शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

राजकारण्यांमुळे नामांतर लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:32 IST

मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव १९७८ मध्ये विधिमंडळाने मंजूर केला होता. मात्र, राजकारण्यांमुळे हा नामविस्तार तब्बल १६ वर्षे लांबला असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी केला.

ठळक मुद्देमंगल खिंवसरा : विद्यापीठात नामविस्तार दिनानिमित्त विशेष व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव १९७८ मध्ये विधिमंडळाने मंजूर केला होता. मात्र, राजकारण्यांमुळे हा नामविस्तार तब्बल १६ वर्षे लांबला असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २४ व्या नामविस्तार दिनानिमित्त मंगल खिंवसरा यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. ‘नामांतर लढा ते नामविस्तार दिन’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. नामांतर लढ्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा आढावा त्यांनी घेतला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे होते. मंचावर विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके, विद्यार्थी विकास संचालक डॉ. नंदकुमार राठी आणि डॉ. संजय मून उपस्थित होते. मंगल खिंवसरा म्हणाल्या की, नामांतर लढा हा सामाजिक अभिसरणाचा भाग म्हणून लढला गेला. या लढ्यामध्ये सर्वच मागासवर्गीयांबरोबर सवर्ण समाजाचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. महिलांनीही या लढ्यात अग्रभागी राहून भूमिका निभावली असल्याचेही खिंवसरा यांनी सांगितले. आज आपण सर्व जण सुस्थितीत पोहोचलो आहोत. सर्वांकडे कायमस्वरूपी घर, गाड्या, पैसा आला आहे. हे सर्व बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळे आणि घटनेनुसार मिळालेल्या अधिकारामुळे घडले आहे. मात्र, असे असतानाही आज लाखो आदिवासी, भटके अशा असंख्य लोकांपर्यंत स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही प्रकाश पोहोचलेला नाही. हा प्रकश पोहोचविण्यासाठी, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मंगल खिंवसरा यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय मून यांनी केले.वर्षभरात ५२ खंडांचे प्रकाशन : कुलगुरूविद्यापीठाचा नामविस्तार रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षात विद्यापीठातील ५१ विभागांचे स्वतंत्र ५२ खंड प्रकाशित करण्याची घोषणा कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात केली. या खंडांमध्ये विद्यापीठाच्या २५ वर्षांचा आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल. तसेच नामांतर लढ्यात सहभागी महिलांवरही एक ग्रंथ प्रकाशित केला जाईल, असेही डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले.