शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

बरखास्तीवरुन राजकारण तापले

By admin | Updated: April 23, 2016 23:57 IST

उदगीर : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीवरुन उदगीरात चांगलेच राजकारण तापले आहे़ बाजार समिती ताब्यात ठेवून असणाऱ्या

उदगीर : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीवरुन उदगीरात चांगलेच राजकारण तापले आहे़ बाजार समिती ताब्यात ठेवून असणाऱ्या माजी आ़चंद्रशेखर भोसले यांनी ही बरखास्ती म्हणजे राजकीय सूडबुद्धी असून, विद्यमान आमदारांनी आता कोणत्याही कुबड्या न घेता थेट निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले़ तर आमदार सुधाकर भालेराव यांनी ही तर सुरुवात आहे, असा सूचक इशारा दिला़बाजार समितीत एक रुपयाचाही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा भोसले यांनी केला़ बरखास्तीच्या आदेशात कोठेही भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख नाही़ आपण पारदर्शकच कारभार केला़ मात्र, केवळ अनियमतता व योजनांना मंजुरी न घेतल्याच्या मुद्यावरुन बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला आहे़ बालिका बचाव योजना, शेतकरी विमा योजना, आरोग्य योजना या शेतकऱ्यांच्या हिताच्याच होत्या़ परंतु, केवळ राजकीय सूडबुद्धीने नियमावर बोट ठेवत बरखास्तीची कारवाई करण्यात आली आहे़ याविरोधात आम्ही आधीच न्यायालयात गेलो आहोत़ ३ महिने प्रतिष्ठा पणाला लावून सत्तेचा दुरुपयोग करण्यात आल्याचा आरोप करीत एवढाच वेळ आमदारांनी उदगीरच्या पाणीप्रश्नाला देणे गरजेचे होते, असे मतही चंद्रशेखर भोसले यांनी व्यक्त केले़ दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीचे घोडामैदान दूर नाही़ त्यात आमदारांनी स्वबळावर उतरुन दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले़ आमदार सुधाकर भालेराव यांनी सांगितले की, बाजार समितीच्या भ्रष्टाचाराबाबत बोलायचे झाल्यास वेडा कधी स्वत:ला वेडा म्हणवून घेत नाही, अशी ‘त्यांची’ अवस्था आहे़ गैरकारभार झाल्याशिवायच का बरखास्ती झाली आहे? लढण्याचे म्हणाल तर शेतकऱ्यांची फसवणूक व भ्रष्टाचार याविरुद्ध आपण कायमच लढत आहोत़ ही लढाई पुढेही लढणार आहोतच़ भ्रष्टाचार मुळासकट उपसून टाकून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे़ शेतकऱ्यांच्या हिताच्या नावाखाली सुरु केलेल्या योजनांतून लूट झाल्याचा आरोप करीत तेही लवकरच बाहेर येईल, असे भालेराव म्हणाले़(वार्ताहर)