शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांमुळे नामांतर लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:32 IST

मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव १९७८ मध्ये विधिमंडळाने मंजूर केला होता. मात्र, राजकारण्यांमुळे हा नामविस्तार तब्बल १६ वर्षे लांबला असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी केला.

ठळक मुद्देमंगल खिंवसरा : विद्यापीठात नामविस्तार दिनानिमित्त विशेष व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव १९७८ मध्ये विधिमंडळाने मंजूर केला होता. मात्र, राजकारण्यांमुळे हा नामविस्तार तब्बल १६ वर्षे लांबला असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २४ व्या नामविस्तार दिनानिमित्त मंगल खिंवसरा यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. ‘नामांतर लढा ते नामविस्तार दिन’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. नामांतर लढ्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा आढावा त्यांनी घेतला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे होते. मंचावर विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके, विद्यार्थी विकास संचालक डॉ. नंदकुमार राठी आणि डॉ. संजय मून उपस्थित होते. मंगल खिंवसरा म्हणाल्या की, नामांतर लढा हा सामाजिक अभिसरणाचा भाग म्हणून लढला गेला. या लढ्यामध्ये सर्वच मागासवर्गीयांबरोबर सवर्ण समाजाचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. महिलांनीही या लढ्यात अग्रभागी राहून भूमिका निभावली असल्याचेही खिंवसरा यांनी सांगितले. आज आपण सर्व जण सुस्थितीत पोहोचलो आहोत. सर्वांकडे कायमस्वरूपी घर, गाड्या, पैसा आला आहे. हे सर्व बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळे आणि घटनेनुसार मिळालेल्या अधिकारामुळे घडले आहे. मात्र, असे असतानाही आज लाखो आदिवासी, भटके अशा असंख्य लोकांपर्यंत स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही प्रकाश पोहोचलेला नाही. हा प्रकश पोहोचविण्यासाठी, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मंगल खिंवसरा यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय मून यांनी केले.वर्षभरात ५२ खंडांचे प्रकाशन : कुलगुरूविद्यापीठाचा नामविस्तार रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षात विद्यापीठातील ५१ विभागांचे स्वतंत्र ५२ खंड प्रकाशित करण्याची घोषणा कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात केली. या खंडांमध्ये विद्यापीठाच्या २५ वर्षांचा आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल. तसेच नामांतर लढ्यात सहभागी महिलांवरही एक ग्रंथ प्रकाशित केला जाईल, असेही डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले.