शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

साताऱ्यात शीतयुद्धाचा राजकीय धुराळा

By admin | Updated: April 15, 2016 01:47 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई या दोन्ही वॉर्डांतील प्रचार संपण्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे सर्व राजकीय पक्ष राजकीय शीतयुद्धाचा धुराळा उडवीत आहेत.

औरंगाबाद : सातारा-देवळाई या दोन्ही वॉर्डांतील प्रचार संपण्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे सर्व राजकीय पक्ष राजकीय शीतयुद्धाचा धुराळा उडवीत आहेत. दोन्ही वॉर्डांत प्रमुख पक्षांचे ७ उमेदवार असून, साताऱ्यामध्ये ३ आणि देवळाईत ४ उमेदवार आहेत. सर्वांचे जाहीरनामे प्रकाशित झाले असून, ते मतदारांच्या हाती पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची त्या दोन्ही वॉर्डांत रणधुमाळी सुरू आहे. शहरातील सर्व पदाधिकारी, संलग्न संघटनांचे कार्यकर्ते त्या दोन वॉर्डांत ठाण मांडून आहेत. तासातासाला वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते मतदारांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन करीत असल्यामुळे वॉर्डांतील गर्दी काही हटेना. हायटेक प्रचाराने तर दोन्ही वॉर्डांत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर गल्ली, सोसायटी, अपार्टमेंटनिहाय ग्रुप करण्यात आले असून, प्रत्येक उमेदवाराच्या बाजूने आणि विरोधात प्रचार सुरू आहे. शिवसेनेकडून भाजप विरोधात, काँग्रेसकडून युती विरोधात, तर राष्ट्रवादीकडून तिन्ही पक्षांच्या विरोधात प्रचार केला जातो आहे. जातीनिहाय मतदारांच्या वसाहतींमध्ये विशेष पथके गठीत करून ते पाठविण्यात येत आहेत. त्यामध्ये पक्षाच्या विद्यमान नगरसेवकाचा समावेश आहे. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जेवढी जोरदार रणधुमाळी झाली नाही, त्याच्या दुप्पट सातारा-देवळाई या दोन्ही वॉर्डात प्रचाराची धूम सुरू आहे. शिवसेनेकडून पालकमंत्री रामदास कदम, भाजपकडून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, काँग्रेसकडून आ. सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेव पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. सेनेच्या दोन, काँग्रेसच्या दोन, राष्ट्रवादीची एक, भाजपच्या दोन सभा दोन्ही वॉर्डात झाल्या आहेत. देवळाईमध्ये चौरंगी लढत होत आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी तेथे लढत आहे. तर साताऱ्यात शिवसेना, भाजप आणि काँग्रेस, अशी लढत आहे. देवळाईत तीन अपक्ष उमेदवारही आहेत. दोन्ही वॉर्डांची लोकसंख्या १ लाखांच्या आसपास आहे. परंतु २०११ च्या जनगणनेनुसार दोन्ही वॉर्डांत ३० हजार मतदार आहेत. ४कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला मतदारांपर्यंत अजूनही ९पोहोचता आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भरवशावरच मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन सुरू आहे. मेहनतीने जे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचतील आणि मतदारांना मतदानाच्या दिवशी बाहेर काढतील, यश त्यांचेच असेल.