शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

ओबीसींचे राजकीय आरक्षण: स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:05 IST

औरंगाबाद : ओबीसींचा इम्पिरिकल डाटा सादर न करू शकल्याने ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के आरक्षणावर गदा आल्यानंतर सध्या ...

औरंगाबाद : ओबीसींचा इम्पिरिकल डाटा सादर न करू शकल्याने ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के आरक्षणावर गदा आल्यानंतर सध्या महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. यासंदर्भात सरकारने स्वतंत्र आयोगाची स्थापना करायला हवी, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचाही असाच आदेश असल्याचा अर्थ या अभ्यासकांनी काढला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने अलीकडेच स्थापन केलेला मागासवर्ग आयोग नियमित आहे. ओबीसी प्रवर्गात कोणत्या जाती समाविष्ट करायच्या वा वगळायच्या, हा अधिकार या आयोगाला राहील.

कष्टकरी व महिला वर्गाचे प्रतिनिधी राजसत्तेत असल्याशिवाय लोकशाही राज्यव्यवस्था भक्कम होणार नाही, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी सांगत असत. या सूत्रावर आधारलेली राज्यघटनेची ७३ व ७४ वी घटनादुरुस्ती झाली. आज महाराष्ट्रात असलेल्या २७ महापालिका, ३४ जिल्हा परिषदा, ३६४ पंचायत समित्या, नगरपालिका आणि २८ हजार ग्रामपंचायतींमधून ५६ हजार ओबीसी निवडून येतात.

ओबीसींची खानेसुमारी, मागासलेपण व प्रतिनिधित्व यांची माहिती न्यायालयाने जमा करायला सांगूनही ती तत्परता सरकारे दाखवायला तयार नाहीत. त्यातून ओबीसींचे हे नुकसान होत आहे.

माजी आमदार व संविधानाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आरोप केला की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सध्या केवळ राजकारण सुरू झाले आहे. यातून ओबीसींचे कुठलेही प्रश्न सुटताना दिसत नाही. स्वतंत्र आयोगाची स्थापना करून ओबीसींचा इम्पिरिकल डाटा सादर करण्याची गरज आहे. यासंदर्भात मी सरकारशी सतत पत्रव्यवहार करीत आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका घेण्यात येऊ नये, या मताचा मी कालही होतो, आजही आहे आणि उद्याही राहीन; परंतु निवडणूक आयोग याला तयार दिसत नाही. यात ओबीसींचे नुकसान होणार, हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही.

राज्य सरकारने पुढाकार घ्यावा

राज्य सरकारने ओबीसींच्या इम्पिरिकल डाटा जमा करण्याचा मुद्दा लक्षात घेऊन स्वतंत्र आयोगाची स्थापना करायला हवी; परंतु ते होताना दिसत नाही, याबद्दल ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी खंत व्यक्त केली आहे.