शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

राजकीय ध्रुवीकरण

By admin | Updated: June 24, 2017 23:39 IST

बीड : राजकारणातील भाऊबंदकी म्हणजे काय असते, हे बीड जिल्ह्याला नव्याने सांगण्याची आवश्यकता वाटत नाही

सतीश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राजकारणातील भाऊबंदकी म्हणजे काय असते, हे बीड जिल्ह्याला नव्याने सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जिल्हा उघड्या डोळ्याने बघत आहे. मुंडे, पंडित आणि क्षीरसागर घराण्यातील वाद पुन्हा पुन्हा उगाळण्यापेक्षा या वादाचे दुष्परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर, विकासप्रश्नावर, समाजमनावर कसे होत आहेत, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. या भाऊबंदकीला सत्तेच्या महत्त्वाकांक्षेची किनार आहे. माझ्यापेक्षा दुसरा कुणी मोठा होऊच नये, अशी वृत्ती आहे. स्वत:पेक्षा दुसऱ्याच्या पानात आधी वाढण्याचे संस्कार काळाच्या ओघात विसरत चाललो की काय? असे हे सर्व पाहून वाटू लागले आहे. त्यामुळेच ही भाऊबंदकी, सत्तास्पर्धा इतक्या टोकाला जात आहे की, रक्ताच्या नात्याऐवजी कट्टर विरोधकही जवळचा वाटू लागला आहे. एकमेकावर राजकीय चिखलफेक करणारे आता एकमेकाच्या गळ्यात गळा घालताना दिसत आहेत. बीड पं.स. सभापतीपदासाठी शिवसंग्रामला मदत करून पुतण्या संदीपला सत्तेपासून क्षीरसागर बंधूनी रोखले होते. या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले आ. विनायक मेटे हे यापूर्वीचे सर्वकाही विसरून बीड पालिकेत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागरांच्या मदतीला धावून गेले. तसे बघितले तर पालिकेतील वाद हा पालिकेच्या सभागृहातच मिटावयास पाहिजे. परंतु, विकासाच्या गोंडस नावाखाली नगराध्यक्ष क्षीरसागर आणि आ. मेटे मांडीला मांडी लावून पूर्वीचे मतभेद विसरून बसले. घरातील वाद जेव्हा विकोपाला जातो, तेव्हा बाहेरचे जवळचे वाटायला लागतात. राजकीय हेतू काही का असेना?, परंतु या बैठकीत पालिकेतील वाद मिटले असते तर निश्चितच शहराचे भले झाले असते आणि त्याचे श्रेय आ. मेटे यांनाच मिळाले असते. परंतु, या बैठकीत जुटण्याऐवजी अधिक बिघडले. उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागरांचे समर्थक सभापती अमर नाईकवाडे आणि नगराध्यक्ष क्षीरसागर यांच्यात स्वच्छतेवरुन तू तू-मै मै पहावयास मिळाली. बैठक सोडून नाईकवाडे निघून गेले.पालिकेतील वाद मिटण्यापेक्षा राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या क्षीरसागर बंधू आणि आ. मेटे यांच्यातील जवळीक वाढत असल्याचा उघडउघड संदेश जिल्ह्यास देण्यात आला. यानिमित्ताने जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरणे होऊ घातली आहेत. त्याची ही सुरूवात आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.