शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

राजकारण्यांमुळे नामांतर लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:32 IST

मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव १९७८ मध्ये विधिमंडळाने मंजूर केला होता. मात्र, राजकारण्यांमुळे हा नामविस्तार तब्बल १६ वर्षे लांबला असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी केला.

ठळक मुद्देमंगल खिंवसरा : विद्यापीठात नामविस्तार दिनानिमित्त विशेष व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव १९७८ मध्ये विधिमंडळाने मंजूर केला होता. मात्र, राजकारण्यांमुळे हा नामविस्तार तब्बल १६ वर्षे लांबला असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २४ व्या नामविस्तार दिनानिमित्त मंगल खिंवसरा यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. ‘नामांतर लढा ते नामविस्तार दिन’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. नामांतर लढ्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा आढावा त्यांनी घेतला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे होते. मंचावर विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके, विद्यार्थी विकास संचालक डॉ. नंदकुमार राठी आणि डॉ. संजय मून उपस्थित होते. मंगल खिंवसरा म्हणाल्या की, नामांतर लढा हा सामाजिक अभिसरणाचा भाग म्हणून लढला गेला. या लढ्यामध्ये सर्वच मागासवर्गीयांबरोबर सवर्ण समाजाचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. महिलांनीही या लढ्यात अग्रभागी राहून भूमिका निभावली असल्याचेही खिंवसरा यांनी सांगितले. आज आपण सर्व जण सुस्थितीत पोहोचलो आहोत. सर्वांकडे कायमस्वरूपी घर, गाड्या, पैसा आला आहे. हे सर्व बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळे आणि घटनेनुसार मिळालेल्या अधिकारामुळे घडले आहे. मात्र, असे असतानाही आज लाखो आदिवासी, भटके अशा असंख्य लोकांपर्यंत स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही प्रकाश पोहोचलेला नाही. हा प्रकश पोहोचविण्यासाठी, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मंगल खिंवसरा यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय मून यांनी केले.वर्षभरात ५२ खंडांचे प्रकाशन : कुलगुरूविद्यापीठाचा नामविस्तार रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षात विद्यापीठातील ५१ विभागांचे स्वतंत्र ५२ खंड प्रकाशित करण्याची घोषणा कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात केली. या खंडांमध्ये विद्यापीठाच्या २५ वर्षांचा आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल. तसेच नामांतर लढ्यात सहभागी महिलांवरही एक ग्रंथ प्रकाशित केला जाईल, असेही डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले.