शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

रसवंत्यांच्या परवान्यासाठी राजकीय दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 18:29 IST

रसवंत्यांना मनपाकडून देण्यात येणाऱ्या परवान्यांसाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव टाकण्यात येत आहे. जालना रोड, सिडको-हडकोतील ठराविक चौकांसाठी असंख्य अर्ज आले आहेत.

औरंगाबाद : मकरसंक्रांत संपल्यावर थंडी हळूहळू कमी होत जाते. थंडी अजून पूर्णपणे गेलेली नसतानाही शहरातील रसवंती चालकांनी महापालिकेतील राजकीय वातावरणात गरमी आणली आहे. रसवंत्यांना मनपाकडून देण्यात येणाऱ्या परवान्यांसाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव टाकण्यात येत आहे. जालना रोड, सिडको-हडकोतील ठराविक चौकांसाठी असंख्य अर्ज आले आहेत. बोली लावून मनपाने परवाने द्यावेत, जेणेकरून महापालिकेच्या महसुलात वाढ होईल, असे पत्रच नगरसेविका राखी प्रशांत देसरडा यांनी प्रशासनाला दिले.

उन्हाळा सुरू होताच शहरातील प्रत्येक चौकात एक तरी रसवंती लावण्यात येते. काही ठिकाणी रसवंत्यांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. फुटपाथवर, ग्रीन बेल्टच्या जागेवर दरवर्षी राजरोसपणे रसवंत्या सुरू करण्यात येतात. आश्चर्याची बाब म्हणजे महावितरण त्यांना तात्पुरते विजेचे मीटरही देते. महापालिकेच्या नाकावर टिच्चून अनेक वर्षांपासून बेकायदा रसवंत्या थाटणाºयांची संख्याही बरीच आहे. गतवर्षी महापालिकेकडून तात्पुरती परवानगी घेणाºयांची व वीज कंपनीकडून रसवंतीसाठी वीज घेणाºयांच्या संख्येत मोठी तफावत असल्याचे समोर आले होते. यंदा फेब्रुवारीतच महापालिकेच्या मालमत्ता विभागात शेकडो अर्ज आले आहेत. कॅ नॉट मार्केट, जळगाव रोड, सिडको बसस्थानक, एन-६ आदी परिसरात सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हे अर्ज मंजूर करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांसह लोकप्रतिनिधींचे फोन महापालिकेत खणखणत आहेत.

मागील वर्षी पुणे येथील अनेक व्यापाºयांनी शहरात शिरकाव केला होता. स्थानिकांनी घेतलेल्या परवान्यावरच त्यांनी रसवंती सुरू केली होती. यासंदर्भात नगरसेविका राखी देसरडा यांनी मालमत्ता अधिकाºयांना पत्र दिले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, रसवंत्यांना देण्यात येणारी तात्पुरती परवानगी बोली पद्धतीने द्यावी. यामुळे महापालिकेला एका रसवंतीमागे एक लाख रुपयेही मिळू शकतात.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद