शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

राजकीय ध्रुवीकरण

By admin | Updated: June 24, 2017 23:39 IST

बीड : राजकारणातील भाऊबंदकी म्हणजे काय असते, हे बीड जिल्ह्याला नव्याने सांगण्याची आवश्यकता वाटत नाही

सतीश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राजकारणातील भाऊबंदकी म्हणजे काय असते, हे बीड जिल्ह्याला नव्याने सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जिल्हा उघड्या डोळ्याने बघत आहे. मुंडे, पंडित आणि क्षीरसागर घराण्यातील वाद पुन्हा पुन्हा उगाळण्यापेक्षा या वादाचे दुष्परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर, विकासप्रश्नावर, समाजमनावर कसे होत आहेत, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. या भाऊबंदकीला सत्तेच्या महत्त्वाकांक्षेची किनार आहे. माझ्यापेक्षा दुसरा कुणी मोठा होऊच नये, अशी वृत्ती आहे. स्वत:पेक्षा दुसऱ्याच्या पानात आधी वाढण्याचे संस्कार काळाच्या ओघात विसरत चाललो की काय? असे हे सर्व पाहून वाटू लागले आहे. त्यामुळेच ही भाऊबंदकी, सत्तास्पर्धा इतक्या टोकाला जात आहे की, रक्ताच्या नात्याऐवजी कट्टर विरोधकही जवळचा वाटू लागला आहे. एकमेकावर राजकीय चिखलफेक करणारे आता एकमेकाच्या गळ्यात गळा घालताना दिसत आहेत. बीड पं.स. सभापतीपदासाठी शिवसंग्रामला मदत करून पुतण्या संदीपला सत्तेपासून क्षीरसागर बंधूनी रोखले होते. या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले आ. विनायक मेटे हे यापूर्वीचे सर्वकाही विसरून बीड पालिकेत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागरांच्या मदतीला धावून गेले. तसे बघितले तर पालिकेतील वाद हा पालिकेच्या सभागृहातच मिटावयास पाहिजे. परंतु, विकासाच्या गोंडस नावाखाली नगराध्यक्ष क्षीरसागर आणि आ. मेटे मांडीला मांडी लावून पूर्वीचे मतभेद विसरून बसले. घरातील वाद जेव्हा विकोपाला जातो, तेव्हा बाहेरचे जवळचे वाटायला लागतात. राजकीय हेतू काही का असेना?, परंतु या बैठकीत पालिकेतील वाद मिटले असते तर निश्चितच शहराचे भले झाले असते आणि त्याचे श्रेय आ. मेटे यांनाच मिळाले असते. परंतु, या बैठकीत जुटण्याऐवजी अधिक बिघडले. उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागरांचे समर्थक सभापती अमर नाईकवाडे आणि नगराध्यक्ष क्षीरसागर यांच्यात स्वच्छतेवरुन तू तू-मै मै पहावयास मिळाली. बैठक सोडून नाईकवाडे निघून गेले.पालिकेतील वाद मिटण्यापेक्षा राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या क्षीरसागर बंधू आणि आ. मेटे यांच्यातील जवळीक वाढत असल्याचा उघडउघड संदेश जिल्ह्यास देण्यात आला. यानिमित्ताने जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरणे होऊ घातली आहेत. त्याची ही सुरूवात आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.