी निगडित असल्यामुळे ते पक्षाच्या व्यासपीठावर होते. त्यामुळे सिटीचौकातून मिरवणूक पुढे जाण्यास खूप उशीर झाला.यापुढे मुख्य मिरवणुकीत सहभागी व्हायचे की नाही. याबाबत विचार करावा लागेल. दुपारी २ वाजेपासून मिरवणुकीत वाहने आणली आहेत. लहान मुलांचा संच त्यामध्ये आहे. रात्री ९ वाजेपर्यंत एकाच ठिकाणी वाहने उभी आहेत. एकेक करून वाहने सोडण्याऐवजी एकाच भागातील वाहने पुढे गेल्यामुळे नियोजन कोलमडले. हे कुणामुळे झाले हे माहिती नाही; परंतु महिनाभर कवायतींसाठी परिश्रम घेतलेल्या युवकांना जर सादरीकरण न करताच जाण्याची वेळ आल्याने त्यांचा हिरमोड झाला. अनेक मंडळांना सादरीकरण करण्याची संधी मिळाली नाही. असे मत माजी महापौर तथा छत्रपती क्रीडा मंडळाचे संस्थापक त्र्यंबक तुपे यांनी व्यक्त केले. गवळीपुºयातील जनसेवा क्रीडा मंडळाच्या पदाधिकाºयांनी देखील अशीच भावना व्यक्त केली.