शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
5
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
6
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
7
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
8
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
9
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
10
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
11
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
12
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
13
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
14
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
15
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
16
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
17
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
18
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
19
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
20
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!

साताऱ्यात शीतयुद्धाचा राजकीय धुराळा

By admin | Updated: April 15, 2016 01:47 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई या दोन्ही वॉर्डांतील प्रचार संपण्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे सर्व राजकीय पक्ष राजकीय शीतयुद्धाचा धुराळा उडवीत आहेत.

औरंगाबाद : सातारा-देवळाई या दोन्ही वॉर्डांतील प्रचार संपण्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे सर्व राजकीय पक्ष राजकीय शीतयुद्धाचा धुराळा उडवीत आहेत. दोन्ही वॉर्डांत प्रमुख पक्षांचे ७ उमेदवार असून, साताऱ्यामध्ये ३ आणि देवळाईत ४ उमेदवार आहेत. सर्वांचे जाहीरनामे प्रकाशित झाले असून, ते मतदारांच्या हाती पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची त्या दोन्ही वॉर्डांत रणधुमाळी सुरू आहे. शहरातील सर्व पदाधिकारी, संलग्न संघटनांचे कार्यकर्ते त्या दोन वॉर्डांत ठाण मांडून आहेत. तासातासाला वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते मतदारांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन करीत असल्यामुळे वॉर्डांतील गर्दी काही हटेना. हायटेक प्रचाराने तर दोन्ही वॉर्डांत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर गल्ली, सोसायटी, अपार्टमेंटनिहाय ग्रुप करण्यात आले असून, प्रत्येक उमेदवाराच्या बाजूने आणि विरोधात प्रचार सुरू आहे. शिवसेनेकडून भाजप विरोधात, काँग्रेसकडून युती विरोधात, तर राष्ट्रवादीकडून तिन्ही पक्षांच्या विरोधात प्रचार केला जातो आहे. जातीनिहाय मतदारांच्या वसाहतींमध्ये विशेष पथके गठीत करून ते पाठविण्यात येत आहेत. त्यामध्ये पक्षाच्या विद्यमान नगरसेवकाचा समावेश आहे. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जेवढी जोरदार रणधुमाळी झाली नाही, त्याच्या दुप्पट सातारा-देवळाई या दोन्ही वॉर्डात प्रचाराची धूम सुरू आहे. शिवसेनेकडून पालकमंत्री रामदास कदम, भाजपकडून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, काँग्रेसकडून आ. सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेव पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. सेनेच्या दोन, काँग्रेसच्या दोन, राष्ट्रवादीची एक, भाजपच्या दोन सभा दोन्ही वॉर्डात झाल्या आहेत. देवळाईमध्ये चौरंगी लढत होत आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी तेथे लढत आहे. तर साताऱ्यात शिवसेना, भाजप आणि काँग्रेस, अशी लढत आहे. देवळाईत तीन अपक्ष उमेदवारही आहेत. दोन्ही वॉर्डांची लोकसंख्या १ लाखांच्या आसपास आहे. परंतु २०११ च्या जनगणनेनुसार दोन्ही वॉर्डांत ३० हजार मतदार आहेत. ४कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला मतदारांपर्यंत अजूनही ९पोहोचता आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भरवशावरच मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन सुरू आहे. मेहनतीने जे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचतील आणि मतदारांना मतदानाच्या दिवशी बाहेर काढतील, यश त्यांचेच असेल.