शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे राजकीय जुगाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:33 IST

विकास राऊत औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा राजकीय धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. ८६५ पैकी ६१८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ...

विकास राऊत

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा राजकीय धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. ८६५ पैकी ६१८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान आणि १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यातील राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडी राजकीय जुगाड करण्याच्या तयारीत आहे. खुलेआम नाही, मात्र अंतर्गत समीकरण, कार्यकर्त्यांची भावना आणि भाजपला रोखण्यासाठी या निवडणुकीत फॉर्म्युला ठरविण्यात येणार आहे.

महाविकास आघाडी करण्याबाबत सार्वजनिक पातळीवर तशी काही चर्चा नाही; परंतु आघाडी झाली तर जास्तीच्या ग्रामपंचायती ताब्यात येतील. आघाडी नाही झाली तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील. बऱ्याचदा ग्रामपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर जुगाड करूनच लढल्या जातात. त्याला राजकीय स्वरूप येत नसते. तरी सुद्धा भाजपला रोखण्यासाठी जिल्ह्यात अंतर्गत राजकीय समीकरणांचा विचार सुरू आहे. काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे भांडण आहे, कुठे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद आहे, तर कुठे काँग्रेस आणि शिवसेनेचे जमते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेससोबत नाही. वैयक्तिक संबंधांवरच या निवडणुका असल्या तरी महाविकास आघाडी स्थानिक पातळीवरील राजकीय ताकदीचा विचार करून सपोर्ट करणार असल्याची चर्चा आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींचा आकडा

औरंगाबाद ११४

पैठण १०८

फुलंब्री ७१

वैजापूर १३५

गंगापूर १११

कन्नड १३८

खुलताबाद ३९

सिल्लोड १०२

सोयगाव ४६

--------------------

मतदान १५ जानेवारी

मतमोजणी १८ जानेवारी

कार्यकर्त्यांची भावना आघाडी करण्याची

कार्यकर्त्यांची भावना महाविकास आघाडी करण्याची आहे. भाजपला दूर ठेवण्याबाबत ते विचार करीत आहेत. वरिष्ठ पातळीवरून तशा काही सूचना नाहीत. ही निवडणूक राजकीय पक्ष चिन्हावर नसते. पक्षाच्या ताकदीवरच पॅनल तयार करून निवडणुका लढल्या जातात. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, ते समजून निर्णय घेणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी सांगितले.

गावातील राजकीय स्थितीनुसार निर्णय

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्याबाबत काही निर्णय नाही. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर काही होईल, असे वाटत नाही. गावातील राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जाणे सध्या तरी शक्य नाही. गावातील राजकीय परिस्थितीनुसार तेथे निर्णय घेतले जातील, असे शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला ठरला नाही

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अद्याप महाविकास आघाडीचा कोणताही फॉर्म्यूला ठरलेला नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. त्यानुसार आघाडी करून पॅनल तयार करणे आवाक्याबाहेर असल्यामुळे महाविकास आघाडी करून निवडणूक लढण्याबाबत बुधवारी मुंबईत विश्लेषणात्मक बैठक झाली. यावर एक-दोन दिवसांत निर्णय होईल, असे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले.

स्थानिक संस्थांवर भाजपचा दबदबा

जिल्ह्यात वैजापूर, सोयगाव, गंगापूर, पैठण या नगर परिषदा भाजपच्या ताब्यात आहेत. कन्नड न.प. राष्ट्रवादीकडे आहे. खुलताबाद काँग्रेसकडे आहे. सिल्लोड न.प. शिवसेनेच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे. ९ पैकी पाच पंचायत समित्यांमध्ये शिवसेना वरचढ आहे.