शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी राजकीय स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:03 IST

औरंगाबाद : शासनाने १८ पेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येकाला लस देण्याची घोषणा केली. शहरात या निर्णयानुसार व्यापक प्रमाणात अंमलबजावणी ...

औरंगाबाद : शासनाने १८ पेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येकाला लस देण्याची घोषणा केली. शहरात या निर्णयानुसार व्यापक प्रमाणात अंमलबजावणी सुरू झाली. लसीकरणाला तरुणाईकडून मिळत असलेला प्रतिसाद बघता, राजकीय मंडळींनी आमच्या वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू करा, असा आग्रह मनपाच्या आरोग्य विभागाकडे धरण्यात येत आहे. एका पक्षाच्या राजकीय नेत्याची मागणी मान्य केली, तर दुसऱ्या पक्षाचे नेते बाह्या सरसावत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढत आहे.

शहरात लसीकरण मोहिमेला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळायला हवा, तसा मिळत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने माजी नगरसेवकांची मदत घेतली होती. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू असताना अनेक केंद्रांवर राजकीय मंडळींनी ताबा मिळविला. संभाव्य मतदार डोळ्यासमोर ठेवून राजकीय मंडळींनी स्वत:हून मंडप, नागरिकांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था केली. महापालिकेने त्यावरही आक्षेप घेतला नाही. आता शासन आदेशानुसार मंगळवारपासून १८ पेक्षा अधिक वय असलेल्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे राजकीय मंडळी मनपाच्या आरोग्य विभागाकडे, आमच्या वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू करा, असा आग्रह धरीत आहेत. मनपाने मागणीनंतर लसीकरण केंद्र सुरू केले तरी, दुसऱ्या दिवशी अन्य पक्षाचे नेते, कार्यकर्ते, आम्हालाही स्वतंत्र केंद्र द्या, त्यांना कसे दिले? असे वाद होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सध्या सावध पवित्रा घेतला आहे. शहरात ६९ कोविशिल्डचे, तर ३ कोव्हॅक्सिनची केंद्रे सुरू ठेवली आहेत.

कोट

वाॅर्डनिहाय लसीकरण केंद्रे यापूर्वीच सुरू करण्यात आली आहेत. शहरातील काही भागांतील चार ते पाच स्थानिक राजकीय नेत्यांकडून लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. मात्र, लसीकरण केंद्र या नेत्यांना देण्याबाबत कुठलाही विचार नाही.

- नीता पाडळकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा.