शहरं
Join us  
Trending Stories
1
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
2
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
3
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
4
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
5
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
6
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
7
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
8
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
9
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
10
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
11
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
12
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
13
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
14
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
15
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
16
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
17
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
18
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
19
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
20
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचे राजकीय आरक्षण: स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:05 IST

औरंगाबाद : ओबीसींचा इम्पिरिकल डाटा सादर न करू शकल्याने ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के आरक्षणावर गदा आल्यानंतर सध्या ...

औरंगाबाद : ओबीसींचा इम्पिरिकल डाटा सादर न करू शकल्याने ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के आरक्षणावर गदा आल्यानंतर सध्या महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. यासंदर्भात सरकारने स्वतंत्र आयोगाची स्थापना करायला हवी, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचाही असाच आदेश असल्याचा अर्थ या अभ्यासकांनी काढला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने अलीकडेच स्थापन केलेला मागासवर्ग आयोग नियमित आहे. ओबीसी प्रवर्गात कोणत्या जाती समाविष्ट करायच्या वा वगळायच्या, हा अधिकार या आयोगाला राहील.

कष्टकरी व महिला वर्गाचे प्रतिनिधी राजसत्तेत असल्याशिवाय लोकशाही राज्यव्यवस्था भक्कम होणार नाही, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी सांगत असत. या सूत्रावर आधारलेली राज्यघटनेची ७३ व ७४ वी घटनादुरुस्ती झाली. आज महाराष्ट्रात असलेल्या २७ महापालिका, ३४ जिल्हा परिषदा, ३६४ पंचायत समित्या, नगरपालिका आणि २८ हजार ग्रामपंचायतींमधून ५६ हजार ओबीसी निवडून येतात.

ओबीसींची खानेसुमारी, मागासलेपण व प्रतिनिधित्व यांची माहिती न्यायालयाने जमा करायला सांगूनही ती तत्परता सरकारे दाखवायला तयार नाहीत. त्यातून ओबीसींचे हे नुकसान होत आहे.

माजी आमदार व संविधानाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आरोप केला की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सध्या केवळ राजकारण सुरू झाले आहे. यातून ओबीसींचे कुठलेही प्रश्न सुटताना दिसत नाही. स्वतंत्र आयोगाची स्थापना करून ओबीसींचा इम्पिरिकल डाटा सादर करण्याची गरज आहे. यासंदर्भात मी सरकारशी सतत पत्रव्यवहार करीत आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका घेण्यात येऊ नये, या मताचा मी कालही होतो, आजही आहे आणि उद्याही राहीन; परंतु निवडणूक आयोग याला तयार दिसत नाही. यात ओबीसींचे नुकसान होणार, हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही.

राज्य सरकारने पुढाकार घ्यावा

राज्य सरकारने ओबीसींच्या इम्पिरिकल डाटा जमा करण्याचा मुद्दा लक्षात घेऊन स्वतंत्र आयोगाची स्थापना करायला हवी; परंतु ते होताना दिसत नाही, याबद्दल ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी खंत व्यक्त केली आहे.